शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

पाठ्यपुस्तकातील कवी, लेखक भेटीला

By admin | Updated: December 1, 2014 00:07 IST

कवी, लेखकांबरोबर संवाद साधण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. कविता विद्यार्थ्यांसमोर सादर केली

मंदार गोयथळे- असगोली - उर्विमाला साहित्य नगरीतील मसापच्या जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवसातील पहिल्या सत्रात पाठ्यपुस्तकातील कवी, लेखक विद्यार्थ्यांच्या भेटीला या कार्यक्रमात विद्यार्थी कवी व लेखकांच्या संवादाने चांगलीच रंगत आणली. यामधून विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील विविध लेखक व कवी यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधता आला. यावेळी इंद्रजीत भालेराव यांच्या इयत्ता पाचवीतील ‘बाप’ या कवितेमधून विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकातील बाप खऱ्या अर्थाने उलगडला.साहित्य संमेलनात रविवार हा सुटीचा दिवस असल्याने विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तकातील कवी, लेखक विद्यार्थ्यांच्या भेटीला हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यामध्ये सुहास बारटक्के, इंद्रजीत भालेराव, अशोक बागवे, भास्कर बडे यांच्यासारख्या कवी, लेखकांबरोबर संवाद साधण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. प्रत्येक कवी, लेखकाने पाठ्यपुस्तकातील आपली कविता विद्यार्थ्यांसमोर सादर केली. प्रा. सुहास बारटक्के यांनी आपली पाठ्यपुस्तकातील कविता विद्यार्थ्यांसमोर सादर करत आपल्या लेखनात कोकणच्या निसर्गसौंदर्याला अधिक महत्त्व देण्यात आल्याचे सांगितले. कोकणातील माणसे, निसर्ग, पाहण्यासारखे आहे आणि याच कोकणावर मी खूप काही लिहिले. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्हीदेखील या निसर्गसौंदर्याचा लाभ उठवून लेखनीला सुरुवात करा. यातूनच भविष्यात तुमच्यातील मोठा साहित्यिक निर्माण होईल, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना दिले.इंद्रजीत भालेराव यांनी आपला लेखन क्षेत्रातील प्रवास उपस्थित विद्यार्थ्यांसमोर मांडताना इयत्ता पाचवीच्या पाठ्यपुस्तकातील ‘बाप’ या कवितेतील खरा-खुरा बाप उलगडून दाखवला. शेतामधील माझी खोपटीला बोराटीची झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप...’ माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा, त्याच्या माथी लिहिलेल्या कायमचा धंदा’ या त्यांच्या कवितेच्या ओळींनी शेतकऱ्याचे जीवनपट उलगडला. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या भेटीला आलेल्या पाठ्यपुस्तकातील कवी, लेखकांशी प्रश्नोत्तराने थेट संवाद साधला. यामध्ये प्रश्न वैशाली कानसे इयत्ता अकरावी पाटपन्हाळे महाविद्यालय-काही कवी सुख- दु:खाचे, तर काही प्रेमाच्या कविता लिहितात, त्यांनी हे प्रसंग अनुभवलेले असतात का? यावर भास्कर बडे यांनी प्रत्येक कवी व लेखक हा घडणाऱ्या वास्तवाचा आधार घेऊनच कविता घडते. यामुळे कवी त्या प्रसंगातून काहीअंशी जातोच, असे उत्तर दिले. प्रश्न निवेदिता कोपरकर पालशेत विद्यालय - तुम्हाला तुमच्या घरी एक लेखक किंवा कवी म्हणून राहायला आवडते की, वडील म्हणून राहायला आवडते? प्रा. इंद्रजीत भालेराव - मला लिखाणामुळे घरी योग्य प्रमाणात वेळ देता आलेला नाही. त्यामुळे वडील ही भूमिका तितक्याशा चांगल्या प्रमाणात पार पाडता आलेली नाही. प्रश्न अनिकेत पवार, गुहागर महाविद्यालय, लिहिण्यासाठी सर्वांत मोठा पुरस्कार व तो कसा मिळतो? यावर ज्येष्ठ साहित्यिक व कवी अशोक बागवे म्हणाले की, वाचकांकडून मिळणारा प्रतिसाद हाच पुरस्कार इतर पुरस्कारापेक्षा कवी व लेखकाला मोठा असतो. (वार्ताहर)