शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

ताैक्ते वादळामुळे जिल्ह्यातील २,४३७ हेक्टर क्षेत्र नुकसानग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : नुकत्याच झालेल्या तौक्ते चक्रीवादळातील बाधित बागायतदारांचे पंचनामे पूर्ण झाले असून, १२ हजार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : नुकत्याच झालेल्या तौक्ते चक्रीवादळातील बाधित बागायतदारांचे पंचनामे पूर्ण झाले असून, १२ हजार २६ शेतकऱ्यांचे २ हजार ४३७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. जिल्ह्याचे १२ कोटी १२ लाख १४ हजार ६१५ रूपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. तौक्ते चक्रीवादळाचा किनारपट्टीलगतच्या गावांना जास्त फटका बसला आहे. राजापूर, रत्नागिरी, संगमेश्वर तसेच लांजा तालुक्यामध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे.

रत्नागिरी तालुक्यामध्ये वादळाचा प्रभाव सर्वाधिक राहिला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आंबा बागायतदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, झाडावरील आंबे गळून पडले. हंगामातील शेवटच्या टप्प्यातील उत्पन्न जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसला आहे. कृषी विभागाकडून झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्यात आले असून, त्याचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे. २ हजार ४३७.९७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. शासनाच्या जुन्या निकषानुसार हेक्टरी १८ हजार रूपयांप्रमाणे मदत मिळणार होती. त्यानुसार जिल्ह्याला ४ कोटी ३६ लाख रुपये मिळणे अपेक्षित होते. मात्र, शासनाने मदत तिप्पट करण्याचा निर्णय घेतला असल्याने ७ कोटी ७२ लाखांची त्यामध्ये भर पडली आहे. मात्र, नवीन निकषानुसार हेक्टरी ५० हजार रूपयांप्रमाणे १२ कोटी १२ लाख १४ हजार ६१५ रूपयांच्या निधीची आवश्यकता आहे.

सर्वाधिक नुकसान रत्नागिरी तालुक्यात झाले असून, एकूण ३,१२८ शेतकऱ्यांचे ४ कोटी ४७ लाख ६१ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. त्यापाठोपाठ संगमेश्वर तालुक्यात २,३५० शेतकऱ्यांचे २ कोटी १० लाख ७५ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. तर राजापूर तालुक्यातील १,७६५ शेतकऱ्यांना एक कोटी ७९ लाख ८८ हजार रूपयांचा आर्थिक भुर्दंड बसला आहे.

----------------------

ताैक्ते वादळातील नुकसानाचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. नवीन निकषाप्रमाणे पंचनाम्याचे अहवाल तयार करण्यात आले असून, ते जिल्हा प्रशासन व कृषी आयुक्तांकडे पाठविण्यात आले आहेत.

- शिवराज घोरपडे, जिल्हा कृषी अधीक्षक, रत्नागिरी.

-----------------------

तालुका शेतकरी नुकसान

मंडणगड ४४ ६ लाख ५८ हजार ०८०

दापोली ९२५ ४२ लाख

खेड ५९७ २९ लाख ९ हजार ८४०

चिपळूण १२९६ ९१ लाख ९ हजार ८४५

गुहागर ५९७ ३८ लाख ८६ हजार

संगमेश्वर २३५० २ कोटी १० लाख ७५ हजार

रत्नागिरी ३१२८ ४ कोटी ४७ लाख ६१ हजार

लांजा १३२४ १ कोटी ६६ लाख २५ हजार े

राजापूर १७६५ १ कोटी ७९ लाख ८८ हजार