शहरं
Join us  
Trending Stories
1
"गणपती दरम्यान मुंबईत स्फोट घडवणार", लष्कर-ए-जिहादीच्या नावाने केलेला मेसेज! आरोपीला पोलिसांनी केली अटक
2
'ऑपरेशन सिंदूर'चे ८८ तास... लष्करप्रमुख 'पडद्यामागची गोष्ट' सांगत म्हणाले- "त्या वेळी..."
3
ट्रम्प टॅरिफमुळे GST मध्ये बदल केला का? अर्थमंत्र्यांचं स्पष्टीकरण; म्हणाल्या, "गेल्या दीड वर्षांपासून..."
4
उमेश कामत-प्रिया बापटच्या यशस्वी संसाराचं रहस्य काय? म्हणाले, "आम्ही वैयक्तिक स्तरावर..."
5
अल्काराझ-सिनर जोडीसमोर निभाव लागेना! प्रत्येक वेळी दोघांपैकी एक येतोय जोकोच्या आडवा
6
‘सीसीएमपी’ अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना दिलासा, होमिओपॅथी डॉक्टर ‘एमएमसी’मध्ये नोंद करू शकणार
7
Viral Video : पोर्शमध्ये आई तर फॉर्च्युनरमध्ये मुलगा, रस्त्यावर लागली भन्नाट रेस! व्हिडीओ बघून व्हाल थक्क
8
घोड्यांचे रक्त पाजून ब्राझीलच्या फॅक्टरीत दररोज तयार केले जातात कोट्यवधी मच्छर; कारण काय?
9
ते ‘ट्रम्प’ आणि हे ‘पिपाण्या’…एवढाच काय तो फरक; भाजपानं उद्धव ठाकरेंची उडवली खिल्ली
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक कौतुक करताच पंतप्रधान मोदी यांनीही मानले आभार! म्हणाले...
11
"मोदी आणि मी कायम मित्र राहू..."; अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
12
कडेकोट सुरक्षा व्यवस्था भेदली, लाल किल्ल्यात मौल्यवान वस्तूवर चोरट्याचा डल्ला, कोट्यवधीमध्ये आहे किंमत   
13
राष्ट्रसंत मोरारी बापू यांना राज्य सरकारकडून अतिथी दर्जा!
14
OBC Reservation: ओबीसी आरक्षण संपविणारा काळा कागद म्हणजे सरकारचा मराठा जीआर!
15
१ लाख रुपयांचे झाले १ कोटी, या स्टॉकनं केलं मालामाल; मोटरसायकल आणि थ्री व्हिलर बनवते कंपनी, तुमच्याकडे आहे का?
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा रद्द, आता एस. जयशंकर करणार UNGA मध्ये भारताचं प्रतिनिधित्व
17
"घाबरू नका, प्रत्येक समस्येचे निराकरण होईल"; CM योगी आदित्यनाथ यांनी नागरिकांना दिला धीर
18
केवळ ₹१५०० पासून सुरू करू शकता गुंतवणूक; तयार होईल ₹५९,०३,२५३ चा फंड, नफा पाहून विश्वासच बसणार नाही
19
"पाठीत खंजीर खुपसणारे..."; विराट कोहली-युवराज मैत्रीबाबत युवीच्या वडिलांचे धक्कादायक विधान
20
आजचे राशीभविष्य - ६ सप्टेंबर २०२५, व्यवसायात लाभ होईल, कुटुंबात सुख- शांती लाभेल, रमणीय ठिकाणी प्रवासाला जा

