शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मोडकाआगर पुलावरून मेअखेर हाेणार वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:31 IST

असगोली : अखेर बहुचर्चित मोडकाआगर धरणातील नव्या पुलाचे काम पूर्ण झाले आहे. या पुलाच्या दोन्ही बाजूला १६ मीटर लांबीच्या ...

असगोली : अखेर बहुचर्चित मोडकाआगर धरणातील नव्या पुलाचे काम पूर्ण झाले आहे. या पुलाच्या दोन्ही बाजूला १६ मीटर लांबीच्या संरक्षक भिंती बांधून मग जोडरस्त्यासाठी भराव टाकला जाणार आहे. मात्र, जिल्ह्यात लागलेल्या निर्बंधांमुळे कामाच्या वेगावर परिणाम होणार आहे. त्यामुळे पूल वापरण्यास मेअखेरपर्यंत गुहागरकरांना वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान, संरक्षक भिंतींचे काम सुरू करण्यासाठी धरणाच्या बाजूचा पर्यायी मार्ग रुंद करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.

गुहागर - विजापूर राष्ट्रीय महामार्गावर गुहागरपासून ६ किलाेमीटर अंतरावर मोडकाआगरचे धरण आहे. या धरणावरील पूल ४ वर्षांपूर्वी धोकादायक असल्याचा अहवाल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिला हाेता. तेव्हापासून मोडकाआगरचा पूल चर्चेत आला. फेब्रुवारी २०२० मध्ये मनीषा कन्स्ट्रक्शनने गुहागर तालुक्यात महामार्गाच्या कामाला सुरुवात केली. एप्रिल २०२० मध्ये देशात दुसरी टाळेबंदी जाहीर झाली. तेव्हा जिल्हा प्रशासनाने मोडकाआगर धरणात नव्या पुलाचे काम करण्याचा आग्रह ठेकेदाराकडे धरला. त्यावेळी दोन महिन्यात पुलाचे काम पूर्ण होईल, अशी आश्वासने देण्यात आली. मात्र, पुलाचे काम पूर्ण होऊ शकले नाही. परिणामी पुन्हा एकदा पुलाच्या कामावरून वादंग माजले. या बहुचर्चित नव्या पुलावर गुरुवारी स्लॅब ओतून पूर्ण झाला आहे. आता २१ दिवस पुलाच्या स्लॅबवर पाणी मारण्याचे काम सुरू आहे. या नवीन पुलाच्या दोन्ही बाजूला १६ मीटर लांबीच्या संरक्षक भिंती बांधण्यात येणार आहेत. या भिंती बांधून झाल्यावर मधल्या भागात भराव टाकून पुलाचे जोडरस्ते तयार करण्यात येतील. स्लॅबचे काम झाल्यावर दोन्ही बाजूला संरक्षक भिंती बांधताना पर्यायी मार्ग रुंद करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी पुलाच्या एका बाजूला धरणात भराव टाकून पर्यायी मार्ग रुंद करण्याचे काम वेगाने सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यावर संरक्षक भिंतींच्या कामालाही लगेचच सुरुवात करण्यात येणार आहे. नियोजित वेळेत काम पूर्ण झाले, तर मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पुलावरून वाहतूक सुरू होऊ शकते. मात्र, बुधवारी (दि. १४) सायंकाळपासून लादण्यात आलेल्या निर्बंधामुळे हे नियोजन बारगळण्याची भीती पुलावरील कर्मचाऱ्यांना वाटत आहे.

काेट

संरक्षक भिंती बांधण्यासाठी स्टील, सिमेंट व वाळूची आवश्यकता आहे. निर्बंधामुळे हा माल पुरवठादाराकडून वेळेवर पोहाेचला नाही, तर कामावर परिणाम होईल. शिवाय हॉटेल, टपऱ्या बंद झाल्यावर कामगारांचे जेवणाचे हाल होतील. अशा परिस्थितीत कामगार पूर्ण क्षमतेने काम करू शकणार नाहीत. नियोजित कामे करण्यास विलंब झाला, तर ठरलेल्या वेळेत रस्ता करणे कठीण होईल.

- धीरज चौधरी, पर्यवेक्षक अभियंता, मोडकाआगर पूल