शहरं
Join us  
Trending Stories
1
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
2
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
3
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
4
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
5
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
6
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
7
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
8
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
9
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
10
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
11
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
12
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!
13
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
14
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
15
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
16
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
17
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
18
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
19
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
20
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?

अजूनही महिलांच्या छळाच्या घटना; ग्रामीण भागात संख्या अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : महिला आणि पुरुष एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम करू लागले तरीही अजून महिला अत्याचाराच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : महिला आणि पुरुष एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम करू लागले तरीही अजून महिला अत्याचाराच्या घटना समाजात घडत आहेत. शहरापेक्षा ग्रामीण भागात विवाहित महिलांना शारीरिक आणि मानसिक त्रास अधिक होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.

शिक्षणामुळे महिला स्वावलंबी तसेच आत्मनिर्भर झाल्या आहेत. स्वत:चे निर्णय स्वत: घेऊ लागल्या आहेत. मात्र, ग्रामीण भागात अजूनही पुरुषप्रधान संस्कृतीचा प्रभाव असल्याने लग्न झाल्यानंतर तिने नवरा किंवा सासरच्या लोकांच्या मनाप्रमाणे वागायचे, घरातील कामे करायची, कुठे जाताना परवानगी घेऊन जायचे, माहेरच्यांशी जास्त संपर्क ठेवायचा नाही, अशी अपेक्षा बाळगली जाते. काही वेळा मूल न होणे, मुलगी होणे, यावरूनही त्रास देण्याचे प्रकार वाढले आहेत. शहरी भागात तर मोबाइलमुळे संशय निर्माण झाल्याने पत्नीला त्रास देण्याचे प्रकार वाढले आहेत. बाहेर काम करणाऱ्या महिलांनाही यामुळे त्रास होण्याच्या घटना घडत आहेत.

पतीपत्नी यांच्यातील वादाचे मुख्य कारण सध्या मोबाइल हे होऊ लागले आहे. विश्वास कमी आणि संशय वाढत चालल्याने पत्नीला त्रास देण्याचे प्रकार वाढले आहेत. त्याचबरोबर ग्रामीण भागात सुनेकडून शारीरिक कामाची अपेक्षा, बरीच वर्ष मूल न होणे, मुलगी होणे यामुळे नाराजी, काही वेळा माहेरहून काही आणत नाही, याबद्दल राग, त्यातच सून शिकलेली असेल तर ती विरोध करते, त्यामुळेही तिचा छळ होत आहे.

-ॲड. संध्या सुखटणकर, अध्यक्ष, तक्रार निवारण समिती

पन्नाशी ओलांडली तरी छळ सुरूच....

काही महिलांनी पन्नाशी ओलांडली तरीही तिला पती, भाऊ किंवा मुलांकडून अत्याचार सोसावा लागतो. मोबाइल, नोकरी, व्यवसायासाठी बाहेर पडणाऱ्या महिलांचा छळ संशयामुळे केला जातो. त्याचबरोबर व्यसनाधीनतेमुळेही अनेक महिलांना शारीरिक तसेच मानसिक छळाला सामोरे जावे लागते. अशा महिलांना कौटुंबिक हिंसाचाराविरोधी कायद्याद्वारे संरक्षण अधिकारी यांच्यामार्फत न्याय मिळवून दिला जातो.

जिल्ह्यात अजूनही छुपा हिंसाचार सुरूच आहे. नवऱ्याने एकदाच मारलं ना, मग काय झालं. बायकांचा जन्म सहन करण्यासाठीच आहे, अशी मानसिकता अजूनही समाजातून किंवा अगदी माहेरच्या माणसांकडूनही त्या महिलेची केली जाते. त्यामुळे मारहाण होतेय ना, घरातच रहा, असं तिच्या मनावर बिंबवलं जातं. काही वेळा मुलं मोठी झाली तरीही महिलेला मारहाण होते.

- माधवी जाधव, संरक्षण अधिकारी, महिला व बालविकास