शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

खेडमध्ये निधी नाही; विकास खुंटला

By admin | Updated: July 10, 2015 22:23 IST

पर्यावरण समृद्धी : ४९ ग्रामपंचायती पात्र

खेड : तालुक्यातील ११४पैकीकेवळ ४९ ग्रामपंचायती शासनाच्या पर्यावरण संतुलित ग्रामसमृध्दी योजनेअंतर्गत पात्र ठरल्या आहेत, तर ६५ ग्रामपंचायतींचे प्रस्ताव अद्याप रखडले आहेत. निधीअभावी ही स्थिती उद्भवली असल्याचे सांगण्यात येत आहे़पर्यावरण संतुलित ग्रामसमृध्दी योजनेअंतर्गत राबवण्यात येत असलेल्या विविध विकासकामांच्या योजनेतूनच ग्रामपंचायतीअंतर्गत विकास करण्याची शासनाची संकल्पना आहे. अशा कामांच्या माध्यमातून गावाचा विकास साधायचा आहे. पंचायत राज व्यवस्थेतील अखेरचा टप्पा असलेल्या ग्रामीण भागाचा विकास करण्याकडे सध्या राज्य सरकारने आपले लक्ष केंद्रीत केले आहे. दोन्ही सरकारने आता गावाचा विकास साधण्याच्या अनेक योजना मूर्त स्वरूपात आणल्याने ग्रामपंचायतींना विशेष अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. गावातील अनेक ठिकाणी पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे. याकरिता पोषक वातावरण निर्माण व्हावे, यातूनच ग्रामीण भागाचा विकास होऊन पर्यावरण संतुलन राखणे सोपे व्हावे, या उद्देशाने ही योजना प्रभाविपणे राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.या योजनेअंतर्गत खेड तालुक्यातील ११४ ग्रामपंचायती पात्र ठरल्या होत्या. यावरून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. याच धर्तीवर आता यावर्षी तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतींचे प्रस्ताव २४ नोव्हेंबर २०१४ रोजी पंचायत समितीमार्फत पाठविण्यात आले होते. मात्र, त्यास अद्याप मंजुरी मिळाली नाही. तिसऱ्या टप्प्यात ४९ ग्रामपंचायती अनुदानासाठी पात्र ठरल्या. मात्र, निधीअभावी त्यांचे हे प्रस्ताव सध्या रखडलेले आहेत. अशा रखडलेल्या प्रस्तावांचे काय करायचे, याबाबत आता वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असून, निधीअभावी ही कामे रोखली जाऊ नयेत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. खेड तालुक्यातील केवळ ४९ ग्रामपंचायती या योजनेसाठी पात्र ठराव्यात, हे चित्र शोभादायक नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)