शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

साथीच्या रोगांना अटकाव करण्यात आरोग्य यंत्रणेला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:36 IST

रत्नागिरी : चिपळूण, खेडमध्ये महापुरामुळे चिखल, कचरा अशुद्ध पाणी, शहरात साचलेले कचऱ्याचे ढीग यामुळे रोगराईला निमंत्रण ठरलेले होते. तसेच ...

रत्नागिरी : चिपळूण, खेडमध्ये महापुरामुळे चिखल, कचरा अशुद्ध पाणी, शहरात साचलेले कचऱ्याचे ढीग यामुळे रोगराईला निमंत्रण ठरलेले होते. तसेच कोरोनाचाही धोका होता. अशा आव्हानात्मक परिस्थितीत आरोग्य यंत्रणेने नियोजनबद्ध काम केल्याने साथीच्या रोगांना अटकाव करण्यात यश मिळवले आहे.

महापुरामध्ये जिल्हा परिषद आरोग्य विभागाने जिल्हा, तालुका आणि प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर २४ तास साथरोग व पूरनियंत्रण कक्ष कार्यरत केले आहेत. जिल्ह्यात ४७ गावांमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांची ६१ वैद्यकीय पथो, सुसज्ज रुग्णवाहिका, पुरेसा औषध साठ्यासह सज्ज ठेवला होता. खेडमधील विस्तापित १०८ कुटुंबे व ५७८ ग्रामस्थ आणि चिपळूण तालुक्यातील १६ कुटुंबे आणि ७४ ग्रामस्थ विस्थापित झाले होते. त्या ठिकाणी आरोग्य पथकाद्वारे आवश्यक त्या आरोग्य सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.

२० वैद्यकीय पथके चिपळूणात, १४ ग्रामीण भागात आणि ४ फिरते आरोग्य पथके आपत्ती निवारणाच्या अनुषंगाने सर्व त्या आरोग्य पुरविण्यामध्ये कार्यरत आहेत. ४ आरबीएसके पथकातील ७ डॉक्टर्स, ४ एएनएम आणि ४ औषध निर्माण अधिकारी हे वाहनांसह तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले होते. खेड शहरात ५ वैद्यकीय पथके, ग्रामीण भागात ३ वैद्यकीय पथके, संगमेश्वरात १३, रत्नागिरीत ६, लांजात १ आणि राजापुरात ९ वैद्यकीय पथके आपत्ती निवारण्याच्या अनुषंगाने सर्व त्या आरोग्य सेवा पुरविण्यासाठी अजूनही कार्यरत आहेत.

नऊ रुग्णवाहिका चिपळूण येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पाठविण्यात आल्या होत्या. जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून पुरेसा औषध साठा देण्यात आला. आरोग्य पथकांमध्ये पुरेसा औषधसाठा, मेडिक्लोर, सर्पदंश लस, ओआरएस उपलब्ध ठेवण्यात आले. अतिरिक्त औषधांची मागणी गरजेनुसार करण्यात आली. पूर ओसरल्यानंतर प्रत्येक गावात आरोग्य सेवक व आरोग्यसेविका यांच्यामार्फत घरोघरी सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये २९ हजाराहून अधिक घरांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. पिण्याच्या पाण्यासाठी विहीर, बोअरवेल आदींचे शुद्धीकरण करण्यात आले. तसेच किटकजन्य, जलजन्य आजारांच्या अनुषंगाने सर्व्हेक्षण करण्यात आले.

-----------------------------

पूर परिस्थिती ओसरल्यानंतर योग्यवेळी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्याने उद्रेकजन्य स्थिती चिपळूण, खेड परिसरात उद्भवली नाही. काही ठिकाणी तापाचे किरकोळ रुग्ण आढळले. त्यांच्यावर तत्काळ उपचार करण्यात आले. पुरामुळे साथींच्या रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. मात्र, आराेग्य यंत्रणेने केलेल्या कामामुळे साथरोग उद्रेक झाला नाही. पूरग्रस्त भागात ४,४२० घरांमध्ये औषध फवारणी करण्यात आली.