शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आराेग्य पथकाला सहकार्य करा : प्रतिभा वराळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:33 IST

राजापूर : ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ या अभियानांतर्गत राजापुरात आरोग्य सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, काही ठिकाणी ...

राजापूर : ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ या अभियानांतर्गत राजापुरात आरोग्य सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, काही ठिकाणी हे काम करणाऱ्या आरोग्य पथकांसह ग्राम कृती दलांना जनतेकडून सहकार्य केले जात नसल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या या आरोग्य पथके व ग्राम कृती दलांना सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी केले आहे.

मात्र जर का अशा प्रकारे कुणी असहकार्य करत या आरोग्य पथके व ग्राम कृती दलाच्या सदस्यांशी गैरवर्तन केले तर त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही वराळे यांनी दिला आहे.

अभियानांतर्गत राजापूर शहराबरोबरच तालुक्यातील १०१ ग्रामपंचयतींमध्ये आरोग्य विभाग व ग्राम कृती दलाच्या माध्यमातून ‘माझे गाव, माझी जबाबदारी’ ही संकल्पना राबवून हे अभियान राबविले जात आहे.

मात्र, काही ठिकाणी ग्रामस्थांकडून आरोग्य पथकांना सहकार्य केले जात नसल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. योग्य प्रकारे माहिती न देणे, आजारी व्यक्तीबाबत माहिती न सांगणे असे प्रकारे घडत आहेत. पेंडखळे चिपटेवाडी येथे अशाच प्रकारे आरोग्य पथकाशी असहकार्य करत त्यांना धमकावण्याचा प्रयत्न झाल्याचे वराळे यांनी सांगितले. त्यामुळे असे प्रकारे यापुढे तालुक्यात घडता कामा नयेत, कारण ही मंडळी आपल्या सुरक्षिततेसाठी काम करत असून, त्यांना सहकार्य करणे हे आपले प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे वराळे यांनी सांगितले.