शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

दहावी, बारावी बहि:स्थ विद्यार्थी प्रवेशप्रक्रिया १६ सप्टेंबरपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:36 IST

रत्नागिरी : दहावी, बारावी परीक्षेसाठी बहि:स्थ विद्यार्थ्यांना १७ नंबरचा अर्ज भरण्याकरिता दि. १६ सप्टेंबर ते दि. १२ ऑक्टोबरअखेर ...

रत्नागिरी : दहावी, बारावी परीक्षेसाठी बहि:स्थ विद्यार्थ्यांना १७ नंबरचा अर्ज भरण्याकरिता दि. १६ सप्टेंबर ते दि. १२ ऑक्टोबरअखेर ऑनलाइन पद्धतीने भरण्याची सूचना राज्य मंडळातर्फे करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने २०२२ मध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षेला खासगीरीत्या बसण्यासाठी १७ नंबरचा अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना दि.१६ सप्टेंबरपासून ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करता येणार असल्याची सूचना राज्य मंडळातर्फे करण्यात आले आहे.

राज्य मंडळाच्या परिपत्रकानुसार विद्यार्थ्यांना १६ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज आणि शुल्क भरायचे आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी भरलेला अर्ज, शुल्क भरल्याची पावती दोन प्रतीत, मूळ कागदपत्रे दि. १७ सप्टेंबर ते दि. १४ ऑक्टोबर या कालावधीत निवडलेल्या शाळा किंवा ज्युनिअर कॉलेजात जमा करायची आहे. विद्यार्थ्यांनी भरलेला अर्ज, शुल्काची पावती, मूळ कागदपत्रे आणि विद्यार्थ्यांची यादी विभागीय मंडळाकडे दि. १८ ऑक्टोबर रोजी जमा करायचे आहेत.

कोरोनामुळे दहावी आणि बारावीचा निकाल जुलै-ऑगस्टमध्ये जाहीर झाला असला तरी ऑनलाइन अर्ज नोंदणीत शाळा किंवा महाविद्यालय सोडल्याच्या दाखल्यावरील तारीख ३१ ऑगस्ट अशी ग्राह्य धरण्यात यावी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा बदल केवळ मार्च २०२२ या परीक्षेपुरता लागू राहणार आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या वयासाठी अंतिम तारीख दि. ३१ जुलै ग्राह्य धरण्यात येणार आहे, असे राज्य मंडळातर्फे सांगण्यात आले आहे.