शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

निबंध स्पर्धेत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:41 IST

गुहागर : बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. कास्ट्राईब ...

गुहागर : बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. कास्ट्राईब शिक्षक संघटनेतर्फे आयोजित केलेल्या या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत तालुक्यातील कुडली येथील जिल्हा परिषद आदर्श शाळा क्रमांक ३ माटलवाडीची विद्यार्थिनी समिरा ठोंबरे हिने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला.

लसीकरणाला प्रतिसाद

रत्नागिरी : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण हा उत्तम उपाय असल्याने नजीकच्या मजगाव येथील ग्रामपंचायतीने लसीकरण शिबिर आयोजित केले होते. या अंतर्गत ४५ वर्षांवरील १०० ग्रामस्थांना कोविशिल्ड लस देण्यात आली. सकाळी १० वाजल्यापासून दुपारपर्यंत हे शिबिर सुरु होते.

झुडपांचा त्रास

रत्नागिरी : तालुक्यामध्ये विविध ठिकाणी आता रस्त्यावर झुडपे वाढू लागली आहेत. त्यामुळे वाहनचालकांना अडचणीचे झाले आहे. सागरी महामार्गावरील गणपतीपुळे ते रत्नागिरी तसेच नेवरे ते बसणी या मार्गावर अनेक ठिकाणी आता पावसामुळे रस्त्यावर झुडपे मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहेत.

शेतकऱ्यांसमोर अडचणी

आवाशी : सध्या लॉकडाऊन शिथील झाले असले तरी अजूनही पुरेशा प्रमाणात एस. टी. गाड्या सुरु झालेल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. सध्या शेतीची कामे सुरु झाल्याने ग्रामीण भागातून शहरात जाऊन शेतीची अवजारे तसेच इतर साहित्य आणावे लागत असल्याने वाहतूक सुविधेअभावी अडचणीचे झाले आहे.

रहदारीत वाढ

रत्नागिरी : जिल्ह्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. जिल्हा प्रशासनाने सोमवार ते शुक्रवार या दिवशी सकाळी ९ ते ४ यावेळेत अत्यावश्यक सेवेशी निगडीत सर्व दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. ५ वाजल्यानंतर संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे दुपारी ४ वाजेपर्यंत रहदारीत मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली दिसते.