शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

पूरग्रस्त गावांची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:28 IST

रस्त्यांचे बांधकाम प्रलंबित रत्नागिरी : शहरातील परटवणे पुलाच्या जोड रस्त्याचे बांधकाम नऊ वर्षे प्रलंबित आहे. ते बांधकाम होणे आवश्यक ...

रस्त्यांचे बांधकाम प्रलंबित

रत्नागिरी : शहरातील परटवणे पुलाच्या जोड रस्त्याचे बांधकाम नऊ वर्षे प्रलंबित आहे. ते बांधकाम होणे आवश्यक आहे, अशी मागणी माजी नगराध्यक्ष मिलिंद किर यांनी केली आहे. कार्यकाळ संपल्यानंतर आजपर्यंत त्या जोड रस्त्याच्या कामाकडे कोणीही लक्ष दिले नाही. तो जोड रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी होत आहे.

कोकण रेल्वेची निवडणूक

रत्नागिरी : कोकण रेल्वेची निवडणूक दि.४ व ५ ऑगस्ट रोजी होणार आहे. या निवडणुकीत केआरसी एम्प्लाॅईज युनियन व रेल कामगार सेनेने युती केली आहे. त्यांच्यासमोर नॅशनल रेल्वे मजदूर युनियन रिंगणात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध युनियन सभा घेत असून कर्मचाऱ्यांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

एस. टी. वाहतूक सुरू

रत्नागिरी : अणुस्कुरा घाटमार्गे एस. टी.ने आपली वाहतूक सुरू केली आहे. त्यामुळे कोल्हापूरला एस. टी.ने जाणे शक्य होणार आहे. रत्नागिरी व राजापूरच्या प्रवाशांसाठी दोन फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. रत्नागिरी आगारातून सकाळी ७.३० वाजता बस सुटत असून, दुपारी १.५ वाजता पोहोचते तर कोल्हापुरातून दुपारी २ वाजता गाडी रत्नागिरीसाठी सुटत असून सायंकाळी ७.३५ वाजता रत्नागिरीत येत आहे.

कृषी विभागाचा पुढाकार

रत्नागिरी : भातपिकाचे नुकसान झाल्यानंतर विमा परताव्यासाठी ७२ तासात पूर्वसूचना मिळणे आवश्यक असते. दुर्गम भागात मोबाईल नेटवर्क नसल्याने संपर्क तुटलेला आहे. अशा परिस्थितीत कृषी सहायकाला प्राप्त झालेल्या पूर्वसूचना ग्राह्य धरण्यास विमा कंपनींना कृषी विभागाने करायला लावले आहे. बाधित शेतकऱ्यांची संख्या १०१ इतकी झाली आहे.

मोफत औषधोपचार

चिपळूण : ठाणे येथील इंडियन मेडिकल असोसिएशनचे आपत्ती व्यवस्थापन पथक चिपळूणात दाखल झाले आहे. या पथकातर्फे चिपळूणात मोफत औषधोपचार करण्यात आले. गांधीनगर, पेठमाप, मुरादपूर, खेर्डी, मार्कंडी भागात नागरिकांची मोफत वैद्यकीय सेवा केली. यावेळी पथकासमवेत इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डाॅ. अभय मोहिते, डाॅ. अब्बास जबले, व्यावसायिक वैभव चव्हाण उपस्थित होते.

आज उपोषण

दापोली : दापोली नगर पंचायतीचे मुख्याधिकारी विविध विकासकामांबाबत कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याने सामाजिक कार्यकर्ते प्रसाद कर्वे यांनी दि. १ ऑगस्ट रोजी दापोली नगरपंचायतीसमोर उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. शिवस्मारक कामात दिरंगाई, गणेश विसर्जन घाटाचे बांधकाम करण्यास दिरंगाई आदी विविध प्रश्नांकडे लक्ष केंद्रित केले आहे.

बदली करण्याची मागणी

राजापूर : एस. टी. आगार व्यवस्थापक राजेश पाथरे यांचा मनमानी कारभार सुरू असल्याचा ठपका ठेवत त्यांची राजापूरच्या बाहेर बदली करण्यात यावी, अशी मागणी आमदार राजन साळवी यांनी पालकमंत्री तथा परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. पंचायत समितीच्या सभेत सदस्यांना दिलेली उलटसुलट उत्तरे अंगलट आली असल्याचे सांगण्यात येत आहे.

ग्रामपंचायतींना दिलासा

रत्नागिरी : ग्रामपंचायतीच्या पथदीप व पाणीपुरवठा योजनांच्या थकीत वीज बिलांचा योग्य मेळ साधण्यासाठी स्थापन केलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत महावितरण कंपनीने वीज जोडण्या खंडित करू नयेत, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. समितीचा अहवाल दि.१५ ऑगस्टपर्यंत शासनाला सादर केला जाणार आहे. त्यामुळे ८४६ ग्रामपंचायतींना दिलासा मिळाला आहे.

खड्डे बुजविण्याची मागणी

रत्नागिरी : तालुक्यातील नेवरे गावातील खड्डे बुजविण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. अंतर्गत रस्ते निकृष्ट झाले असून खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. पावसाचे पाणी साचत असल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नाही. अपघाताचा धोका वाढला असून तातडीने खड्डे बुजविण्याची मागणी होत आहे.