शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

एलईडीबंदी कायदा झाल्याशिवय स्वस्थ बसणार नाही : योगेश कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:31 IST

दापाेली येथील मच्छिमारांच्या आंदाेलनस्थळी आमदार याेगेश कदम यांनी भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली. लाेकमत न्यूज नेटवर्क दापोली : पारंपरिक ...

दापाेली येथील मच्छिमारांच्या आंदाेलनस्थळी आमदार याेगेश कदम यांनी भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली.

लाेकमत न्यूज नेटवर्क

दापोली : पारंपरिक मच्छीमार बांधवांच्या हिताचा बेकायदेशीर एलईडी मासेमारीबंदी कायदा होत नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नसून पारंपरिक मच्छीमारांना आपला पाठिंबा आहे. वेळ पडल्यास सत्ताधारी पक्षाचा आमदार असलो तरीही आपण पारंपरिक मच्छीमार बांधवांच्या हितासाठी सरकारच्या विरोधात मंत्रालयासमोर आंदोलन करायची आपली तयारी असल्याचे शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांनी मच्छीमार साखळी उपोषणाला पाठिंबा दर्शवताना जाहीर केले.

तत्कालीन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या प्रयत्नातून केरळच्या धर्तीवर मासेमारी कायदा होण्यासाठी सतत पाठपुरावा सुरू आहे. एलईडी बेकायदेशीर मासेमारी बंदी कायदा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पारंपारिक मच्छीमार बांधवांचे जगणे मुश्कील होणार आहे. त्यामुळे हा कायदा लवकरात लवकर व्हावा यासाठी सत्ताधारी पक्षातील आमदार या नात्याने आपण प्रयत्नशील आहोत, असे याेगेश कदम यांनी सांगितले. अरबी समुद्रात होणाऱ्या बेकायदेशीर एलईडी फास्टर बोट पर्ससीन नेट विरोधात पारंपरिक मच्छीमारांचा लढा सुरू आहे. पारंपरिक मच्छीमार बांधवांचे समुद्रातील एलईडी फिशिंग विरोधात साखळी उपोषण सुरू असून, सरकारने एलईडी बंदी कायदा लवकरात लवकर करून पारंपरिक मच्छीमारांना दिलासा द्यावा, या मागणीसाठी रत्नागिरी,सिंधुदुर्ग, रायगड या तीन जिल्ह्यात पारंपरिक मच्छीमार बांधवांचे साखळी उपोषण सुरू आहे.

कोकणातल्या पारंपरिक मच्छीमारांना एलईडी बंदीचा कायदा करण्याचा शब्द तो शब्द नक्कीच सत्यात उतरेल. आपण आमदार या नात्याने सतत पाठपुरावा करत आहोत फडणवीस सरकारच्या कारकिर्दीतील शेवटची कॅबिनेट न झाल्याने हा कायदा मंजूर होऊ शकला नाही. परंतु महाविकास आघाडी सरकारच्या काळात हा कायदा नक्कीच मंजूर होईल व पारंपरिक मच्छिमारांना मोठा दिलासा मिळेल, असेही योगेश कदम म्हणाले.

चाैकट

अस्लम शेख यांच्याशी चर्चा

मत्स्य खात्याचे मंत्री अस्लम शेख यांनी आमदार योगेश कदम यांना फोनवरून आपण उद्याच बैठक लावतो तुम्ही मच्छीमारांना घेऊन मंत्रालयात या. आपण एलईडीबंदी कायद्याविरोधात बैठक घेऊ, असे सांगितले. अस्लम शेख यांचा फोन आल्याने साखळी उपोषणाची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली आहे. परंतु जोपर्यंत एलईडीबंदी कायदा होत नाही किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लेखी स्वरूपात आश्वासन देत नाहीत तोपर्यंत साखळी उपोषण सुरूच राहील, असे संघर्ष समितीतर्फे सांगण्यात आले.