शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

मोडकाआगर पुलावरून मेअखेर हाेणार वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:31 IST

असगोली : अखेर बहुचर्चित मोडकाआगर धरणातील नव्या पुलाचे काम पूर्ण झाले आहे. या पुलाच्या दोन्ही बाजूला १६ मीटर लांबीच्या ...

असगोली : अखेर बहुचर्चित मोडकाआगर धरणातील नव्या पुलाचे काम पूर्ण झाले आहे. या पुलाच्या दोन्ही बाजूला १६ मीटर लांबीच्या संरक्षक भिंती बांधून मग जोडरस्त्यासाठी भराव टाकला जाणार आहे. मात्र, जिल्ह्यात लागलेल्या निर्बंधांमुळे कामाच्या वेगावर परिणाम होणार आहे. त्यामुळे पूल वापरण्यास मेअखेरपर्यंत गुहागरकरांना वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान, संरक्षक भिंतींचे काम सुरू करण्यासाठी धरणाच्या बाजूचा पर्यायी मार्ग रुंद करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.

गुहागर - विजापूर राष्ट्रीय महामार्गावर गुहागरपासून ६ किलाेमीटर अंतरावर मोडकाआगरचे धरण आहे. या धरणावरील पूल ४ वर्षांपूर्वी धोकादायक असल्याचा अहवाल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिला हाेता. तेव्हापासून मोडकाआगरचा पूल चर्चेत आला. फेब्रुवारी २०२० मध्ये मनीषा कन्स्ट्रक्शनने गुहागर तालुक्यात महामार्गाच्या कामाला सुरुवात केली. एप्रिल २०२० मध्ये देशात दुसरी टाळेबंदी जाहीर झाली. तेव्हा जिल्हा प्रशासनाने मोडकाआगर धरणात नव्या पुलाचे काम करण्याचा आग्रह ठेकेदाराकडे धरला. त्यावेळी दोन महिन्यात पुलाचे काम पूर्ण होईल, अशी आश्वासने देण्यात आली. मात्र, पुलाचे काम पूर्ण होऊ शकले नाही. परिणामी पुन्हा एकदा पुलाच्या कामावरून वादंग माजले. या बहुचर्चित नव्या पुलावर गुरुवारी स्लॅब ओतून पूर्ण झाला आहे. आता २१ दिवस पुलाच्या स्लॅबवर पाणी मारण्याचे काम सुरू आहे. या नवीन पुलाच्या दोन्ही बाजूला १६ मीटर लांबीच्या संरक्षक भिंती बांधण्यात येणार आहेत. या भिंती बांधून झाल्यावर मधल्या भागात भराव टाकून पुलाचे जोडरस्ते तयार करण्यात येतील. स्लॅबचे काम झाल्यावर दोन्ही बाजूला संरक्षक भिंती बांधताना पर्यायी मार्ग रुंद करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी पुलाच्या एका बाजूला धरणात भराव टाकून पर्यायी मार्ग रुंद करण्याचे काम वेगाने सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यावर संरक्षक भिंतींच्या कामालाही लगेचच सुरुवात करण्यात येणार आहे. नियोजित वेळेत काम पूर्ण झाले, तर मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पुलावरून वाहतूक सुरू होऊ शकते. मात्र, बुधवारी (दि. १४) सायंकाळपासून लादण्यात आलेल्या निर्बंधामुळे हे नियोजन बारगळण्याची भीती पुलावरील कर्मचाऱ्यांना वाटत आहे.

काेट

संरक्षक भिंती बांधण्यासाठी स्टील, सिमेंट व वाळूची आवश्यकता आहे. निर्बंधामुळे हा माल पुरवठादाराकडून वेळेवर पोहाेचला नाही, तर कामावर परिणाम होईल. शिवाय हॉटेल, टपऱ्या बंद झाल्यावर कामगारांचे जेवणाचे हाल होतील. अशा परिस्थितीत कामगार पूर्ण क्षमतेने काम करू शकणार नाहीत. नियोजित कामे करण्यास विलंब झाला, तर ठरलेल्या वेळेत रस्ता करणे कठीण होईल.

- धीरज चौधरी, पर्यवेक्षक अभियंता, मोडकाआगर पूल