शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

युतीला स्वबळाची खुमखुमी

By admin | Updated: November 3, 2016 00:30 IST

काँग्रेसची नाईलाज आघाडी : जिल्हा परिषद, पंचायत समितीचे लक्ष्य ठेवून मुख्य पक्ष रणांगणात

 रत्नागिरी : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्यात चारही प्रमुख पक्ष नगर परिषद निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यासाठीच शिवसेना आणि भाजप या निवडणुकीत स्वबळ आजमावत आहेत आणि आतापर्यंत अनेकदा ठेचकाळल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मात्र आघाडी करण्याचे शहाणपण दाखवले आहे. विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजपमध्ये दरी पडली. ती नंतर वाढतच गेली आहे. आताच्या घडीला राज्यस्तरावर युतीचा निर्णय झाला असला तरी रत्नागिरी जिल्ह्यात मात्र युती करण्याबाबतची चर्चाही दोन्ही पक्षांनी केलेली नाही. रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना सर्वात ताकदवान आहे. संख्याबळाचा विचार केला तर दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी, तिसऱ्या क्रमांकावर भाजप आणि काँग्रेस चौथ्या क्रमांकावर आहे. आजवर शिवसेना-भाजपने सर्वच निवडणुका युती म्हणून लढवल्या आहेत. त्यामुळे १९९५पासून बहुतांश ठिकाणी युतीचेच प्राबल्य राहिले आहे. युतीला मिळालेले हे यश ‘युती’ म्हणूनच मिळाले आहे. ज्यावेळी युतीमध्ये फारकत झाली तेव्हा दोन्ही पक्षांना थोड्याफार प्रमाणात फटका बसला आहे. त्यातही भाजपला अधिक फटका बसला आहे. गुहागर विधानसभा मतदार संघात भाजपची हक्काची जागा राष्ट्रवादीकडे गेली ती फिस्कटलेल्या युतीमुळेच. रत्नागिरीत भाजपची जागा शिवसेनेला गेली ती फिस्कटलेल्या युतीमुळेच. युती नसल्याने भाजपला हे दोन माठे फटके बसले आहेत. मात्र तरीही भाजपचा स्वबळ आजमावण्याचा अट्टाहास कायम आहे. आताच्या निवडणुकांमध्ये राज्यात युती करण्याचा निर्णय दोन्ही पक्षाच्या वरिष्ठांनी घेतला असला तरी युती करण्याबाबत जिल्हास्तरावर आवश्यक तो निर्णय घेण्याची मुभा देण्यात आली. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात युती करण्याबाबत कोणतीही चर्चाच झाली नाही. भाजप सोबत असताना शिवसेनेची ताकदही मोठी होती. आजच्या घडीला शिवसेनेचा वरचष्मा असला तरी भाजप साथीला नसल्याने ताकद कमी झाली आहे. पण शिवसेनेनेही युती करण्यामध्ये स्वारस्य दाखवलेले नाही. नगर परिषद निवडणुका संपल्यानंतर तीन महिन्याच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होतील. या निवडणुकांची पूर्वतयारी म्हणून नगर परिषद निवडणुकांकडे पाहिले जात आहे. आपली ताकद किती आहे, याचा अंदाज दोन्ही पक्ष घेत आहेत. त्यामुळेच या निवडणुकीत युती न करता स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी दोन्ही पक्षांनी केली आहे. युतीच्या उलट स्थिती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची झाली आहे. १९९९ला राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र झाल्यानंतर दोन्ही काँग्रेसना मोठा फटका बसला. त्या फटक्यानंतर झालेल्या बहुतांश निवडणुका या दोन्ही पक्षांनी आघाडीने लढवल्या आहेत. या दोन्ही पक्षांना स्वबळ आजमावण्याचे दुष्परिणाम भोगावे लागल्यानंतर दोन्ही बाजूंनी शहाणपणाने विचार सुरू असून, या निवडणुकीतही काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी केली आहे. चिपळूण नगर परिषद वगळता जिल्ह्यातील उर्वरित चारही ठिकाणी दोन्ही काँग्रेस आघाडीनेच निवडणुकीला सामोऱ्या जात आहेत. एकमेकांशिवाय पर्याय नाही, हे आघाडीला कळलेले गणित युती मात्र अजून उमगलेले नाही, असेच चित्र दिसत आहे. (प्रतिनिधी) युती नेमकी नकोय कोणाला? जिल्ह्यात आजवर शिवसेना-भाजपला जे मोठे यश मिळाले, ते युतीमुळे मिळाले. युती तुटल्यानंतर दोन्ही पक्षांना काही ना काही परिणाम भोगावे लागले आहेत. मात्र तरीही युती करण्याबाबत चर्चाही झालेली नाही. त्यामुळे युती नेमकी नकोय कोणाला, ही चर्चा सध्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. दोन्ही बाजूंकडून युती तुटण्यासाठी एकमेकांवर आरोप केले जात आहेत.