शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘आशापुरा मायनिंग’ची आज सुनावणी

By admin | Updated: April 20, 2016 22:21 IST

निकालाकडे साऱ्यांचे लक्ष : पर्यावरण, आरोग्य विभागाचे अहवाल मायनिंगला अनुकूल

दापोली : तालुक्यातील उटंबर, केळशी, आशापुरा बॉक्साईट मायनिंगविरोधातील सुनावणी गुरुवारी प्रांत कार्यालयात होणार आहे. पर्यावरण व आरोग्य विभागाचा अहवाल कंपनीला अनुकूल असल्याने होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सुनावणीने कंपनीचे भवितव्य ठरणार असून, यासाठी प्रांताधिकाऱ्यांचा निकाल महत्त्वपूर्ण ठरणार आहे. गेली ८ वर्षे बॉक्साईट उत्खननाचे काम करणाऱ्या या कंपनीला अचानक विरोध झाल्याने कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पुढील चौकशी होईपर्यंत कंपनी बंद ठेवण्याचे आदेश दापोली प्रांताधिकारी जयराम देशमुख यांनी दिले होते. कंपनीच्या उत्खननामुळे प्रदूषण होऊन पर्यावरणाची हानी होत असल्याची तक्रार इम्तियाज हलदे यांनी दिली होती. त्यांच्या तक्रारीमुळे कंपनीला अचानक विरोध झाला. कंपनीच्या विरोधाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्नसुद्धा झाला. कंपनीमुळे पर्यावरणाची हानी होऊन लोकांचे आरोग्य धोक्यात आल्याची तक्रारही करण्यात आली, त्यामुळे कंपनीच्या अडचणीत वाढ झाली. कंपनी जगली पाहिजे, असा एक मतप्रवाह आता निर्माण झाला आहे. कंपनीला होणारा विरोध स्वार्थापोटी असल्याची टीकासुद्धा होऊ लागली आहे. ज्या लोकांनी आजपर्यंत कंपनीचे ठेके घेतले, त्यानीच आता कंपनीला वेठीला धरले आहे. कंपनीवर उदरनिर्वाह करणारे मजूर व लघुउद्योजकांनी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढून कंपनी लवकर सुरु करण्याची मागणी केली होती, तर दुसरीकडे काही लोकांनी कंपनीला विरोध दर्शवला होता. त्यामुळे कंपनीच्या वादात दोन मतप्रवाह पंचक्रोशीत पाहायला मिळाले. कंपनीशी काहीही संबंध नाही, अशा लोकांनीही विरोधी भूमिका घेतली आहे. कंपनीमुळे प्रदूषण होऊन क्षयरोगाची लागण झाल्याची तक्रार करण्यात आली होती. परंतु क्षयरोगाचे रुग्ण आढळून आले नाहीत. तसेच धुळीने प्रदूषण झाल्याचे आढळून आले नसल्याचा अहवाल दिल्यास पर्यावरण व आरोग्य विभागाच्या अहवालावरून कंपनी पुन्हा करण्याची परवानगी मिळू शकते. आशापुरा कंपनीकडे सर्व प्रकारच्या लोकांना रोजगार देण्याची क्षमता आहे, असे बोलले जात आहे. कंपनीमुळे शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल व लोकांना रोजगार मिळत आहे, असे असताना कंपनी बंदचा अट्टाहास का, असा सवाल काही लोक करत आहेत.त्यामुळे गुरुवारी होणाऱ्या सुनावणीकडे साऱ्या तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)