शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

नुकसानीचा आढावा घेण्यास सुरुवात

By admin | Updated: March 2, 2015 22:58 IST

पालघर जिल्ह्णात पडलेल्या अवेळी पावसासोबत वाऱ्याचे प्रमाण कमी असल्याने शेतकरी मच्छीमारांच्या नुकसानीचे प्रमाण कमी असले तरी सरासरी वीस मिलिमिटर इतकी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

चिपळूण : ग्रंथालय क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अत्यंत अल्प वेतनावर अर्धपोटी काम करावे लागत आहे. ग्रंथांच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. अन्य खर्चातही वाढ होत आहे. मात्र, त्यामानाने ग्रंथालयांच्या अनुदानात वाढ होत नाही. ग्रंथालयांना अच्छे दिन येणार कधी, असा प्रश्न या क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे.ग्रंथालयांसाठी मागील शासनाने ५० टक्के अनुदान वाढ केल्याचे जाहीर केले होते. पण, ती चक्क फसवणूक होती. ग्रंथालयाच्या कामातील किरकोळ त्रुटी दाखवून वाढलेले अनुदान रोखण्यात आले होते. अनेक ग्रंथालये बंद केली, काहींची वर्ग अवनती केली. आज पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेले अनेक ग्रंथपाल ७ ते ८ हजार रुपये वेतनालाही महाग झाले आहेत. शासन बदलले आता अनुदानात वाढ होईल आणि ग्रंथालयांना अच्छे दिन येतील, अशी अपेक्षा होती. मात्र, मार्च महिना उजाडला तरी अनुदानाचा दुसरा हप्ता आलेला नाही. पहिल्या हप्त्यात पूर्ण ५० टक्के रक्कम मिळालेली नाही ती केवळ ३५ टक्केच मिळाली. अनुदान नाही तर वेतन व ग्रंथ खरेदी कशी करायची, असा प्रश्न संचालकांना भेडसावतो. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे ग्रंथालय चळवळीशी संबंधित आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चांगले वाचक आहेत. ते ग्रंथालयांच्या समस्या समजून घेऊन मार्ग काढतील, अशी अपेक्षा ग्रंथालय क्षेत्रातील संचालक व कर्मचाऱ्यांना आहे. माजी मुख्यमंत्री विलास देशमुख यांनी शतक पार केलेल्या ग्रंथालयांना पाच लाखांचे अनुदान दिले होते. या मुख्यमंत्र्यांनीही असेच अनुदान देऊन सहकार्य करावे, असे आवाहन शतकोत्तर सुवर्ण महोत्सव वर्ष साजरे केलेल्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे यांनी केले आहे. ग्रंथालयांना शासनाने अनुदान वाढवून देण्याची मागणी करण्यात येत आहे.राज्यातील ग्रंथालयांच्या प्रश्नांवर अनेकवेळा विविध लढे देण्यात आले. मात्र, अशा ग्रंथालयांना अनेक प्रश्नांवर केवळ आश्वासनांपलिकडे काहीच प्राप्त झाले नाही. त्यामुळे अशा ग्रंथालयांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. राज्यात अनेक ग्रंथालयांची स्थिती नाजूक असून, अशा ग्रंथालयांना प्रगती करण्यासाठी अनेक योजनांचा पाठपरावा करावा लागणार आहे. (प्रतिनिधी)