शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शिक्षकदिनीच शिक्षकांचा आत्मदहनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:32 IST

वाटूळ : कनिष्ठ महाविद्यालयातील सन २००३ ते २०१९ दरम्यानच्या वाढीव पदांवरील शिक्षकांनी अनेकदा निवेदने, आझाद मैदानात आंदोलने करूनही शासनाकडून ...

वाटूळ : कनिष्ठ महाविद्यालयातील सन २००३ ते २०१९ दरम्यानच्या वाढीव पदांवरील शिक्षकांनी अनेकदा निवेदने, आझाद मैदानात आंदोलने करूनही शासनाकडून आश्वासनाव्यतिरिक्त काहीच पदरी पडलेले नाही. १०/१५ वर्षे विनावेतन काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अशक्य असल्याने हतबल झालेल्या शिक्षकांनी शिक्षकदिनी सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी शिक्षण संचालक आणि शिक्षक आमदारांना दिले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, सन २००३ ते २०११ दरम्यानची व्यपगत पदे, २०१०/११ पूर्वीची उपसंचालक कार्यालयातील नजरचुकीने मान्यता राहिलेली वाढीव पदे आणि २०११ पासूनची वाढीव पदे अशा एकूण १२९८ पदांचा प्रस्ताव मागील अनेक वर्षे शासन मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे. या पदांवर कार्यरत शिक्षकांना मागील १०/१५ वर्षे पूर्णतः विनावेतन काम करताना एकेक दिवस कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेही अशक्य झाले आहे. आपल्या पदांना मान्यता मिळेल या भोळ्या आशेवर हे शिक्षक विद्यार्थ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून अतिशय प्रामाणिकपणे विद्यादानाचे कार्य करीत आहेत.

शासनाकडून वारंवार वेगवेगळ्या प्रकारे माहिती मागवून मान्यतेच्या प्रक्रियेमध्ये होत असलेल्या वेळकाढूपणाला कंटाळून हतबल झालेल्या वाढीव पदावरील शिक्षकांनी २६ जुलै रोजी संचालक कार्यालयात एकत्र येऊन १५ ऑगस्ट रोजी आपल्या समस्येकडे शासनाचे लक्ष्य वेधण्यासाठी आत्मक्लेश आंदोलन करणार असल्याचे म्हटले आहे, तसेच दि. ३० ऑगस्टपर्यंत वाढीव पदांना मान्यता मिळाली नाही, तर दि. ५ सप्टेंबर शिक्षकदिनी वाढीव पदावरील शिक्षक नाइलाजाने आत्मदहन करणार असल्याचे म्हटले आहे. या अन्यायग्रस्त शिक्षकांना शासनाने त्वरित वाढीव पदांना मान्यता देऊन न्याय द्यावा, अशी मागणी कनिष्ठ महाविद्यालयीन वाढीव पदावरील शिक्षकांनी केली आहे