पाणी अडवण्यामध्ये चिपळूण तालुका जिल्ह्यात अव्वल

By admin | Updated: November 5, 2015 00:10 IST

कृषी विभाग : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केले कौतुक

चिपळूण : पावसाने पाठ फिरवल्याने भविष्यात पाण्याची टंचाई अधिक तीव्र होणार आहे. ही काळाची पावले ओळखून उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे यांनी पुढाकार घेऊन बंधारे बांधण्याची मोहीम सुरु केली. सर्वाधिक ३६६ बंधारे बांधून चिपळूण तालुक्याने आपला सहभाग प्रभावीपणे सिध्द केला. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी अभियानाच्या यशस्वीतेबद्दल चिपळूण तालुक्याचे कौतुक केले आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’, ‘पाणी वाचवा, तिसरे महायुध्द हे पाण्यासाठी होणार आहे’ अशी चर्चा सातत्याने सुरु आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी झपाट्याने खाली जात आहे. त्यातच बदलत्या हवामानाचा फटका बसत असल्यामुळे पाऊसही बेताचा पडत आहे. चालू हंगामात पाऊस उशीरा सुरु झाला आणि लवकर संपला. कोकणातील भातशेतीवर त्याचा परिणाम झाल्याने पीक हातचे गेले. परंतु, भविष्यात पिण्यासाठीही पाणी मिळणार नाही, याची जाणीव झाल्याने शासकीय यंत्रणा कामाला लागली. उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे, तहसीलदार वृषाली पाटील, गटविकास अधिकारी शुभांगी पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रकाश भोसले, उपविभागीय कृषी अधिकारी रघुनाथ सरतापे, तालुका कृषी अधिकारी रवींद्र पवार, पंचायत समिती कृषी अधिकारी सुनील खरात, विस्तार अधिकारी सुनील गावडे, प्रताप मोरे, विजय वानखेडे आदींची बैठक झाली. सरपंच, ग्रामसेवक, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक यांनाही यामध्ये सामावून घेण्यात आले. लोकसहभागातून बंधारे बांधण्याचे काम मिशन म्हणून सुरु करण्यात आले. उपविभागीय अधिकारी हजारे यांनी काही प्रगत संस्था, सहकारी बँका, कारखाने यांच्याकडून साडेचार टन प्लास्टिक कापड उपलब्ध करुन दिले. त्यातील अडीच टन कापड ग्रामपंचायतींना वाटप करण्यात आले. उर्वरित कापडही मागणीनुसार पुरवले जाणार आहे. हे कापड मोफत मिळाल्याने ग्रामपंचायतींनीही ग्रामस्थांना एकत्र करुन लोकसहभागातून श्रमदानाने हे बंधारे बांधले.आत्तापर्यंत तालुक्यात ३१० विजय बंधारे, २१ वनराई बंधारे, तर ३५ कच्चे बंधारे मिळून एकूण ३६६ बंधारे बांधण्यात आले आहेत. यामध्ये सरपंच, ग्रामसेवक व ग्रामस्थांचेही भरीव योगदान राहिले आहे. शनिवारी जिल्हा परिषदेत कृषी अधिकारी व कृषी विस्तार अधिकारी यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी बंधाऱ्यांचा आढावा घेतला. चिपळूण तालुक्यात सर्वाधिक बंधारे बांधण्यात आले असल्याने त्यांनी चिपळूण तालुक्याचे विशेष कौतुक केले. बंधारे बांधण्यात चिपळूण तालुका प्रथम क्रमांकावर आहे, अशी माहिती कृषी अधिकारी सुनील खरात यांनी दिली. अद्याप अनेक गावात बंधारे बांधण्याचे काम सुरु आहे. पाणी वाचविण्यासाठी बंधाऱ्यांच्या माध्यमातून ही चळवळ सुरु झाली असून, काही संस्था, व्यक्ती चळवळीत सहभागी झाल्या आहेत.(प्रतिनिधी)उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे यांनी औद्योगिक वसाहतीतील काही कारखान्यांबरोबरच जिल्हा मध्यवर्ती बँकेलाही प्लास्टिक कागदासाठी आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत संस्थांनी बंधाऱ्यांसाठी मोफत कागद पुरवला. त्यामुळे ग्रामपंचायतींना हे कापड उपलब्ध करुन देता आले. त्यामुळे हे मिशन यशस्वी होत असल्याचे कृषी अधिकारी सुनील खरात यांनी सांगितले.