शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

एलईडीबंदी कायदा झाल्याशिवय स्वस्थ बसणार नाही : योगेश कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:31 IST

दापाेली येथील मच्छिमारांच्या आंदाेलनस्थळी आमदार याेगेश कदम यांनी भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली. लाेकमत न्यूज नेटवर्क दापोली : पारंपरिक ...

दापाेली येथील मच्छिमारांच्या आंदाेलनस्थळी आमदार याेगेश कदम यांनी भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली.

लाेकमत न्यूज नेटवर्क

दापोली : पारंपरिक मच्छीमार बांधवांच्या हिताचा बेकायदेशीर एलईडी मासेमारीबंदी कायदा होत नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नसून पारंपरिक मच्छीमारांना आपला पाठिंबा आहे. वेळ पडल्यास सत्ताधारी पक्षाचा आमदार असलो तरीही आपण पारंपरिक मच्छीमार बांधवांच्या हितासाठी सरकारच्या विरोधात मंत्रालयासमोर आंदोलन करायची आपली तयारी असल्याचे शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांनी मच्छीमार साखळी उपोषणाला पाठिंबा दर्शवताना जाहीर केले.

तत्कालीन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या प्रयत्नातून केरळच्या धर्तीवर मासेमारी कायदा होण्यासाठी सतत पाठपुरावा सुरू आहे. एलईडी बेकायदेशीर मासेमारी बंदी कायदा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पारंपारिक मच्छीमार बांधवांचे जगणे मुश्कील होणार आहे. त्यामुळे हा कायदा लवकरात लवकर व्हावा यासाठी सत्ताधारी पक्षातील आमदार या नात्याने आपण प्रयत्नशील आहोत, असे याेगेश कदम यांनी सांगितले. अरबी समुद्रात होणाऱ्या बेकायदेशीर एलईडी फास्टर बोट पर्ससीन नेट विरोधात पारंपरिक मच्छीमारांचा लढा सुरू आहे. पारंपरिक मच्छीमार बांधवांचे समुद्रातील एलईडी फिशिंग विरोधात साखळी उपोषण सुरू असून, सरकारने एलईडी बंदी कायदा लवकरात लवकर करून पारंपरिक मच्छीमारांना दिलासा द्यावा, या मागणीसाठी रत्नागिरी,सिंधुदुर्ग, रायगड या तीन जिल्ह्यात पारंपरिक मच्छीमार बांधवांचे साखळी उपोषण सुरू आहे.

कोकणातल्या पारंपरिक मच्छीमारांना एलईडी बंदीचा कायदा करण्याचा शब्द तो शब्द नक्कीच सत्यात उतरेल. आपण आमदार या नात्याने सतत पाठपुरावा करत आहोत फडणवीस सरकारच्या कारकिर्दीतील शेवटची कॅबिनेट न झाल्याने हा कायदा मंजूर होऊ शकला नाही. परंतु महाविकास आघाडी सरकारच्या काळात हा कायदा नक्कीच मंजूर होईल व पारंपरिक मच्छिमारांना मोठा दिलासा मिळेल, असेही योगेश कदम म्हणाले.

चाैकट

अस्लम शेख यांच्याशी चर्चा

मत्स्य खात्याचे मंत्री अस्लम शेख यांनी आमदार योगेश कदम यांना फोनवरून आपण उद्याच बैठक लावतो तुम्ही मच्छीमारांना घेऊन मंत्रालयात या. आपण एलईडीबंदी कायद्याविरोधात बैठक घेऊ, असे सांगितले. अस्लम शेख यांचा फोन आल्याने साखळी उपोषणाची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली आहे. परंतु जोपर्यंत एलईडीबंदी कायदा होत नाही किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लेखी स्वरूपात आश्वासन देत नाहीत तोपर्यंत साखळी उपोषण सुरूच राहील, असे संघर्ष समितीतर्फे सांगण्यात आले.