शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

कारागृहातून पळून जाण्याचा प्लॅन होता दहा आरोपींचा..!

By admin | Updated: July 15, 2014 00:06 IST

पोलिसांमुळे तपासाला मिळाले यश

दापोली : रत्नागिरीच्या विशेष कारागृहातून पळालेल्या रितेश काशिनाथ कदम या दुसऱ्या आरोपीलाही दापोली पोलिसांनी गजाआड केले आहे. कारागृहातून पळून जाण्यासाठी १० कैद्यांनी एक प्लॅन केला होता. पण, प्रत्यक्षात दोनच कैदी पळून जाण्यात यशस्वी झाल्याची कबुली रितेश याने पोलीस तपासात दिली आहे.किरण मोरे या एका कैद्याला काही दिवसांपूर्वीच पनवेल येथे तो पत्नीला भेटण्यासाठी आला असताना पोलिसांनी झडप घालून पकडले होते. त्याचवेळी रितेश कदम हा पोलिसांना गुंगारा देत पळून जाण्यात यशस्वी ठरला. पनवेल येथून रितेश मुंबईतील आपल्या बहिणीकडे गेला. तिच्याकडून त्याने ५०० रुपये घेतले. ज्यावेळी तिला तो कारागृहातून पळून आल्याची माहिती मिळाली, त्यावेळी तिने त्याला हाकलून दिले. त्यानंतर कदम हा लपतलपत आपल्या गावी केळकर आंबवली, पोस्ट केळशी येथे पोहोचला.पोलिसांना चकवा देणारा रितेश हा गावी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यांनी सापळा रचला. कधी घरात, तर कधी रानात तो आपले वास्तव्य करीत होता. १३ जुलै रोजी तो आपल्या घरी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी यादव, नवनाथ जगताप, पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रकाश जाधव, विष्णू गिम्हवणेकर, उदय भोसले, शिवराज दिवाळे, राजू मोहिते, मंगेश शिगवण, संदेश गुजर, अनुप पाटील व आंब्रे यांच्या पथकाने त्याच्या घराभोवती सापळा रचून त्याला अटक केली.मध्यरात्री २.३० वाजता अटक केल्यानंतर त्याला दापोली पोलीस ठाण्यात आणण्यात आले. चौकशीअंती रितेश कदम व किरण मोरे याच्यासह अन्य आठजणांनी कारागृहातून पळून जाण्याचा प्लॅन केल्याचे पुढे आले आहे. मात्र, ठरलेल्या प्लॅनप्रमाणे केवळ दोघेजणच कारागृहातून पळून जाण्यात यशस्वी झाले. या दोघांनीही परस्परांची साथ करतच रत्नागिरीतून पोबारा केला. पनवेलपर्यंत हे दोघेही परस्परांच्या साथीनेच होते. त्यानंतर किरण हा पोलिसांच्या हाती लागला आणि त्यानंतर रितेशचा एकट्याचा प्रवास सुरू झाला.पळून जाण्यासाठी दरवाजाची बनावट किल्ली या आरोपींच्या हाती घटनेपूर्वी दोन दिवस अगोदरच लागली होती. त्यानंतर त्यांनी सुरक्षा यंत्रणेचा कानोसा घेत प्लॅन रचला. त्यांच्या सुदैवाने तो पूर्णही झाला. मात्र, दापोली पोलिसांच्या दक्षतेमुळे पुन्हा हे दोघेही आरोपी गजाआड गेले आहेत. (प्रतिनिधी)