शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
5
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
6
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
7
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
8
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
9
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
10
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
11
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
12
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
13
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
14
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
15
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
17
रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकची गेल्या महिन्यात रेकॉर्ड ब्रेक विक्री; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड!
18
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
19
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...

मोडकाआगर पुलावरून मेअखेर हाेणार वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:31 IST

असगोली : अखेर बहुचर्चित मोडकाआगर धरणातील नव्या पुलाचे काम पूर्ण झाले आहे. या पुलाच्या दोन्ही बाजूला १६ मीटर लांबीच्या ...

असगोली : अखेर बहुचर्चित मोडकाआगर धरणातील नव्या पुलाचे काम पूर्ण झाले आहे. या पुलाच्या दोन्ही बाजूला १६ मीटर लांबीच्या संरक्षक भिंती बांधून मग जोडरस्त्यासाठी भराव टाकला जाणार आहे. मात्र, जिल्ह्यात लागलेल्या निर्बंधांमुळे कामाच्या वेगावर परिणाम होणार आहे. त्यामुळे पूल वापरण्यास मेअखेरपर्यंत गुहागरकरांना वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान, संरक्षक भिंतींचे काम सुरू करण्यासाठी धरणाच्या बाजूचा पर्यायी मार्ग रुंद करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.

गुहागर - विजापूर राष्ट्रीय महामार्गावर गुहागरपासून ६ किलाेमीटर अंतरावर मोडकाआगरचे धरण आहे. या धरणावरील पूल ४ वर्षांपूर्वी धोकादायक असल्याचा अहवाल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिला हाेता. तेव्हापासून मोडकाआगरचा पूल चर्चेत आला. फेब्रुवारी २०२० मध्ये मनीषा कन्स्ट्रक्शनने गुहागर तालुक्यात महामार्गाच्या कामाला सुरुवात केली. एप्रिल २०२० मध्ये देशात दुसरी टाळेबंदी जाहीर झाली. तेव्हा जिल्हा प्रशासनाने मोडकाआगर धरणात नव्या पुलाचे काम करण्याचा आग्रह ठेकेदाराकडे धरला. त्यावेळी दोन महिन्यात पुलाचे काम पूर्ण होईल, अशी आश्वासने देण्यात आली. मात्र, पुलाचे काम पूर्ण होऊ शकले नाही. परिणामी पुन्हा एकदा पुलाच्या कामावरून वादंग माजले. या बहुचर्चित नव्या पुलावर गुरुवारी स्लॅब ओतून पूर्ण झाला आहे. आता २१ दिवस पुलाच्या स्लॅबवर पाणी मारण्याचे काम सुरू आहे. या नवीन पुलाच्या दोन्ही बाजूला १६ मीटर लांबीच्या संरक्षक भिंती बांधण्यात येणार आहेत. या भिंती बांधून झाल्यावर मधल्या भागात भराव टाकून पुलाचे जोडरस्ते तयार करण्यात येतील. स्लॅबचे काम झाल्यावर दोन्ही बाजूला संरक्षक भिंती बांधताना पर्यायी मार्ग रुंद करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी पुलाच्या एका बाजूला धरणात भराव टाकून पर्यायी मार्ग रुंद करण्याचे काम वेगाने सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यावर संरक्षक भिंतींच्या कामालाही लगेचच सुरुवात करण्यात येणार आहे. नियोजित वेळेत काम पूर्ण झाले, तर मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पुलावरून वाहतूक सुरू होऊ शकते. मात्र, बुधवारी (दि. १४) सायंकाळपासून लादण्यात आलेल्या निर्बंधामुळे हे नियोजन बारगळण्याची भीती पुलावरील कर्मचाऱ्यांना वाटत आहे.

काेट

संरक्षक भिंती बांधण्यासाठी स्टील, सिमेंट व वाळूची आवश्यकता आहे. निर्बंधामुळे हा माल पुरवठादाराकडून वेळेवर पोहाेचला नाही, तर कामावर परिणाम होईल. शिवाय हॉटेल, टपऱ्या बंद झाल्यावर कामगारांचे जेवणाचे हाल होतील. अशा परिस्थितीत कामगार पूर्ण क्षमतेने काम करू शकणार नाहीत. नियोजित कामे करण्यास विलंब झाला, तर ठरलेल्या वेळेत रस्ता करणे कठीण होईल.

- धीरज चौधरी, पर्यवेक्षक अभियंता, मोडकाआगर पूल