शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
3
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
4
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
5
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
7
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
8
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
9
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
10
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
11
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
12
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
13
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
14
Payal Gaming: कोण आहे पायल गेमिंग? १.२० मिनटांचा MMS लीक झाल्यानंतर आली चर्चेत!
15
Video: BJP आमदाराच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची केली आतषबाजी
16
ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई
17
लग्नानंतर एका वर्षात शोभिता धुलिपाला देणार गुडन्यूज? सासरे नागार्जुन म्हणाले, "योग्य वेळ..."
18
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
19
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
20
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

यंदा केवळ चार ग्रामपंचायती निर्मल

By admin | Updated: December 25, 2014 00:04 IST

जिल्हा परिषद : तब्बल ८४ ग्रामपंचायतींची अजूनही योजनेकडे पाठ

रत्नागिरी : जिल्ह्यातील केवळ चार ग्रामपंचायतींना निर्मल ग्राम पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे़ मात्र, जिल्हा निर्मल होण्याच्या दृष्टीने पुरस्कारासाठी निवड झालेल्या ग्रामपंचायतींची संख्या अपेक्षेपेक्षा कमी असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे़ जिल्ह्यात लांजा आणि गुहागर हे २ तालुके निर्मल झाले असून, ७ तालुक्यातील ८८ ग्रामपंचायती अजूनही निर्मल झालेल्या नव्हत्या. त्यासाठी या गावांमध्ये दत्तक-पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. हे अधिकारी ग्रामसेवकांच्या सहकार्याने त्या-त्या ग्रामपंचायतींमध्ये काम करणार आहेत. त्यासाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस, शिक्षक, आशा कार्यकर्ती आदींची मदत घेण्यात येणार आहे, असे मागील आॅक्टोबर महिन्यामध्ये प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी जाहीर केले होते़ जिल्हा निर्मल होण्याच्या उंबरठ्यावर आहे. जिल्ह्यात अजूनही १ लाख १० कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालये नाहीत. या प्रत्येक शौचालयासाठी मग्रारोहयोतून ४६०० आणि नरेगामधून ५४०० असे एकूण १० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे़ जिल्ह्यातील ८८ ग्रामपंचायती निर्मल होणे बाकी होते. त्यांच्यापैकी ८५ ग्रामपंचायती निर्मलग्राम पुरस्कारासाठी आॅनलाईन करण्यात आल्या होत्या़या ग्रामपंचायती निर्मल व्हाव्यात, यासाठी तेथील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्यासाठी जिल्हा परिषदेकडून कार्यशाळाही घेण्यात आली होती़ या कार्यशाळेच्या माध्यमातून निर्मलग्रामसाठी प्रबोधन करण्यात आले होते़दरम्यान, जिल्ह्यातील निर्मल ग्राम न झालेल्या ग्रामपंचायतींची पाहणी करण्यासाठी केंद्रीय समिती आली होती़ या समितीने जिल्ह्यात दौरा करुन ग्रामपंचायतींची तपासणी केली होती़ त्यानंतर नुकताच राज्यातील ग्रामपंचायतींना निर्मल ग्राम पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे़ यामध्ये जिल्ह्यातील केवळ चार ग्रामपंचायतींना हा पुरस्कार मिळाला आहे़जिल्ह्यातील आखणी काही ग्रामपंचायतींना निर्मल ग्राम पुरस्कार मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती़ मात्र, अपेक्षा भंग झाल्याने जिल्हाभरातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे़ जिल्ह्यात ८४४ ग्रामपंचायती आहेत़ या ग्रामपंचायतींपैकी ७५६ ग्रामपंचायती यापूर्वीच निर्मल ग्राम पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्या आहेत़ त्यामध्ये आणखी ४ ग्रामपंचायतींची भर पडल्याने त्यांची संख्या ७६० झाली आहे़ (शहर वार्ताहर)योजनेची ऐशीतैशीतालुकाग्रामपंचायतींची संख्यामंडणगड१दापोली१६खेड१७चिपळूण२७संगमेश्वर७रत्नागिरी९राजापूर८एकूण८५