शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

पाठ्यपुस्तकांची रद्दी कवडीमोलाने

By admin | Updated: April 12, 2017 15:41 IST

कचऱ्यातून पोटाची खळगी भरतात, रद्दीचा व्यवसाय तेजीत, पाठ्यपुस्तके ५ ते ६ रुपये किलोने विक्री

आॅनलाईन लोकमतरहिम दलाल/ रत्नागिरी, दि. १२ विद्येचे आचरण करुन आयुष्य घडविणारी पाठ्यपुस्तके, वह्या शैक्षणिक वर्ष पूर्ण झाल्याने त्यांची रद्दी कवडीच्या भावात विकली जात आहेत. त्यासाठी घरोघरी रद्दीवाले फिरत असून त्यांचा धंदा सध्या तेजीत चालला आहे.पोटाची खळगी भरण्यासाठी कचऱ्यातून पैशाची कमाई केली जाते. या पोटासाठी झोपडपट्टी राहणारी अनेक कुटुंबीय कचऱ्यावर आपले जीवन जगत आहेत. त्यासाठी अनेक महिला व पुरुष पहाटे उठून कचराकुंड्या तसेच रस्त्यावर पडलेली रिकाम्या बाटल्या, प्लॅस्टिकच्या पिशवा, पुठे्ठे साठवून त्याची विक्री करतात. त्यावरच शेकडो कुटुंबीयांची गुजराण केली जात आहे. झोपडपट्टीशिवाय उच्चभू वस्तीत राहणारेही भंगारातून मोठी कमाई करीत आहेत. शहर परिसरातून कचरातून साठवून आणलेले प्लस्टिक पिशव्या, बाटल्या, पुठ्ठे विकत घेऊन ते मुंबई व अन्य बड्या शहरातील कारखान्यांमध्ये पाठविण्यात येतात. त्यामुळे लाखोंची कमाई करण्यात येत आहे. मात्र, त्यासाठी काबाडकष्ट करण्यास ही मंडळी मागे पहात नाहीत, हे विशेष आहे.मुलांच्या परिक्षा आटोपल्याने अनेक पालक त्यांची पुस्तके, वह्या घरात साठवून न ठेवता ती रद्दी म्हणून काढण्यास सुरुवात केली आहे. शहरातील हजारो रुपये किंमतीची पाठ्यपुस्तके, वह्या किरकोळ किंमतीत किलोवर विकले जात आहेत. पाच ते सहा रुपये किलो भावाने ही रद्दी विकण्यात येत आहे. त्यासाठी झोपडपट्टीत राहणारे पुरुष, महिला शहरातील कॉलनी, वाड्यांमध्ये सायकलवरुन फिरुन रद्दी गोळा करीत आहेत. वर्षभर पावसाच्या पाण्यापासून जपून, तसेच अन्य कारणाने ती खराब होण्यापासून आपल्या जीवा पलिकडे वापरण्यात येणारी पाठ्यपुस्तके, वह्या अगदी रद्दीच्या भावात विकली जात आहेत. त्यातून दररोज हजारो रुपयांची उलाढाल होत आहे. त्यामुळे रद्दी खरेदीचा व्यवसायाला सध्या तेजी आली आहे. दहावी, बारावीनंतर बहुतांश खासगी प्राथमिक, माध्यमिक शाळांच्या परीक्षा संपल्या असल्याने काही शाळांना सुट्टीही पडली आहे. वर्षभर जपणूक केलेली पाठ्यपुस्तके रद्दीमध्ये काढून सायकलवरुन गल्लोगल्ली फिरती करणाऱ्या रद्दी खरेदी करणाऱ्यांना कवडीमोलाने विकली जात आहेत.