शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

साथीच्या रोगांना अटकाव करण्यात आरोग्य यंत्रणेला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:36 IST

रत्नागिरी : चिपळूण, खेडमध्ये महापुरामुळे चिखल, कचरा अशुद्ध पाणी, शहरात साचलेले कचऱ्याचे ढीग यामुळे रोगराईला निमंत्रण ठरलेले होते. तसेच ...

रत्नागिरी : चिपळूण, खेडमध्ये महापुरामुळे चिखल, कचरा अशुद्ध पाणी, शहरात साचलेले कचऱ्याचे ढीग यामुळे रोगराईला निमंत्रण ठरलेले होते. तसेच कोरोनाचाही धोका होता. अशा आव्हानात्मक परिस्थितीत आरोग्य यंत्रणेने नियोजनबद्ध काम केल्याने साथीच्या रोगांना अटकाव करण्यात यश मिळवले आहे.

महापुरामध्ये जिल्हा परिषद आरोग्य विभागाने जिल्हा, तालुका आणि प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर २४ तास साथरोग व पूरनियंत्रण कक्ष कार्यरत केले आहेत. जिल्ह्यात ४७ गावांमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांची ६१ वैद्यकीय पथो, सुसज्ज रुग्णवाहिका, पुरेसा औषध साठ्यासह सज्ज ठेवला होता. खेडमधील विस्तापित १०८ कुटुंबे व ५७८ ग्रामस्थ आणि चिपळूण तालुक्यातील १६ कुटुंबे आणि ७४ ग्रामस्थ विस्थापित झाले होते. त्या ठिकाणी आरोग्य पथकाद्वारे आवश्यक त्या आरोग्य सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.

२० वैद्यकीय पथके चिपळूणात, १४ ग्रामीण भागात आणि ४ फिरते आरोग्य पथके आपत्ती निवारणाच्या अनुषंगाने सर्व त्या आरोग्य पुरविण्यामध्ये कार्यरत आहेत. ४ आरबीएसके पथकातील ७ डॉक्टर्स, ४ एएनएम आणि ४ औषध निर्माण अधिकारी हे वाहनांसह तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले होते. खेड शहरात ५ वैद्यकीय पथके, ग्रामीण भागात ३ वैद्यकीय पथके, संगमेश्वरात १३, रत्नागिरीत ६, लांजात १ आणि राजापुरात ९ वैद्यकीय पथके आपत्ती निवारण्याच्या अनुषंगाने सर्व त्या आरोग्य सेवा पुरविण्यासाठी अजूनही कार्यरत आहेत.

नऊ रुग्णवाहिका चिपळूण येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पाठविण्यात आल्या होत्या. जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून पुरेसा औषध साठा देण्यात आला. आरोग्य पथकांमध्ये पुरेसा औषधसाठा, मेडिक्लोर, सर्पदंश लस, ओआरएस उपलब्ध ठेवण्यात आले. अतिरिक्त औषधांची मागणी गरजेनुसार करण्यात आली. पूर ओसरल्यानंतर प्रत्येक गावात आरोग्य सेवक व आरोग्यसेविका यांच्यामार्फत घरोघरी सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये २९ हजाराहून अधिक घरांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. पिण्याच्या पाण्यासाठी विहीर, बोअरवेल आदींचे शुद्धीकरण करण्यात आले. तसेच किटकजन्य, जलजन्य आजारांच्या अनुषंगाने सर्व्हेक्षण करण्यात आले.

-----------------------------

पूर परिस्थिती ओसरल्यानंतर योग्यवेळी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्याने उद्रेकजन्य स्थिती चिपळूण, खेड परिसरात उद्भवली नाही. काही ठिकाणी तापाचे किरकोळ रुग्ण आढळले. त्यांच्यावर तत्काळ उपचार करण्यात आले. पुरामुळे साथींच्या रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. मात्र, आराेग्य यंत्रणेने केलेल्या कामामुळे साथरोग उद्रेक झाला नाही. पूरग्रस्त भागात ४,४२० घरांमध्ये औषध फवारणी करण्यात आली.