शहरं
Join us  
Trending Stories
1
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
2
मुंबई मनपा निवडणुकीसाठी DCM एकनाथ शिंदे तयारीला लागले; आनंदराज आंबेडकरांसोबत बैठक, काय ठरले?
3
"हा ट्रम्प यांच्या नोबेल पुरस्कार जिंकण्याच्या प्रयत्नाचा एक भाग," अमेरिकेच्या माजी NSA नं भारतावरील टॅरिफवरुन केली जोरदार टीका
4
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
5
आलिया भटचे होणारे भाऊजी कोण? शाहीनने शेअर केले बॉयफ्रेंडसोबतचे फोटो; कोण आहे तो?
6
SC on Stray Dogs: श्वानांना सार्वजनिक ठिकाणी खायला घालण्यास बंदी; पकडण्यापासून रोखल्यास २ लाखांचा दंड; सुप्रीम कोर्टाचा निर्णय
7
'मी प्रेमाने तिच्या जवळ गेलो पण...'; पहिल्या रात्रीच पत्नीचा खरा चेहरा समोर आला, घाबरलेला पती पोलिसांकडे गेला!
8
मुकेश अंबानी यांच्या आई कोकिला बेन यांची प्रकृती बिघडली; एअरलिफ्ट करून रुग्णालयात दाखल
9
“यांना वेळ द्यायचा तरी किती? मुंबईत घुसणारच, आम्हाला आमचे आरक्षण द्या”: मनोज जरांगे पाटील
10
सावध व्हा, तुमच्यासोबतही असं घडू शकतं! अधिकारी असल्याची बतावणी करून २.३ कोटी रुपये पळवले
11
Asia Cup आधी रिंकू सिंहचा शतकी धमाका; ८ उत्तुंग षटकारासह २२५ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा
12
अमेरिकेतील ५.५ कोटी परदेशी नागरिक अडचणीत, 'असं' झालं तर थेट हाकलून दिलं जाणार! नेमकं प्रकरण काय?
13
प्रेमात धोका! संतापलेली गर्लफ्रेंड थेट बॉयफ्रेंडच्या घरी पोहोचली, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का
14
क्रेडिट स्कोअरमध्ये पुणे दुसऱ्या क्रमांकावर; पहिलं कोण? ४७ लाख लोकांत फक्त ५ लोकांचा सर्वात बेस्ट स्कोअर
15
"दुसऱ्या पुरुषाचा स्पर्श मला सहन झाला नसता...", राजेश खन्नांसोबतच्या अफेअरबद्दल पहिल्यांदाच बोलली अभिनेत्री
16
Kashi Vishwanath Temple Owl: काशी विश्वनाथ मंदिरावर दिसले पांढरे घुबड; हे भारतासाठी नक्की कसले संकेत?
17
भारतासोबत डबल गेम खेळतोय चीन? द्विपक्षीय संबंध सुधारत असतानाच केलं 'हे' मोठं काम
18
मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशीवरुनच ऐनवेळी माघारी फिरणार?; चर्चांना उधाण
19
ग्लासमध्ये लघवी करून भांड्यांवर शिंपडायची, १० वर्षं जुन्या मोलकरणीचं घृणास्पद कृत्य सीसीटीव्हीत कैद!
20
खरंच TCS ३०,००० कर्मचाऱ्यांची कपात करणार का? युनियनचं आंदोलन, कंपनीनं दिलं स्पष्टीकरण

यंदा केवळ चार ग्रामपंचायती निर्मल

By admin | Updated: December 25, 2014 00:04 IST

जिल्हा परिषद : तब्बल ८४ ग्रामपंचायतींची अजूनही योजनेकडे पाठ

रत्नागिरी : जिल्ह्यातील केवळ चार ग्रामपंचायतींना निर्मल ग्राम पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे़ मात्र, जिल्हा निर्मल होण्याच्या दृष्टीने पुरस्कारासाठी निवड झालेल्या ग्रामपंचायतींची संख्या अपेक्षेपेक्षा कमी असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे़ जिल्ह्यात लांजा आणि गुहागर हे २ तालुके निर्मल झाले असून, ७ तालुक्यातील ८८ ग्रामपंचायती अजूनही निर्मल झालेल्या नव्हत्या. त्यासाठी या गावांमध्ये दत्तक-पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. हे अधिकारी ग्रामसेवकांच्या सहकार्याने त्या-त्या ग्रामपंचायतींमध्ये काम करणार आहेत. त्यासाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस, शिक्षक, आशा कार्यकर्ती आदींची मदत घेण्यात येणार आहे, असे मागील आॅक्टोबर महिन्यामध्ये प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी जाहीर केले होते़ जिल्हा निर्मल होण्याच्या उंबरठ्यावर आहे. जिल्ह्यात अजूनही १ लाख १० कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालये नाहीत. या प्रत्येक शौचालयासाठी मग्रारोहयोतून ४६०० आणि नरेगामधून ५४०० असे एकूण १० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे़ जिल्ह्यातील ८८ ग्रामपंचायती निर्मल होणे बाकी होते. त्यांच्यापैकी ८५ ग्रामपंचायती निर्मलग्राम पुरस्कारासाठी आॅनलाईन करण्यात आल्या होत्या़या ग्रामपंचायती निर्मल व्हाव्यात, यासाठी तेथील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्यासाठी जिल्हा परिषदेकडून कार्यशाळाही घेण्यात आली होती़ या कार्यशाळेच्या माध्यमातून निर्मलग्रामसाठी प्रबोधन करण्यात आले होते़दरम्यान, जिल्ह्यातील निर्मल ग्राम न झालेल्या ग्रामपंचायतींची पाहणी करण्यासाठी केंद्रीय समिती आली होती़ या समितीने जिल्ह्यात दौरा करुन ग्रामपंचायतींची तपासणी केली होती़ त्यानंतर नुकताच राज्यातील ग्रामपंचायतींना निर्मल ग्राम पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे़ यामध्ये जिल्ह्यातील केवळ चार ग्रामपंचायतींना हा पुरस्कार मिळाला आहे़जिल्ह्यातील आखणी काही ग्रामपंचायतींना निर्मल ग्राम पुरस्कार मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती़ मात्र, अपेक्षा भंग झाल्याने जिल्हाभरातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे़ जिल्ह्यात ८४४ ग्रामपंचायती आहेत़ या ग्रामपंचायतींपैकी ७५६ ग्रामपंचायती यापूर्वीच निर्मल ग्राम पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्या आहेत़ त्यामध्ये आणखी ४ ग्रामपंचायतींची भर पडल्याने त्यांची संख्या ७६० झाली आहे़ (शहर वार्ताहर)योजनेची ऐशीतैशीतालुकाग्रामपंचायतींची संख्यामंडणगड१दापोली१६खेड१७चिपळूण२७संगमेश्वर७रत्नागिरी९राजापूर८एकूण८५