शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

दहावी, बारावी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:31 IST

वाटुळ : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आणि राज्यात सर्वत्र रात्रीची संचारबंदी, दिवसा जमावबंदी ...

वाटुळ : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आणि राज्यात सर्वत्र रात्रीची संचारबंदी, दिवसा जमावबंदी लागू असल्याने दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घ्याव्यात, अशी मागणी शिक्षण क्रांती संघटनेचे राज्य अध्यक्ष सुधीर घागस यांनी केली आहे. तसे निवेदन त्यांनी शिक्षणमंत्र्यांना दिले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने १० वी व १२ वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे या कालावधीत होणार आहे तर बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे या कालावधीत प्रचलित पद्धतीने (ऑफलाईन) होणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने महाराष्ट्र शासनाने राज्यात रात्री संचारबंदी व दिवसा जमावबंदी लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागानेही पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना विनापरीक्षा पुढील वर्गात पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षा जीवापेक्षा महत्त्वाच्या नाहीत. यामुळे विद्यापीठानेही परीक्षांबाबत अद्याप कोणतेही धोरण जाहीर केलेले नाही, असे घागस यांनी निवेदनात म्हटले आहे.

सलग १ महिन्याच्या कालावधीत होणाऱ्या या परीक्षांदरम्यान अनेक विद्यार्थ्यांना व शिक्षकांना कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑफलाईन परीक्षेच्या निर्णयाचा फेरविचार करावा व राज्यातील लाखो विद्यार्थी व शिक्षकांना दिलासा द्यावा. याकरिता मोबाईल हँडसेटवर उपलब्ध होईल व विद्यार्थ्यांना घरबसल्या मर्यादित वेळेत उत्तरपत्रिका सोडविता येईल, अशा परीक्षेचे आयोजन करावे, अशी विनंती त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.