शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

दूरसंचारची वातानुकूलन यंत्र अस्वच्छ

By admin | Updated: July 15, 2014 00:16 IST

यंत्रात बिघाड झाल्याचे कारण

शृंगारतळी : गुहागर तालुक्यातील शृंगारतळी दूरध्वनी केंद्राच्या वातानुकूलन यंत्राची सुरक्षा व स्वच्छतेकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. दरम्यान, बीएसएनएल मोबाईल सेवा कोलमडल्यानंतर मात्र यंत्रे बिघडल्याची कारणे सांगितली जात असल्याने ग्राहकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.काही महिन्यांपूर्वी शृंगारतळी येथे बीएसएनएलची थ्रीजी सेवा सुरू करण्यात आली. त्यामुळे काही प्रमाणात इंटरनेटचा वेग वाढला आहे. मात्र, शृंगारतळी येथे बीएसएनएलव्यतिरीक्त टाटा डोकोमो, एअरटेल, आयडिया, वोडाफोन या खासगी कंपन्यांच्या मोबाईल सेवा उपलब्ध आहेत. त्यामुळे खासगी कंपन्यांपेक्षा उत्तम सेवा देण्यासाठी सरकारी सेवेला तत्पर राहण्याची गरज आहे. आगामी काळात आणखीन एक कंपनी मार्केटमध्ये उतरत आहे. एखादी नवीन कंपनी आली की, सरकारी ‘रेंज’ आपोआप गायब होण्यास सुरूवात होते.बीएसएनएल सेवा बंद असल्याची विचारणा केल्यास यंत्रात बिघाड झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे बीएसएनएल शृृंंगारतळी दूरध्वनी केंद्राच्या वातानुकूलन महागड्या यंत्राच्या देखभाल व सुरक्षिततेकडे लक्ष देण्याची गरज आहे. या भागात असलेल्या बीएसएनएलच्या सेवेबाबत अनेकवेळा तक्रारी करण्यात आल्या. मात्र, याबाबत कोणत्याही प्रकारे दखल घेण्यात आलेली नाही. आता वातानुकूलन अस्वच्छ झाले. (वार्ताहर)