शहरं
Join us  
Trending Stories
1
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
2
काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
3
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
4
Vijay Hazare Trophy: कॅप्टनची वैभवपेक्षा जलद सेंच्युरी! बिहारनं ५७४ धावांसह सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
5
H-1B व्हिसा आता 'मेरिट'वर! १ लाख डॉलर अतिरिक्त फी अन् पगाराची अट; पाहा काय आहे नवीन नियम
6
Eclipse 2026: २०२६ मध्ये ४ ग्रहणांची मालिका, विशेषतः होळीला चंद्रग्रहण वेधणार जगाचं लक्ष?
7
"नेमके कशासाठी आज घालताय एकमेकांच्या गळ्यात गळे?"; युती होताच भाजपाचा खोचक सवाल
8
...म्हणून उद्धव आणि राज ठाकरेंनी जागावाटप, उमेदवार याबाबत काहीच घोषणा केली नाही; कारण सांगताच सगळे हसले
9
२६ डिसेंबरपासून आणखी एका कंपनीचा IPO उघडणार; आतापासून GMP ₹१२५ वर, कोणती आहे कंपनी?
10
Shiv Sena UBT & MNS Alliance: 'शिवतीर्थ'वर राज-उद्धव! बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं अभिवादन
11
शिवसेनेनं 'करून दाखवलं', मनसेचं 'इंजिन' घसरलं! पाहा, मागील दोन निवडणुकांमध्ये नेमकं काय घडलं?
12
अतिश्रीमंतांचा 'आक्रमक' गुंतवणुकीवर भर! 'या' क्षेत्रात लावतात ७०% पैसे; सोन्याकडे मात्र पाठ
13
IND W vs SL W: भारताच्या 'लेडी सेहवाग'चा मोठा पराक्रम; स्मृती मानधना, दिप्ती शर्मा, जेमिमालाही टाकलं मागं!
14
'आम्ही भारतातील सर्वात मोठे फरार', ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांचा सरकारवर हल्लाबोल; व्हिडीओ व्हायरल
15
सोने-चांदी-हिरे काही कमी नाही, राममूर्ती घडवायला दिले ३० कोटी; अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली
16
कुणीही एकत्र आले तरी मुंबईत भाजपाचा महापौर बसेल; मंत्री बावनकुळेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा
17
फास्ट फूडमुळे खरंच झाला विद्यार्थिनीचा मृत्यू? डॉक्टर आणि कुटुंबीयांनी सांगितलं धक्कादायक 'सत्य'
18
DCM शिंदे पोहोचले बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर; ठाकरे बंधूंच्या यूतीपूर्वी घडामोडींना वेग
19
बांग्लादेशात हिंदूंवरील अत्याचार वाढले; चिटगावमध्ये कट्टरतावाद्यांनी हिंदूंची घरे जाळली
20
Vijay Hazare Trophy स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात वैभव सूर्यवंशीचा धमाका! वादळी शतकासह रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

मोडकाआगर पुलावरून मेअखेर हाेणार वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:31 IST

असगोली : अखेर बहुचर्चित मोडकाआगर धरणातील नव्या पुलाचे काम पूर्ण झाले आहे. या पुलाच्या दोन्ही बाजूला १६ मीटर लांबीच्या ...

असगोली : अखेर बहुचर्चित मोडकाआगर धरणातील नव्या पुलाचे काम पूर्ण झाले आहे. या पुलाच्या दोन्ही बाजूला १६ मीटर लांबीच्या संरक्षक भिंती बांधून मग जोडरस्त्यासाठी भराव टाकला जाणार आहे. मात्र, जिल्ह्यात लागलेल्या निर्बंधांमुळे कामाच्या वेगावर परिणाम होणार आहे. त्यामुळे पूल वापरण्यास मेअखेरपर्यंत गुहागरकरांना वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान, संरक्षक भिंतींचे काम सुरू करण्यासाठी धरणाच्या बाजूचा पर्यायी मार्ग रुंद करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.

गुहागर - विजापूर राष्ट्रीय महामार्गावर गुहागरपासून ६ किलाेमीटर अंतरावर मोडकाआगरचे धरण आहे. या धरणावरील पूल ४ वर्षांपूर्वी धोकादायक असल्याचा अहवाल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिला हाेता. तेव्हापासून मोडकाआगरचा पूल चर्चेत आला. फेब्रुवारी २०२० मध्ये मनीषा कन्स्ट्रक्शनने गुहागर तालुक्यात महामार्गाच्या कामाला सुरुवात केली. एप्रिल २०२० मध्ये देशात दुसरी टाळेबंदी जाहीर झाली. तेव्हा जिल्हा प्रशासनाने मोडकाआगर धरणात नव्या पुलाचे काम करण्याचा आग्रह ठेकेदाराकडे धरला. त्यावेळी दोन महिन्यात पुलाचे काम पूर्ण होईल, अशी आश्वासने देण्यात आली. मात्र, पुलाचे काम पूर्ण होऊ शकले नाही. परिणामी पुन्हा एकदा पुलाच्या कामावरून वादंग माजले. या बहुचर्चित नव्या पुलावर गुरुवारी स्लॅब ओतून पूर्ण झाला आहे. आता २१ दिवस पुलाच्या स्लॅबवर पाणी मारण्याचे काम सुरू आहे. या नवीन पुलाच्या दोन्ही बाजूला १६ मीटर लांबीच्या संरक्षक भिंती बांधण्यात येणार आहेत. या भिंती बांधून झाल्यावर मधल्या भागात भराव टाकून पुलाचे जोडरस्ते तयार करण्यात येतील. स्लॅबचे काम झाल्यावर दोन्ही बाजूला संरक्षक भिंती बांधताना पर्यायी मार्ग रुंद करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी पुलाच्या एका बाजूला धरणात भराव टाकून पर्यायी मार्ग रुंद करण्याचे काम वेगाने सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यावर संरक्षक भिंतींच्या कामालाही लगेचच सुरुवात करण्यात येणार आहे. नियोजित वेळेत काम पूर्ण झाले, तर मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पुलावरून वाहतूक सुरू होऊ शकते. मात्र, बुधवारी (दि. १४) सायंकाळपासून लादण्यात आलेल्या निर्बंधामुळे हे नियोजन बारगळण्याची भीती पुलावरील कर्मचाऱ्यांना वाटत आहे.

काेट

संरक्षक भिंती बांधण्यासाठी स्टील, सिमेंट व वाळूची आवश्यकता आहे. निर्बंधामुळे हा माल पुरवठादाराकडून वेळेवर पोहाेचला नाही, तर कामावर परिणाम होईल. शिवाय हॉटेल, टपऱ्या बंद झाल्यावर कामगारांचे जेवणाचे हाल होतील. अशा परिस्थितीत कामगार पूर्ण क्षमतेने काम करू शकणार नाहीत. नियोजित कामे करण्यास विलंब झाला, तर ठरलेल्या वेळेत रस्ता करणे कठीण होईल.

- धीरज चौधरी, पर्यवेक्षक अभियंता, मोडकाआगर पूल