शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

टपाल कार्यालयाचा अजब कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:21 IST

चिपळूण : शहरातील मार्कंडी येथील टपाल कार्यालयात आजारी मुलाच्या उपचारासाठी पैसे काढायला गेलेल्या नागरिकाला कर्मचारी रजेवर असल्याचे कारण देत ...

चिपळूण : शहरातील मार्कंडी येथील टपाल कार्यालयात आजारी मुलाच्या उपचारासाठी पैसे काढायला गेलेल्या नागरिकाला कर्मचारी रजेवर असल्याचे कारण देत पैसे न देताच वेठीस धरल्याचा प्रकार शुक्रवारी घडला. आपलेच पैसे आपल्याच मिळत नसल्याने नाराजी पसरली आहे.

सावकारीचा व्यवसाय तेजीत

आरवली : छत्तीसगड, गुजरात आदी राज्यांमधील धनिकांना हाताशी धरून संगमेश्वर तालुक्यातील अनधिकृत सावकारीचे प्रमाण पुन्हा वाढू लागले आहे़ सावकारीचा संबंध थेट गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांशी असल्याने तक्रारदार, साक्षीदार यांना दमदाटी करून पुरावे नष्ट केले जात असल्याची चर्चा सुरू आहे.

लावणीच्या कामांना वेग

चिपळूण : तालुक्यातील शेतीच्या कामांना वेग आला आहे़ शेतात पेरणी केलेल्या रोपांची योग्य वाढ झाल्याने शेतकरी भात लावणीच्या कामात व्यस्त झाले आहेत. शेतात भात लावणीची लगबग सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भाताची पेरणी करण्यात आली होती.

जिल्हाधिकाऱ्यांची अचानक भेट

खेड : तहसीलदार कार्यालय व कळंबणी उपजिल्हा रुग्णालयाला जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी गुरुवारी अचानक भेटी दिल्याने अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली होती़ दरम्यान, या अचानक भेटी मागचे कारण समजू शकलेले नाही़ ही भेट तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आढावा आणि करावयाच्या उपाययोजनांबाबत होती़.

मोकाट श्वानांचा उपद्रव

रत्नागिरी : शहरातील कोकणनगर, मिरकरवाडा, राजीवडा व अन्य भागांमध्येही गेल्या काही दिवसांपासून मोकाट श्वानांचा उपद्रव वाढला आहे. मोकाट श्वानांनी चावा घेण्याचे प्रकारही वाढले आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी रस्त्याने जाणेही धोकादायक बनले. वाहनांचाही श्वान पाठलाग करतात. त्यामुळे मोकाट श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

वाहतुकीची कोंडी

रत्नागिरी : शहरात सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. तसेच वाहनांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे वाहने उभी करण्यासाठी जागाच उपलब्ध होत नाही. परिणामी रस्त्याच्या कडेला वाहने उभी करावी लागतात. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असून वाहनतळांची संख्या वाढविण्याची मागणी होत आहे.