शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

खेडमध्ये निधी नाही; विकास खुंटला

By admin | Updated: July 10, 2015 22:23 IST

पर्यावरण समृद्धी : ४९ ग्रामपंचायती पात्र

खेड : तालुक्यातील ११४पैकीकेवळ ४९ ग्रामपंचायती शासनाच्या पर्यावरण संतुलित ग्रामसमृध्दी योजनेअंतर्गत पात्र ठरल्या आहेत, तर ६५ ग्रामपंचायतींचे प्रस्ताव अद्याप रखडले आहेत. निधीअभावी ही स्थिती उद्भवली असल्याचे सांगण्यात येत आहे़पर्यावरण संतुलित ग्रामसमृध्दी योजनेअंतर्गत राबवण्यात येत असलेल्या विविध विकासकामांच्या योजनेतूनच ग्रामपंचायतीअंतर्गत विकास करण्याची शासनाची संकल्पना आहे. अशा कामांच्या माध्यमातून गावाचा विकास साधायचा आहे. पंचायत राज व्यवस्थेतील अखेरचा टप्पा असलेल्या ग्रामीण भागाचा विकास करण्याकडे सध्या राज्य सरकारने आपले लक्ष केंद्रीत केले आहे. दोन्ही सरकारने आता गावाचा विकास साधण्याच्या अनेक योजना मूर्त स्वरूपात आणल्याने ग्रामपंचायतींना विशेष अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. गावातील अनेक ठिकाणी पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे. याकरिता पोषक वातावरण निर्माण व्हावे, यातूनच ग्रामीण भागाचा विकास होऊन पर्यावरण संतुलन राखणे सोपे व्हावे, या उद्देशाने ही योजना प्रभाविपणे राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.या योजनेअंतर्गत खेड तालुक्यातील ११४ ग्रामपंचायती पात्र ठरल्या होत्या. यावरून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. याच धर्तीवर आता यावर्षी तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतींचे प्रस्ताव २४ नोव्हेंबर २०१४ रोजी पंचायत समितीमार्फत पाठविण्यात आले होते. मात्र, त्यास अद्याप मंजुरी मिळाली नाही. तिसऱ्या टप्प्यात ४९ ग्रामपंचायती अनुदानासाठी पात्र ठरल्या. मात्र, निधीअभावी त्यांचे हे प्रस्ताव सध्या रखडलेले आहेत. अशा रखडलेल्या प्रस्तावांचे काय करायचे, याबाबत आता वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असून, निधीअभावी ही कामे रोखली जाऊ नयेत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. खेड तालुक्यातील केवळ ४९ ग्रामपंचायती या योजनेसाठी पात्र ठराव्यात, हे चित्र शोभादायक नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)