शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

पाठ्यपुस्तकातील कवी, लेखक भेटीला

By admin | Updated: December 1, 2014 00:07 IST

कवी, लेखकांबरोबर संवाद साधण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. कविता विद्यार्थ्यांसमोर सादर केली

मंदार गोयथळे- असगोली - उर्विमाला साहित्य नगरीतील मसापच्या जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवसातील पहिल्या सत्रात पाठ्यपुस्तकातील कवी, लेखक विद्यार्थ्यांच्या भेटीला या कार्यक्रमात विद्यार्थी कवी व लेखकांच्या संवादाने चांगलीच रंगत आणली. यामधून विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील विविध लेखक व कवी यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधता आला. यावेळी इंद्रजीत भालेराव यांच्या इयत्ता पाचवीतील ‘बाप’ या कवितेमधून विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकातील बाप खऱ्या अर्थाने उलगडला.साहित्य संमेलनात रविवार हा सुटीचा दिवस असल्याने विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तकातील कवी, लेखक विद्यार्थ्यांच्या भेटीला हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यामध्ये सुहास बारटक्के, इंद्रजीत भालेराव, अशोक बागवे, भास्कर बडे यांच्यासारख्या कवी, लेखकांबरोबर संवाद साधण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. प्रत्येक कवी, लेखकाने पाठ्यपुस्तकातील आपली कविता विद्यार्थ्यांसमोर सादर केली. प्रा. सुहास बारटक्के यांनी आपली पाठ्यपुस्तकातील कविता विद्यार्थ्यांसमोर सादर करत आपल्या लेखनात कोकणच्या निसर्गसौंदर्याला अधिक महत्त्व देण्यात आल्याचे सांगितले. कोकणातील माणसे, निसर्ग, पाहण्यासारखे आहे आणि याच कोकणावर मी खूप काही लिहिले. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्हीदेखील या निसर्गसौंदर्याचा लाभ उठवून लेखनीला सुरुवात करा. यातूनच भविष्यात तुमच्यातील मोठा साहित्यिक निर्माण होईल, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना दिले.इंद्रजीत भालेराव यांनी आपला लेखन क्षेत्रातील प्रवास उपस्थित विद्यार्थ्यांसमोर मांडताना इयत्ता पाचवीच्या पाठ्यपुस्तकातील ‘बाप’ या कवितेतील खरा-खुरा बाप उलगडून दाखवला. शेतामधील माझी खोपटीला बोराटीची झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप...’ माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा, त्याच्या माथी लिहिलेल्या कायमचा धंदा’ या त्यांच्या कवितेच्या ओळींनी शेतकऱ्याचे जीवनपट उलगडला. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या भेटीला आलेल्या पाठ्यपुस्तकातील कवी, लेखकांशी प्रश्नोत्तराने थेट संवाद साधला. यामध्ये प्रश्न वैशाली कानसे इयत्ता अकरावी पाटपन्हाळे महाविद्यालय-काही कवी सुख- दु:खाचे, तर काही प्रेमाच्या कविता लिहितात, त्यांनी हे प्रसंग अनुभवलेले असतात का? यावर भास्कर बडे यांनी प्रत्येक कवी व लेखक हा घडणाऱ्या वास्तवाचा आधार घेऊनच कविता घडते. यामुळे कवी त्या प्रसंगातून काहीअंशी जातोच, असे उत्तर दिले. प्रश्न निवेदिता कोपरकर पालशेत विद्यालय - तुम्हाला तुमच्या घरी एक लेखक किंवा कवी म्हणून राहायला आवडते की, वडील म्हणून राहायला आवडते? प्रा. इंद्रजीत भालेराव - मला लिखाणामुळे घरी योग्य प्रमाणात वेळ देता आलेला नाही. त्यामुळे वडील ही भूमिका तितक्याशा चांगल्या प्रमाणात पार पाडता आलेली नाही. प्रश्न अनिकेत पवार, गुहागर महाविद्यालय, लिहिण्यासाठी सर्वांत मोठा पुरस्कार व तो कसा मिळतो? यावर ज्येष्ठ साहित्यिक व कवी अशोक बागवे म्हणाले की, वाचकांकडून मिळणारा प्रतिसाद हाच पुरस्कार इतर पुरस्कारापेक्षा कवी व लेखकाला मोठा असतो. (वार्ताहर)