शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

काेकणात नागरी संरक्षण दलाच्या केंद्राची आवश्यकताच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:24 IST

रत्नागिरी : रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड हे जिल्हे विविध नैसर्गिक आपत्तींमुळे धोकादायक जाहीर झालेले असतानासुद्धा नागरी संरक्षण दलाच्या ...

रत्नागिरी : रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड हे जिल्हे विविध नैसर्गिक आपत्तींमुळे धोकादायक जाहीर झालेले असतानासुद्धा नागरी संरक्षण दलाच्या केंद्राची या जिल्ह्यांमध्ये आवश्यकताच नसल्याची माहिती सरकारतर्फे मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमाेर देण्यात आली़. निवृत्त महसूल कर्मचारी शरद राऊळ यांच्यावतीने ॲड़. राकेश भाटकर यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर गुरूवारी सुनावणी घेण्यात आली़. या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर ही माहिती देण्यात आली़.

रत्नागिरी, सिंधुदुर्गसह इतर चार जिल्हे हे नैसर्गिक आपत्तीच्या दृष्टीने धोकादायक ठरविण्यात आले आहेत. तसा निर्णय केंद्र सरकारच्या नागरी संरक्षण दलाच्या मुख्यालयाने २०११ साली मंजूर केला आहे. या जिल्ह्यांमध्ये नागरी संरक्षण दलाचे केंद्र स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले. त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांना आदेश प्राप्त झाल्यानंतर संबंधित केंद्रांसाठी लागणाऱ्या अधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया पूर्ण करून अंतिम यादी मंजुरीसाठी महाराष्ट्राच्या मुख्यालयात पाठवली आहे. त्यानंतर जागेसंदर्भात अडचणी निर्माण झाल्यावर रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यालयासाठीही जागा उपलब्ध करून दिली. परंतु, तरीही नागरी संरक्षण दलाचे संचालकांनी अद्यापपर्यंत केंद्र सुरू केलेली नाहीत.

कोकणाला लागोपाठ तीन वर्ष मोठमोठ्या वादळांचा तडाखा बसलेला आहे. त्यामुळे अपरिमित नुकसानही झाले आहे. तसेच रस्त्यावर वृक्ष पडल्याने बऱ्याच भागांचा संपर्क ठप्प झाला होता आणि तिथे मदतकार्य पोहोचायला पाच ते सहा दिवस लागले, अशा परिस्थितीत सिव्हील डिफेन्स कर्मचारी हे उत्तमप्रकारे मदतकार्य करू शकतात आणि त्याप्रमाणे त्यांचे प्रशिक्षणसुद्धा झालेले असते. कोकणावर वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींमुळे या नागरी संरक्षण दलाचे केंद्र रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मंजूर करण्यात आले आहे.

या जनहित याचिकेची मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली असता, सरकारतर्फे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये नागरी संरक्षण दलाच्या केंद्राची कोणतीही गरज नसल्याचे सांगण्यात आले. त्यावर उच्च न्यायालयातर्फे असेच तुमचे म्हणणे असेल तर ते प्रतिज्ञापत्रावर सादर करा आणि त्यावर याचिकाकर्त्याला प्रतिउत्तर देण्यास मुभा दिलेली आहे.