शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
3
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
4
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
5
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
6
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
7
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
8
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
9
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
10
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
11
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
12
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
13
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
14
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
15
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
16
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
17
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
18
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
19
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
20
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार

अकरावी प्रवेशासाठी कसोटी!

By admin | Updated: June 19, 2014 01:12 IST

डोकेदुखी वाढली : दहा हजार विद्यार्थी ठरणार अतिरिक्त ?

रत्नागिरी : दहावीच्या निकालाने संपवलेली विद्यार्थ्यांच्या हृदयाची धडधड आता अकरावीसाठी प्रवेश मिळवताना पुन्हा वाढणार आहे. दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यातील २६ हजार ५२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मात्र अकरावीसाठी जिल्ह्यामध्ये प्रवेश क्षमता १६ हजार ३२० इतकी आहे. त्यामुळे प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची कसोटी लागणार आहे. विद्यार्थी क्षमता पाहता दहा हजार विद्यार्थी अतिरिक्त ठरणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातून दहावीच्या परीक्षेसाठी २७ हजार ८७७ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २६ हजार ५२३ विद्यार्थी पास झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात ३८६ माध्यमिक शाळा आहेत. स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालये ४, वरिष्ठ महाविद्यालयाशी संलग्न ६ तर माध्यमिक शाळांशी संलग्न १०९ मिळून जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयाची संख्या १०९ इतकी आहे. कनिष्ठ महाविद्यालयातील कला, वाणिज्य, विज्ञान व संयुक्त मिळून एकूण २८४ तुकड्यांमध्ये १६ हजार ३२० विद्यार्थी क्षमता आहे. कला विभागाच्या एकूण ८० तुकड्या असून ४ हजार १८० विद्यार्थी संख्या आहे. वाणिज्य विभागाच्या ८५ ५ हजार ८० विद्यार्थी संख्या आहे. विज्ञान विभागाच्या ७८ तुकड्या असून, ४ हजार ५८० विद्यार्थी संख्या आहे. विज्ञान विभागाकडे विद्यार्थ्यांचा ओढा अधिक असल्यामुळे प्रवेशासाठी सर्वाधिक कसोटी लागते. संयुक्त विभागाच्या ४१ तुकड्या असून २ हजार ४८० विद्यार्थी संख्या आहे. एका तुकडीत ८० ते १०० विद्यार्थी संख्या सामावून घेण्यात येते. त्यामुळे कला विभागामध्ये ६ हजार ५८०, वाणिज्य विभागात ७ हजार ८०, विज्ञान विभागात ६ हजार ४४०, संयुक्त विभागात ३ हजार ३०० विद्यार्थ्यांना प्रवेश देता येऊ शकतो. तरीही ३१२३ विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न उद्भवू शकतो. काही विद्यार्थी पॉलिटेक्नीकल किंवा काही आयटीआयमध्ये प्रवेश घेत असल्यामुळे सुमारे हजार विद्यार्थी पॉलिटेक्नीकल किंवा आयटीआयमध्ये सामावू शकतात. उर्वरित दोन हजार विद्यार्थ्यापुढे मात्र मोठा प्रश्न आहे. काही विद्यार्थी मुंबई, पुण्याकडे प्रवेशासाठी जात असले तरी ग्रामीण भागातील अन्य विद्यार्थ्यासमोर मात्र प्रवेशाचा प्रश्न उदभवणार आहे. गुणवत्तानिहाय प्रवेश देण्यात येत असल्यामुळे तसेच वरिष्ठ महाविद्यालयाशी संलग्न कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेशासाठी विद्यार्थी पालकांचा ओढा सर्वाधिक असल्याने तेथील प्रवेश प्रक्रिया बिकट बनते किंबहुना लांबत आहे. बहुतांश विद्यार्थ्यांना विशिष्ट महाविद्यालयात प्रवेश हवा असल्याने कुठे अतिरिक्त गर्दी तर कुठे जागा रिक्त असे चित्रही गेल्या काही वर्षात रत्नागिरी, चिपळूणमध्ये दिसले आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आणि समाधानकारक गुण मिळाल्यानंतर आनंदाने हरखून गेलेल्या विद्यार्थ्यांना आता अकरावी आणि त्यातही विज्ञान शाखेत प्रवेश मिळवायचा असेल तर झगडावे लागणार आहे. निकालानंतर लगेचच अकरावीची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली असून विज्ञान शाखेकडे विद्यार्थ्यांचा अधिक कल असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.(प्रतिनिधी)