शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

आवश्यक ती खबरदारी घेत २५ जणांच्या उपस्थितीत पालखी घरोघरी नेता येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:32 IST

रत्नागिरी : जिल्हा प्रशासनाने शिमगोत्सवाच्या अनुषंगाने काढलेल्या नियमावलीत थोडा बदल केला असून, त्यानुसार आता सर्व निर्बंध पाळून संबंधित उपविभागीय ...

रत्नागिरी : जिल्हा प्रशासनाने शिमगोत्सवाच्या अनुषंगाने काढलेल्या नियमावलीत थोडा बदल केला असून, त्यानुसार आता सर्व निर्बंध पाळून संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांची परवानगी घेऊन पालखी २५ लोकांच्या उपस्थितीत घरोघरी नेता येईल. मात्र, या २५ लोकांची कोरोना चाचणी करून घेणे अनिवार्य असल्याचे या शुद्धीपत्रात नमूद करण्यात आले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात शिमगा उत्सवाच्या अनुषंगाने ११ मार्च रोजी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आदेश निर्गमित केले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शिमगोत्सवाकरिता मुंबई-पुण्यावरून नागरिक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यात शिमगा उत्सव, होळी उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या होत्या. त्यानुसार सर्व मंदिर विश्वस्त व पालखीधारक यांनी लगतच्या आरोग्य यंत्रणेकडून आरोग्यविषयक चाचणी करून घेणे बंधनकारक केले आहे. सर्व मंदिर विश्वस्त व्यवस्थापक पदाधिकारी यांनी मोजक्या लोकांच्या उपस्थितीतच स्थानिक ग्रामदेवतेच्या पालखीला रूपे लावणे, सजविणे, बंधनकारक राहील, असे आदेशात नमूद केले होते.

२५ ग्रामस्थ व मानकऱ्यांच्या उपस्थितीत पालखी परंपरेनुसार भेटीसाठी जाईल. कोणत्याही परिस्थितीत ५० लोकांपेक्षा जास्त लोक जमा होणार नाहीत याची दक्षता मंदिर विश्वस्त, व्यवस्थापक, ग्रामस्थ, मानकरी, नागरी व ग्राम कृती दल यांनी घ्यावी. होळी व पालखीची पूजा, नवस, हार, नारळ आदी स्वरूपात स्वीकारु नयेत तसेच प्रसाद वाटपही करू नये, अशा सूचनाही देण्यात आल्या होत्या. कोरोनाच्या अनुषंगाने खबरदारीची उपाययोजना म्हणून पालखी घरोघरी नेण्यास मनाई करण्यात आली होती. मात्र, जिल्हाधिकारी यांनी मंगळवारी शुद्धिपत्रक काढून संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांची परवानगी घेऊन पालखी २५ लोकांच्या उपस्थितीत घरोघरी नेता येईल. मात्र, या २५ लोकांची कोरोनाच्या अनुषंगाने योग्य ती आरोग्यविषयक चाचणी करून घेणे आवश्यक राहील, असे सुधारित आदेशात नमूद केले आहे.