शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

डाटा एंट्री आॅपरेटर्सचे काम बंद आंदोलन-- चिपळूण तालुक्यात संमिश्र प्रतिसाद

By admin | Updated: November 12, 2014 22:51 IST

विविध मागण्या : ग्रामपंचायतींमधील संगणकीकरणाचे कामकाज ठप्प

रत्नागिरी/असुर्डे : अन्याय होत असल्याने विविध मागण्यांच्या पूर्ततेकरिता आज बुधवारपासून जिल्ह्यातील डाटा एंट्री आॅपरेटर्सनी काम बंद आंदोलन सुरु केले़ त्यामुळे ग्रामपंचायतींमधील संगणकीकरणाचे काम ठप्प झाले आहे़ प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये संग्राम कक्ष स्थापन करण्यात आला. ग्रामस्थांना विविध प्रकारचे दाखले मिळावेत, ग्रामपंचायतीचा प्रशासकीय कारभार सुटसुटीत व्हावा, या हेतूने डाटा एंट्री आॅपरेटर्सची नियुक्ती करण्यात आली. तेराव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतीकडून दरमहा ८,८२४ रुपये वर्ग करण्यात येतात. डाटा एंट्री आॅपरेटर्सना आठ हजार रुपये मानधन निर्धारित केलेले असताना प्रत्यक्ष पदवीधारकांना ३८००, तर पदवी नसलेल्यांना ३५०० रुपये मानधन दिले जाते. शिवाय संगणकाची देखभाल दुरुस्ती, लागणारी छपाई व अन्य साहित्य वेळेवर उपलब्ध होत नाही. ग्रामपंचायतीत त्यासाठी काहीही खर्च करीत नाहीत़ संगणक परिचालकांच्या नियुक्तीपासून आतापर्यंत वेळेवर मानधन देण्यात आलेले नाही. दोन महिने उशिरा मानधन काढण्यात येत आहे. वेळोवेळी मानधनाचा प्रश्न मांडण्यात येऊनसुद्धा त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.डाटा एंट्री आॅपरेटर्सना आठ हजार रुपयांप्रमाणे दरमहा वेतन अदा करण्यात यावे. १ ते १० तारखेच्या आत मानधन जमा व्हावे, संगणक देखभाल दुरुस्तीसाठी साहित्य लवकर उपलब्ध व्हावे. दहा हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या गावातून दोन डाटा एंट्री आॅपरेटर्सची नियुक्ती करण्यात यावी. ज्या ग्रामपंचायतीमध्ये इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही, तेथील डाटा एंट्री आॅपरेटर्सना अन्य ग्रामपंचायतीमध्ये किंवा पंचायत समितीत जाऊन काम करावे लागते. त्यासाठी त्यांना प्रतिकिलोमीटर २ रुपये प्रमाणे प्रवासभत्ता देण्यात यावा. सर्व ग्रामपंचायतींमधील संग्राम कक्षामध्ये इंटरनेटसाठी ब्रॉडबॅण्ड कनेक्शन उपलब्ध व्हावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.सर्व डाटा एंट्री आॅपरेटर्सनी आतापर्यंत शांततेने भूमिका घेतली होती. वेळोवेळी मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर केले होते. परंतु संबंधित मागण्या मान्य न केल्यास १२ नोव्हेंबरपासून काम बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. आॅपरेटर्सनी आजपासून काम बंद आंदोलन सुरु केले़ (शहर वार्ताहर)चिपळूण तालुक्यात संमिश्र प्रतिसादचिपळूण : नियमितपणे मासिक वेतन मिळण्यासाठी अनेकदा संघर्ष करुनही जिल्ह्यातील ग्रामपंचायतीतील डेटा आॅपरेटर्सना एकदाही मासिक वेतन वेळेत मिळालेले नाही. शासन सेवेत कायम करण्याबरोबरच विविध मागण्यांसाठी आज बुधवारपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला होता. त्याला तालुक्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. याबाबतचे निवेदन मंगळवारी तहसीलदार वृषाली पाटील यांना देण्यात आले होते. मागील तीन वर्षापासून डेटा आॅपरेटर्स आॅनलाईनचे कामकाज करीत आहेत. महाआॅनलाईन कंपनीस ग्रामपंचायतीची कामे संगणकीकृत करण्याचा ठेका दिला होता. प्रत्यक्षात शासनाकडून महाआॅनलाईन कंपनीस ८ हजारांचे वेतन दिले असताना आॅपरेटसना मात्र ३५०० रुपये व ३८०० रुपये वेतन दिले जाते. तेही वेळेत मिळत नाही. त्यामुळे वैतागलेल्या डाटा आॅपरेटसनी मागील महिन्यात बेमुदत कामबंद आंदोलन केले होते. त्यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व कंपनीच्या प्रतिनिधींनी मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्याने बंद मागे घेण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात मागण्यांबाबत काहीच कार्यवाही झाली नाही. दि.१२ पासून बेमुदत कामबंद आंदोलन राहील तर १७ ते १९ नोव्हेंबर दरम्यान पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलन केले जाईल. बुधवार दि.१९ रोजी पंचायत समिती परिसरात स्वच्छता मोहीम राबवली जाणार असल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले. दरम्यान आज काही ग्रामपंचायतीमध्ये डेटा आॅपरेटर कार्यरत होते असे समन्वयक बैकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)