शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

पूरग्रस्त गावांची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:28 IST

रस्त्यांचे बांधकाम प्रलंबित रत्नागिरी : शहरातील परटवणे पुलाच्या जोड रस्त्याचे बांधकाम नऊ वर्षे प्रलंबित आहे. ते बांधकाम होणे आवश्यक ...

रस्त्यांचे बांधकाम प्रलंबित

रत्नागिरी : शहरातील परटवणे पुलाच्या जोड रस्त्याचे बांधकाम नऊ वर्षे प्रलंबित आहे. ते बांधकाम होणे आवश्यक आहे, अशी मागणी माजी नगराध्यक्ष मिलिंद किर यांनी केली आहे. कार्यकाळ संपल्यानंतर आजपर्यंत त्या जोड रस्त्याच्या कामाकडे कोणीही लक्ष दिले नाही. तो जोड रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी होत आहे.

कोकण रेल्वेची निवडणूक

रत्नागिरी : कोकण रेल्वेची निवडणूक दि.४ व ५ ऑगस्ट रोजी होणार आहे. या निवडणुकीत केआरसी एम्प्लाॅईज युनियन व रेल कामगार सेनेने युती केली आहे. त्यांच्यासमोर नॅशनल रेल्वे मजदूर युनियन रिंगणात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध युनियन सभा घेत असून कर्मचाऱ्यांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

एस. टी. वाहतूक सुरू

रत्नागिरी : अणुस्कुरा घाटमार्गे एस. टी.ने आपली वाहतूक सुरू केली आहे. त्यामुळे कोल्हापूरला एस. टी.ने जाणे शक्य होणार आहे. रत्नागिरी व राजापूरच्या प्रवाशांसाठी दोन फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. रत्नागिरी आगारातून सकाळी ७.३० वाजता बस सुटत असून, दुपारी १.५ वाजता पोहोचते तर कोल्हापुरातून दुपारी २ वाजता गाडी रत्नागिरीसाठी सुटत असून सायंकाळी ७.३५ वाजता रत्नागिरीत येत आहे.

कृषी विभागाचा पुढाकार

रत्नागिरी : भातपिकाचे नुकसान झाल्यानंतर विमा परताव्यासाठी ७२ तासात पूर्वसूचना मिळणे आवश्यक असते. दुर्गम भागात मोबाईल नेटवर्क नसल्याने संपर्क तुटलेला आहे. अशा परिस्थितीत कृषी सहायकाला प्राप्त झालेल्या पूर्वसूचना ग्राह्य धरण्यास विमा कंपनींना कृषी विभागाने करायला लावले आहे. बाधित शेतकऱ्यांची संख्या १०१ इतकी झाली आहे.

मोफत औषधोपचार

चिपळूण : ठाणे येथील इंडियन मेडिकल असोसिएशनचे आपत्ती व्यवस्थापन पथक चिपळूणात दाखल झाले आहे. या पथकातर्फे चिपळूणात मोफत औषधोपचार करण्यात आले. गांधीनगर, पेठमाप, मुरादपूर, खेर्डी, मार्कंडी भागात नागरिकांची मोफत वैद्यकीय सेवा केली. यावेळी पथकासमवेत इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डाॅ. अभय मोहिते, डाॅ. अब्बास जबले, व्यावसायिक वैभव चव्हाण उपस्थित होते.

आज उपोषण

दापोली : दापोली नगर पंचायतीचे मुख्याधिकारी विविध विकासकामांबाबत कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याने सामाजिक कार्यकर्ते प्रसाद कर्वे यांनी दि. १ ऑगस्ट रोजी दापोली नगरपंचायतीसमोर उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. शिवस्मारक कामात दिरंगाई, गणेश विसर्जन घाटाचे बांधकाम करण्यास दिरंगाई आदी विविध प्रश्नांकडे लक्ष केंद्रित केले आहे.

बदली करण्याची मागणी

राजापूर : एस. टी. आगार व्यवस्थापक राजेश पाथरे यांचा मनमानी कारभार सुरू असल्याचा ठपका ठेवत त्यांची राजापूरच्या बाहेर बदली करण्यात यावी, अशी मागणी आमदार राजन साळवी यांनी पालकमंत्री तथा परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. पंचायत समितीच्या सभेत सदस्यांना दिलेली उलटसुलट उत्तरे अंगलट आली असल्याचे सांगण्यात येत आहे.

ग्रामपंचायतींना दिलासा

रत्नागिरी : ग्रामपंचायतीच्या पथदीप व पाणीपुरवठा योजनांच्या थकीत वीज बिलांचा योग्य मेळ साधण्यासाठी स्थापन केलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत महावितरण कंपनीने वीज जोडण्या खंडित करू नयेत, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. समितीचा अहवाल दि.१५ ऑगस्टपर्यंत शासनाला सादर केला जाणार आहे. त्यामुळे ८४६ ग्रामपंचायतींना दिलासा मिळाला आहे.

खड्डे बुजविण्याची मागणी

रत्नागिरी : तालुक्यातील नेवरे गावातील खड्डे बुजविण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. अंतर्गत रस्ते निकृष्ट झाले असून खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. पावसाचे पाणी साचत असल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नाही. अपघाताचा धोका वाढला असून तातडीने खड्डे बुजविण्याची मागणी होत आहे.