शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

गांडूळ खत प्रकल्प देतोय महिलांना आधार

By admin | Updated: May 15, 2015 00:03 IST

गुहागर तालुक्यातील असगोली येथील स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजनेंतर्गत स्थापन झालेल्या श्री व्याघ्रांबरी महिला

स्वयंसहाय्यता बचत गटाला महत्त्व प्राप्त झाले आहे. बचत गटाने गांडूळ खत निर्मिती प्रकल्प उभारला आणि या व्यवसायाच्या माध्यमातून गटातील महिलांसह परिसरातील महिलांनाही रोजगार मिळवून दिला आहे.ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडून स्वर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजनेच्या माध्यमातून निर्माण झालेल्या दारिद्र्यरेषेखालील आदर्श सक्षम स्वयंसहाय्यता बचत गटांसाठी राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्काराची योजना जाहीर झाली आणि या योजनेंतर्गत गुहागर तालुक्यातील असगोली येथील या बचत गटाला सन २००७-०८ साली तालुका व जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. त्यानंतर सन २००८-०९ यावर्षी कोकण विभागस्तरीय प्रथम क्रमांकाचे बक्षीस प्राप्त झाले आहे. बचत गटाची स्थापना १ जानेवारी २००४ला झाली. बचत गटामध्ये एकूण दहा महिला आहेत. अध्यक्ष सुजाता कावणकर, सचिव अनिता कावणकर, सुलभा रामाणे, सविता कोळंबे, विजया कोळंबे, अश्विनी पानगले, तारामती पानगले, राधिका घाणेकर, रंजना कावणकर, वंदना कावणकर आदी महिला सदस्य आहेत. अशिक्षित किंबहुना सातवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या या महिला एकजुटीने अनेक कामे करत आहेत.दरमहा नियमित सभा होतात. सभेला ९० टक्क्यांपेक्षा अधिक उपस्थिती असते. मासिक वर्गणी दरमहा जमा केली जाते. या पैशातून कर्जव्यवहार करुन घरगुती अडचणींबरोबर शौचालय बांधण्याचे उपक्रम राबवले जातात. बचत गटाच्या प्रारंभी दरमहा २५ व नंतर ५० रुपये अशी वर्गणीत वाढ होत गेली. वर्गणीची आजअखेर ५७ हजार एवढी रक्कम जमा आहे. खेळते भांडवल म्हणून २५ हजार रक्कम प्राप्त झाली आहे. २२ आॅक्टोबर २००५ला द्वितीय मूल्यांकन झालेल्या या बचत गटाला ९ नोव्हेंबर २००५ रोजी बँक आॅफ इंडिया गुहागरमार्फत १ लाख ६० हजार व त्यानंतर ४० हजार असे एकूण २ लाख रुपयांचे कर्ज प्राप्त झाले.३१ डिसेंबर २००५ ला गांडूळ खत प्रकल्पाला सुरुवात केली. आजपर्यंत ९ वर्षात २२२ टन गांडूळ खताची विक्री करण्यात आली. त्यातून १४ लाख ५६ हजारांचे उत्पन्न झाले आहे. बचत गटातील सदस्यांनी ५६५० दिवस काम करुन ३ लाख ३९ हजार रुपयांचा रोजगार मिळवला, तर गटाबाहेरील महिलांना १ हजार २३० दिवस असा एकूण ७३ हजार ८०० रुपयांचा रोजगार दिला आहे. एकूण ४ लाख १२ हजार ८०० रुपयांची मजुरी बचत गटातून निर्माण झाली. प्रारंभी ५ रुपये किलोपासून १० रुपये किलोपर्यंत गांडूळ खत विक्री केली जात आहे.एवढ्यावरच न थांबता या महिलांचा गटाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमातही सहभाग असतो. यामध्ये ग्रामस्वच्छता अभियानात सहभाग, आरोग्यविषयक शिबिर घेणे, जलसंधारणांतर्गत बंधारा बांधणे, गणपती विसर्जनावेळी निर्माल्य गोळा करुन त्यापासून गांडूळ खताची निर्मिती केली जाते. चारसूत्री भात लागवड कार्यक्रम राबवून तब्बल ५० टन भाताचे उत्पादन वाढवले आहे. ग्रामसभा व महिला ग्रामसभा, कृषी शिबिर यातून आवर्जुन उपस्थिती असते. बचत गट निर्माल्याच्या वेळी तत्कालीन कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर व सहकारी अधिकाऱ्यांनी या बचत गटाला सर्वतोपरी मार्गदर्शन केले. त्यानंतर बचत गटाच्या वाटचालीमध्ये संबंधित सर्व लोकप्रतिनिधी व प्रशासनाने सर्वतोपरी सहकार्य व मार्गदर्शन केल्याने बचत गटाने भरारी घेतली आहे.- संकेत गोयथळेबचत गटाबाहेरील महिलांनाही रोजगारअसगोली येथील या बचत गटासमोर अनेक अडचणी उभ्या राहिल्या होत्या. अखेरीस या महिलांनी खंबीरपणे उभे राहून गांडूळ खत प्रकल्प राबवण्याचा पर्याय स्वीकारला. गांडूूळ खताचा प्रकल्प राबवताना सुरुवातीला छोटा प्रकल्प राबवला. मात्र, त्यानंतर हळूहळू गांडूळ खताबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृतीही होऊ लागली आणि त्यामुळे गांडूळ खताला मागणी वाढू लागली. २००५ साली सुरू झालेला हा प्रकल्प अजूनही सुरू आहे. एवढंच नव्हे तर बचत गटाबाहेरील महिलांनाही तो रोजगार देऊ लागला आहे.बचत गटामुळे वारंवार संबंधित सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायत आदी ठिकाणी जावे लागत होते. यामधून आत्मविश्वास वाढला. असगोली गावापुरते मर्यादित असलेले आमचे जग वाढून ज्ञानाच्या व अनुभवाच्या कक्षा रुंदावल्या.- सुजाता कावणकर,अध्यक्षाआम्हाला स्वत:च्या व्यवसायातून पैसे मिळू लागले आहेत. पूर्वी मजुरी करुन दुसऱ्यांच्या मताप्रमाणे काम करावे लागत होते. बचत गटाच्या माध्यमातून आत्मविश्वास प्राप्त होऊन जगण्याचे एक नवे ध्येय मिळाले. हा एक व्यवसाय असल्याने गांडूळ खताचा दर्जा कधीही घसरु देत नाही.- अनिता कावणकर, सचिवआधारवड