शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

साथीच्या रोगांना अटकाव करण्यात आरोग्य यंत्रणेला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:36 IST

रत्नागिरी : चिपळूण, खेडमध्ये महापुरामुळे चिखल, कचरा अशुद्ध पाणी, शहरात साचलेले कचऱ्याचे ढीग यामुळे रोगराईला निमंत्रण ठरलेले होते. तसेच ...

रत्नागिरी : चिपळूण, खेडमध्ये महापुरामुळे चिखल, कचरा अशुद्ध पाणी, शहरात साचलेले कचऱ्याचे ढीग यामुळे रोगराईला निमंत्रण ठरलेले होते. तसेच कोरोनाचाही धोका होता. अशा आव्हानात्मक परिस्थितीत आरोग्य यंत्रणेने नियोजनबद्ध काम केल्याने साथीच्या रोगांना अटकाव करण्यात यश मिळवले आहे.

महापुरामध्ये जिल्हा परिषद आरोग्य विभागाने जिल्हा, तालुका आणि प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर २४ तास साथरोग व पूरनियंत्रण कक्ष कार्यरत केले आहेत. जिल्ह्यात ४७ गावांमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांची ६१ वैद्यकीय पथो, सुसज्ज रुग्णवाहिका, पुरेसा औषध साठ्यासह सज्ज ठेवला होता. खेडमधील विस्तापित १०८ कुटुंबे व ५७८ ग्रामस्थ आणि चिपळूण तालुक्यातील १६ कुटुंबे आणि ७४ ग्रामस्थ विस्थापित झाले होते. त्या ठिकाणी आरोग्य पथकाद्वारे आवश्यक त्या आरोग्य सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.

२० वैद्यकीय पथके चिपळूणात, १४ ग्रामीण भागात आणि ४ फिरते आरोग्य पथके आपत्ती निवारणाच्या अनुषंगाने सर्व त्या आरोग्य पुरविण्यामध्ये कार्यरत आहेत. ४ आरबीएसके पथकातील ७ डॉक्टर्स, ४ एएनएम आणि ४ औषध निर्माण अधिकारी हे वाहनांसह तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले होते. खेड शहरात ५ वैद्यकीय पथके, ग्रामीण भागात ३ वैद्यकीय पथके, संगमेश्वरात १३, रत्नागिरीत ६, लांजात १ आणि राजापुरात ९ वैद्यकीय पथके आपत्ती निवारण्याच्या अनुषंगाने सर्व त्या आरोग्य सेवा पुरविण्यासाठी अजूनही कार्यरत आहेत.

नऊ रुग्णवाहिका चिपळूण येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पाठविण्यात आल्या होत्या. जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून पुरेसा औषध साठा देण्यात आला. आरोग्य पथकांमध्ये पुरेसा औषधसाठा, मेडिक्लोर, सर्पदंश लस, ओआरएस उपलब्ध ठेवण्यात आले. अतिरिक्त औषधांची मागणी गरजेनुसार करण्यात आली. पूर ओसरल्यानंतर प्रत्येक गावात आरोग्य सेवक व आरोग्यसेविका यांच्यामार्फत घरोघरी सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये २९ हजाराहून अधिक घरांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. पिण्याच्या पाण्यासाठी विहीर, बोअरवेल आदींचे शुद्धीकरण करण्यात आले. तसेच किटकजन्य, जलजन्य आजारांच्या अनुषंगाने सर्व्हेक्षण करण्यात आले.

-----------------------------

पूर परिस्थिती ओसरल्यानंतर योग्यवेळी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्याने उद्रेकजन्य स्थिती चिपळूण, खेड परिसरात उद्भवली नाही. काही ठिकाणी तापाचे किरकोळ रुग्ण आढळले. त्यांच्यावर तत्काळ उपचार करण्यात आले. पुरामुळे साथींच्या रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. मात्र, आराेग्य यंत्रणेने केलेल्या कामामुळे साथरोग उद्रेक झाला नाही. पूरग्रस्त भागात ४,४२० घरांमध्ये औषध फवारणी करण्यात आली.