शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायासाठी अर्थसाह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:31 IST

चिपळूण : येत्या पाच वर्षांत ५ हजार शेतकरी सभासदांना शेतीला दुग्ध व्यवसायाची जोड देता यावी यासाठी येथील चिपळूण नागरी ...

चिपळूण : येत्या पाच वर्षांत ५ हजार शेतकरी सभासदांना शेतीला दुग्ध व्यवसायाची जोड देता यावी यासाठी येथील चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने विशेष उपक्रम हाती घेतला आहे. तसेच येत्या ५ वर्षांत २५ हजार बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठीचा उपक्रमही हाती घेतला जाणार आहे, अशी माहिती पतसंस्थेचे अध्यक्ष सुभाष चव्हाण यांनी दिली. मार्च २०२१ अखेर संस्थेने ३५ कोटी रुपये व्यावसायिक नफा मिळविला असून, १४७२ कोटी व्यवसायाचा टप्पा पूर्ण केला आहे.

या संस्थेची मार्च २०२१ अखेर सभासद संख्या १ लाख २४ हजार ९७३, भाग भांडवल ५८ कोटी ०४ लाख रुपये, तर एकूण स्वनिधी १०३ कोटी ९२ लाख रुपये आहे. फक्त २७ वर्षांच्या कालखंडात सभासद संख्या, भाग भांडवल व स्वनिधी वाढीमध्ये राज्यातील काही निवडक संस्थांमध्ये या संस्थेचा समावेश होतो. संस्थेच्या ठेवी ८०२ कोटी ५८ लाख, एकूण कर्जव्यवहार ६६९ कोटी ४९ लाख रुपये आहे. त्यापैकी सोनेतारण कर्ज २५२ कोटी ४४ लाख तर एकूण प्लेज लोन २८८ कोटी ०७ लाख रुपये आहे.

संस्थेचा एकूण व्यवसाय १४७२ कोटींचा असून तो २०२५ पर्यंत २५०० कोटींचा टप्पा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. मागील आर्थिक वर्षात कोरोना संसर्गामुळे सर्वत्र मंदीचे वातावरण असतानाही संस्थेने व्यवसाय वाढ करण्यात व नफा क्षमतेचे सातत्य राखले आहे.

या संस्थेच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी सभासदांना शेतीपूरक जोडधंदा उपलब्ध व्हावा यासाठी संस्थेने पुढील ५ वर्षांत किमान ५ हजार शेतकऱ्यांना शेतीपूरक दुग्ध व्यवसायाची जोड देऊन त्यांना स्वावलंबी करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. याशिवाय स्वयंरोजगारासाठी पुढील ५ वर्षांत २५ हजार बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी काम चालू आहे. ‘आपली माणसे - आपली संस्था’ हे ब्रीद वाक्य खऱ्या अर्थाने सिद्ध करण्यात सहकार्य करणारे ठेवीदार, ग्राहक, संचालक, समन्वयक व कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे. या सर्वांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष चव्हाण यांनी आभार मानले आहेत.