शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी प्रवेशासाठी कसोटी!

By admin | Updated: June 19, 2014 01:12 IST

डोकेदुखी वाढली : दहा हजार विद्यार्थी ठरणार अतिरिक्त ?

रत्नागिरी : दहावीच्या निकालाने संपवलेली विद्यार्थ्यांच्या हृदयाची धडधड आता अकरावीसाठी प्रवेश मिळवताना पुन्हा वाढणार आहे. दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यातील २६ हजार ५२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मात्र अकरावीसाठी जिल्ह्यामध्ये प्रवेश क्षमता १६ हजार ३२० इतकी आहे. त्यामुळे प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची कसोटी लागणार आहे. विद्यार्थी क्षमता पाहता दहा हजार विद्यार्थी अतिरिक्त ठरणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातून दहावीच्या परीक्षेसाठी २७ हजार ८७७ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २६ हजार ५२३ विद्यार्थी पास झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात ३८६ माध्यमिक शाळा आहेत. स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालये ४, वरिष्ठ महाविद्यालयाशी संलग्न ६ तर माध्यमिक शाळांशी संलग्न १०९ मिळून जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयाची संख्या १०९ इतकी आहे. कनिष्ठ महाविद्यालयातील कला, वाणिज्य, विज्ञान व संयुक्त मिळून एकूण २८४ तुकड्यांमध्ये १६ हजार ३२० विद्यार्थी क्षमता आहे. कला विभागाच्या एकूण ८० तुकड्या असून ४ हजार १८० विद्यार्थी संख्या आहे. वाणिज्य विभागाच्या ८५ ५ हजार ८० विद्यार्थी संख्या आहे. विज्ञान विभागाच्या ७८ तुकड्या असून, ४ हजार ५८० विद्यार्थी संख्या आहे. विज्ञान विभागाकडे विद्यार्थ्यांचा ओढा अधिक असल्यामुळे प्रवेशासाठी सर्वाधिक कसोटी लागते. संयुक्त विभागाच्या ४१ तुकड्या असून २ हजार ४८० विद्यार्थी संख्या आहे. एका तुकडीत ८० ते १०० विद्यार्थी संख्या सामावून घेण्यात येते. त्यामुळे कला विभागामध्ये ६ हजार ५८०, वाणिज्य विभागात ७ हजार ८०, विज्ञान विभागात ६ हजार ४४०, संयुक्त विभागात ३ हजार ३०० विद्यार्थ्यांना प्रवेश देता येऊ शकतो. तरीही ३१२३ विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न उद्भवू शकतो. काही विद्यार्थी पॉलिटेक्नीकल किंवा काही आयटीआयमध्ये प्रवेश घेत असल्यामुळे सुमारे हजार विद्यार्थी पॉलिटेक्नीकल किंवा आयटीआयमध्ये सामावू शकतात. उर्वरित दोन हजार विद्यार्थ्यापुढे मात्र मोठा प्रश्न आहे. काही विद्यार्थी मुंबई, पुण्याकडे प्रवेशासाठी जात असले तरी ग्रामीण भागातील अन्य विद्यार्थ्यासमोर मात्र प्रवेशाचा प्रश्न उदभवणार आहे. गुणवत्तानिहाय प्रवेश देण्यात येत असल्यामुळे तसेच वरिष्ठ महाविद्यालयाशी संलग्न कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेशासाठी विद्यार्थी पालकांचा ओढा सर्वाधिक असल्याने तेथील प्रवेश प्रक्रिया बिकट बनते किंबहुना लांबत आहे. बहुतांश विद्यार्थ्यांना विशिष्ट महाविद्यालयात प्रवेश हवा असल्याने कुठे अतिरिक्त गर्दी तर कुठे जागा रिक्त असे चित्रही गेल्या काही वर्षात रत्नागिरी, चिपळूणमध्ये दिसले आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आणि समाधानकारक गुण मिळाल्यानंतर आनंदाने हरखून गेलेल्या विद्यार्थ्यांना आता अकरावी आणि त्यातही विज्ञान शाखेत प्रवेश मिळवायचा असेल तर झगडावे लागणार आहे. निकालानंतर लगेचच अकरावीची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली असून विज्ञान शाखेकडे विद्यार्थ्यांचा अधिक कल असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.(प्रतिनिधी)