शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

यंदा केवळ चार ग्रामपंचायती निर्मल

By admin | Updated: December 25, 2014 00:04 IST

जिल्हा परिषद : तब्बल ८४ ग्रामपंचायतींची अजूनही योजनेकडे पाठ

रत्नागिरी : जिल्ह्यातील केवळ चार ग्रामपंचायतींना निर्मल ग्राम पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे़ मात्र, जिल्हा निर्मल होण्याच्या दृष्टीने पुरस्कारासाठी निवड झालेल्या ग्रामपंचायतींची संख्या अपेक्षेपेक्षा कमी असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे़ जिल्ह्यात लांजा आणि गुहागर हे २ तालुके निर्मल झाले असून, ७ तालुक्यातील ८८ ग्रामपंचायती अजूनही निर्मल झालेल्या नव्हत्या. त्यासाठी या गावांमध्ये दत्तक-पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. हे अधिकारी ग्रामसेवकांच्या सहकार्याने त्या-त्या ग्रामपंचायतींमध्ये काम करणार आहेत. त्यासाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस, शिक्षक, आशा कार्यकर्ती आदींची मदत घेण्यात येणार आहे, असे मागील आॅक्टोबर महिन्यामध्ये प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी जाहीर केले होते़ जिल्हा निर्मल होण्याच्या उंबरठ्यावर आहे. जिल्ह्यात अजूनही १ लाख १० कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालये नाहीत. या प्रत्येक शौचालयासाठी मग्रारोहयोतून ४६०० आणि नरेगामधून ५४०० असे एकूण १० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे़ जिल्ह्यातील ८८ ग्रामपंचायती निर्मल होणे बाकी होते. त्यांच्यापैकी ८५ ग्रामपंचायती निर्मलग्राम पुरस्कारासाठी आॅनलाईन करण्यात आल्या होत्या़या ग्रामपंचायती निर्मल व्हाव्यात, यासाठी तेथील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्यासाठी जिल्हा परिषदेकडून कार्यशाळाही घेण्यात आली होती़ या कार्यशाळेच्या माध्यमातून निर्मलग्रामसाठी प्रबोधन करण्यात आले होते़दरम्यान, जिल्ह्यातील निर्मल ग्राम न झालेल्या ग्रामपंचायतींची पाहणी करण्यासाठी केंद्रीय समिती आली होती़ या समितीने जिल्ह्यात दौरा करुन ग्रामपंचायतींची तपासणी केली होती़ त्यानंतर नुकताच राज्यातील ग्रामपंचायतींना निर्मल ग्राम पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे़ यामध्ये जिल्ह्यातील केवळ चार ग्रामपंचायतींना हा पुरस्कार मिळाला आहे़जिल्ह्यातील आखणी काही ग्रामपंचायतींना निर्मल ग्राम पुरस्कार मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती़ मात्र, अपेक्षा भंग झाल्याने जिल्हाभरातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे़ जिल्ह्यात ८४४ ग्रामपंचायती आहेत़ या ग्रामपंचायतींपैकी ७५६ ग्रामपंचायती यापूर्वीच निर्मल ग्राम पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्या आहेत़ त्यामध्ये आणखी ४ ग्रामपंचायतींची भर पडल्याने त्यांची संख्या ७६० झाली आहे़ (शहर वार्ताहर)योजनेची ऐशीतैशीतालुकाग्रामपंचायतींची संख्यामंडणगड१दापोली१६खेड१७चिपळूण२७संगमेश्वर७रत्नागिरी९राजापूर८एकूण८५