शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

वरवडेत भरतीचे पाणी शिरले थेट ग्रामस्थांच्या घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:23 IST

रत्नागिरी : तालुक्यातील वरवडे येथील खारलँड बंधाऱ्याचे काम अर्धवट अवस्थेत ठेवून काम घेतलेला ठेकेदार गायब झाला आहे. अर्धवट अवस्थेतील ...

रत्नागिरी : तालुक्यातील वरवडे येथील खारलँड बंधाऱ्याचे काम अर्धवट अवस्थेत ठेवून काम घेतलेला ठेकेदार गायब झाला आहे. अर्धवट अवस्थेतील कामामुळे मागील चार दिवस भरतीचे पाणी थेट रहिवासी भागात शिरले आहे. मंगळवारी पहाटे भरतीचे पाणी वरवडे भंडारवाडी येथील ग्रामस्थांच्या घरापर्यंत पोहोचल्याने एकच गोंधळ उडाला. संबंधित ठेकेदार आणि खारलँड विभागाने तातडीने हे काम हाती न घेतल्यास प्रसंगी आंदोलन छेडू, असा इशारा येथील माजी सरपंच निखिल बोरकर यांनी दिला आहे.

वरवडे गाव हे खाडीकिनारी वसले आहे. खाडीच्या भरतीचे पाणी गावात शिरू नये यासाठी खारलँड विभागाने मुख्य रस्त्यानजीक बंधारा बांधला आहे. या बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम मागील काही दिवसांपूर्वी हाती घेण्यात आले. कामाच्या पूर्ततेसाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली. मात्र, काम अर्धवट ठेवून ठेकेदार गायब झाला आहे.

वरवडे भंडारवाडा येथे या बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. मात्र, संबंधित ठेकेदार आणि खारलँड विभागाचे दुर्लक्ष यामुळे मागचे काही दिवस हे काम पूर्णतः बंद आहे. याचा फटका मात्र आता गावातील ग्रामस्थांना बसला आहे. बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी बंधाऱ्याची मोरी उघडण्यात आली आहे. ही मोरी बंद न करताच ठेकेदार गायब झाला आहे. मोरी उघडी राहिल्याने भरतीचे पाणी आता गावात शिरू लागले आहे.

मागील चार दिवसांपासून भरतीचे पाणी भंडारवाडीमधील घरापर्यंत शिरले आहे. रहिवासी भागापर्यंत पाणी शिरल्याने अनेक नारळी पोफळीच्या बागांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे. याबाबत माजी सरपंच निखिल बोरकर आणि स्थानिक ग्रामस्थांनी खारलँडच्या अधिकाऱ्यांना कळविले. मात्र, यावर अद्यापपर्यंत कोणतीच कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातवरण आहे. भरतीचे पाणी अनेक घरांजवळ साचून राहिल्याने परिसरात साथीचे आजार पसरण्याची तसेच डासांचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे. कोरोनाच्या संकटात आणखी नवे आजार होण्याची भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

ठेकेदाराच्या चुकीने गावातील ज्या ग्रामस्थांचे नुकसान झाले आहे, त्यांना त्वरित ठेकेदार आणि संबंधित विभागाकडून नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. आरोग्य विभागानेही लवकर या भागाची पाहणी करून योग्य त्या उपाययोजना आखाव्यात, अशी मागणी माजी सरपंच निखिल बोरकर यांनी केली आहे. अन्यथा स्वतः जिथे मोरीचे काम सुरू आहे, तिथे डंपरने माती टाकून बंद करू. ग्रामस्थांना होणारा त्रास लवकर थांबवा, अन्यथा जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार देणार असल्याचे निखिल बोरकर यांनी सांगितले.