शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या लपंडावाने हाेणारी गैरसोय थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:35 IST

लांजा : तालुक्यातील पूर्व विभागातील ग्रामीण भागामध्ये मागील कित्येक महिन्यांपासून वीजपुरवठा अनियमितपणे होत आहे. सातत्याने खंडित होणाऱ्या विजेमुळे नागरिकांची ...

लांजा

: तालुक्यातील पूर्व विभागातील ग्रामीण भागामध्ये मागील कित्येक महिन्यांपासून वीजपुरवठा अनियमितपणे होत आहे. सातत्याने खंडित होणाऱ्या विजेमुळे नागरिकांची गैरसाेय हाेत आहे. ही गैरसाेय तत्काळ थांबवावी, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सभापती दत्तात्रय कदम यांनी महावितरण कार्यालयाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

गेले कित्येक महिने तालुक्यातील पूर्व विभागात सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने घरगुती वापरात येणाऱ्या विजेच्या उपकरणांमध्ये बिघाड होऊन नादुरुस्त होण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत, तसेच मागील काही महिन्यांत झालेल्या तौक्ते वादळ, मुसळधार पाऊस , नैसर्गिक आपत्तीमुळे वीज ग्राहकांना आर्थिक भुर्दंड व मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर वाढीव प्रमाणात विजेची बिले आकारण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त हाेत आहे. यापूर्वीही नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयीबाबत लेखी निवेदनाद्वारे कळविले होते. परंतु, महावितरण कार्यालय याकडे दुर्लक्ष करत आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेली नुकसानभरपाई देण्यासाठी करण्यात आलेली कार्यवाही व वीजपुरवठा सुरळीतपणे होण्यासाठी करण्यात आलेली दुरुस्ती, उपाययोजना याबाबत तपशीलवार माहिती मिळावी, अशी मागणी दत्ता कदम यांनी केली आहे, तसेच तातडीने कार्यवाही व्हावी, अन्यथा विजेच्या या सततच्या होणाऱ्या लपंडावामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली तर त्याला पूर्णपणे महावितरण अधिकारी जबाबदार राहतील, असेही दत्ता कदम यांनी म्हटले आहे.