शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

खेडमध्ये निधी नाही; विकास खुंटला

By admin | Updated: July 10, 2015 22:23 IST

पर्यावरण समृद्धी : ४९ ग्रामपंचायती पात्र

खेड : तालुक्यातील ११४पैकीकेवळ ४९ ग्रामपंचायती शासनाच्या पर्यावरण संतुलित ग्रामसमृध्दी योजनेअंतर्गत पात्र ठरल्या आहेत, तर ६५ ग्रामपंचायतींचे प्रस्ताव अद्याप रखडले आहेत. निधीअभावी ही स्थिती उद्भवली असल्याचे सांगण्यात येत आहे़पर्यावरण संतुलित ग्रामसमृध्दी योजनेअंतर्गत राबवण्यात येत असलेल्या विविध विकासकामांच्या योजनेतूनच ग्रामपंचायतीअंतर्गत विकास करण्याची शासनाची संकल्पना आहे. अशा कामांच्या माध्यमातून गावाचा विकास साधायचा आहे. पंचायत राज व्यवस्थेतील अखेरचा टप्पा असलेल्या ग्रामीण भागाचा विकास करण्याकडे सध्या राज्य सरकारने आपले लक्ष केंद्रीत केले आहे. दोन्ही सरकारने आता गावाचा विकास साधण्याच्या अनेक योजना मूर्त स्वरूपात आणल्याने ग्रामपंचायतींना विशेष अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. गावातील अनेक ठिकाणी पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे. याकरिता पोषक वातावरण निर्माण व्हावे, यातूनच ग्रामीण भागाचा विकास होऊन पर्यावरण संतुलन राखणे सोपे व्हावे, या उद्देशाने ही योजना प्रभाविपणे राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.या योजनेअंतर्गत खेड तालुक्यातील ११४ ग्रामपंचायती पात्र ठरल्या होत्या. यावरून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. याच धर्तीवर आता यावर्षी तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतींचे प्रस्ताव २४ नोव्हेंबर २०१४ रोजी पंचायत समितीमार्फत पाठविण्यात आले होते. मात्र, त्यास अद्याप मंजुरी मिळाली नाही. तिसऱ्या टप्प्यात ४९ ग्रामपंचायती अनुदानासाठी पात्र ठरल्या. मात्र, निधीअभावी त्यांचे हे प्रस्ताव सध्या रखडलेले आहेत. अशा रखडलेल्या प्रस्तावांचे काय करायचे, याबाबत आता वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असून, निधीअभावी ही कामे रोखली जाऊ नयेत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. खेड तालुक्यातील केवळ ४९ ग्रामपंचायती या योजनेसाठी पात्र ठराव्यात, हे चित्र शोभादायक नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)