शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

दडी मारलेल्या पावसाची संततधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:20 IST

रत्नागिरी : गेले १५ दिवस दडी मारलेल्या पावसाने शनिवारी सायंकाळपासून चांगलाच जोर धरला आहे. सरीवर कोसळणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा ...

रत्नागिरी : गेले १५ दिवस दडी मारलेल्या पावसाने शनिवारी सायंकाळपासून चांगलाच जोर धरला आहे. सरीवर कोसळणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, रखडलेली शेतीची कामे वेगाने सुरू झाली आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९४८०.६० मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ७०४.३९ मिलिमीटर इतका जास्त पाऊस झाला आहे. आतापर्यंत सर्वाधिक पाऊस जिल्ह्यात खेड तालुक्यात झाला आहे.

पावसाने सलग दोन आठवडे विश्रांती घेतल्याने शेतीची कामे रखडली होती. लावलेली शेती उन्हाच्या कडाक्यामुळे वाळू लागली होती. मात्र, दि. ८ जुलैपासून पुन्हा पावसाला सुरूवात झाल्याने शेतीची कामे सुरू झाली आहेत. सरीवर कोसळणाऱ्या पावसामुळे हवेमध्येही गारठा निर्माण झाला आहे. नदी, ओढ्यांच्या पाण्याच्या पातळीमध्येही वाढ झाली आहे. पावसामुळे जिल्ह्यात कुठेही पडझड अथवा जीवितहानी झाल्याची प्रशासनाकडे अद्याप नोंद नाही.

जिल्ह्यात मंडणगड तालुक्यात आतापर्यंत १०२१.७०, दापोली ७५२.६०, खेड १४६७.३०, गुहागर ११४९.६०, चिपळूण ९८०.९०, संगमेश्वर १०१८.९०, रत्नागिरी ११९३.५०, लांजा ९९४, राजापूर तालुक्यात ९०२.१० मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे.