शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

आवश्यक ती खबरदारी घेत २५ जणांच्या उपस्थितीत पालखी घरोघरी नेता येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:32 IST

रत्नागिरी : जिल्हा प्रशासनाने शिमगोत्सवाच्या अनुषंगाने काढलेल्या नियमावलीत थोडा बदल केला असून, त्यानुसार आता सर्व निर्बंध पाळून संबंधित उपविभागीय ...

रत्नागिरी : जिल्हा प्रशासनाने शिमगोत्सवाच्या अनुषंगाने काढलेल्या नियमावलीत थोडा बदल केला असून, त्यानुसार आता सर्व निर्बंध पाळून संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांची परवानगी घेऊन पालखी २५ लोकांच्या उपस्थितीत घरोघरी नेता येईल. मात्र, या २५ लोकांची कोरोना चाचणी करून घेणे अनिवार्य असल्याचे या शुद्धीपत्रात नमूद करण्यात आले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात शिमगा उत्सवाच्या अनुषंगाने ११ मार्च रोजी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आदेश निर्गमित केले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शिमगोत्सवाकरिता मुंबई-पुण्यावरून नागरिक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यात शिमगा उत्सव, होळी उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या होत्या. त्यानुसार सर्व मंदिर विश्वस्त व पालखीधारक यांनी लगतच्या आरोग्य यंत्रणेकडून आरोग्यविषयक चाचणी करून घेणे बंधनकारक केले आहे. सर्व मंदिर विश्वस्त व्यवस्थापक पदाधिकारी यांनी मोजक्या लोकांच्या उपस्थितीतच स्थानिक ग्रामदेवतेच्या पालखीला रूपे लावणे, सजविणे, बंधनकारक राहील, असे आदेशात नमूद केले होते.

२५ ग्रामस्थ व मानकऱ्यांच्या उपस्थितीत पालखी परंपरेनुसार भेटीसाठी जाईल. कोणत्याही परिस्थितीत ५० लोकांपेक्षा जास्त लोक जमा होणार नाहीत याची दक्षता मंदिर विश्वस्त, व्यवस्थापक, ग्रामस्थ, मानकरी, नागरी व ग्राम कृती दल यांनी घ्यावी. होळी व पालखीची पूजा, नवस, हार, नारळ आदी स्वरूपात स्वीकारु नयेत तसेच प्रसाद वाटपही करू नये, अशा सूचनाही देण्यात आल्या होत्या. कोरोनाच्या अनुषंगाने खबरदारीची उपाययोजना म्हणून पालखी घरोघरी नेण्यास मनाई करण्यात आली होती. मात्र, जिल्हाधिकारी यांनी मंगळवारी शुद्धिपत्रक काढून संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांची परवानगी घेऊन पालखी २५ लोकांच्या उपस्थितीत घरोघरी नेता येईल. मात्र, या २५ लोकांची कोरोनाच्या अनुषंगाने योग्य ती आरोग्यविषयक चाचणी करून घेणे आवश्यक राहील, असे सुधारित आदेशात नमूद केले आहे.