शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
4
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
5
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
6
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
7
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
8
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
9
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
10
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
11
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
12
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
14
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
15
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
16
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
17
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
18
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
19
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
20
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला

आंबडवे-लाेणंद महामार्गावर दगड-मातीचा खच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:23 IST

मंडणगड : चार दिवसांतील अतिवृष्टीत तालुक्यात आंबडवे-लोणंद या राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी पावसाच्या पाण्यासह दगड-मातीचा खच साचला आहे. मंडणगड, तुळशी, ...

मंडणगड : चार दिवसांतील अतिवृष्टीत तालुक्यात आंबडवे-लोणंद या राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी पावसाच्या पाण्यासह दगड-मातीचा खच साचला आहे. मंडणगड, तुळशी, पाले, भिंगळोली याचबरोबर चिंचाळी, म्हाप्रळ या गावांच्या अंतरादरम्यान कोठेही गटार नसल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने गेल्या हंगामात रस्त्याच्या परिस्थितीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने पाऊस सुरू झाल्यापासून रोड कनेक्टिव्हिटीत वारंवार अडथळे निर्माण होत आहेत. तुळशी घाट, पाले, भिंगळोली, म्हाप्रळ, शेनाळे घाट या सुमारे पंचवीस किलोमीटर अंतरात घाट व वळणे असताना रस्त्याच्या बाजूने साइडपट्टी व गटारे काढण्यात न आल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर साठले आहे. त्यातच यंदाच्या हंगामात जुन्या रस्त्यावरील बुजवण्यात आलेले खड्डे परत उखडल्याने महामार्गावर जागोजागी चिखलमिश्रित पाणी व खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. तुळशी घाटातील बहुतांश वळणांवर गटारांअभावी रस्त्याशेजारी माती, वाळू रस्त्यावर येऊन साचली आहे.

राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून तालुक्यातील म्हाप्रळ ते आंबडवे या दोन गावांच्या हद्दीतील अंतरात दोन पदरी काँक्रीट रोडचे स्वप्न तालुकावासीयांना गेल्या पाच वर्षांपासून दाखवण्यात आलेले आहे. मात्र, अद्यापही रस्त्याचे काम पूर्ण हाेऊ शकलेले नाही.