शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
5
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
6
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
7
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
8
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
9
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
10
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
11
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
12
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
13
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
14
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
15
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
16
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
17
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
18
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
19
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
20
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर

आंब्याच्या मोहोर प्रक्रियेला प्रारंभ

By admin | Updated: November 8, 2015 23:42 IST

अवेळी (फेब्रुप्वारी/मार्च) मध्ये पडलेल्या पावसामुळे मोहोर कुजला व फळे गळून पडल्याने शेतकऱ्यांचे ७० टक्क्यांपेक्षा अधिक पीक वाया गे

रत्नागिरी : दिवाळी आली तरी अद्याप थंडीचा पत्ता नाही. शिवाय गेल्या चार दिवसात पडलेला पाऊस यामुळे वातावरणात बदल झालेला दिसून येत आहे. परंतु आंब्यावरील मोहोर प्रक्रियेस प्रारंभ झाल्यामुळे बागायतदार मात्र सुखावला आहे.आॅक्टोबरच्या अखेरीस थंडीला सुरुवात होते. परंतु नोव्हेंबर सुरू झाला तरी थंडी सुरू झालेली नाही. शिवाय गेल्या आठवड्यात ठिकठिकाणी पाऊस झाला आहे. यावर्षी पाऊस सुरुवातीपासून लांबला. साधारणत: सरासरीपेक्षा निम्माच पाऊस झाला आहे. त्यामुळे यावर्षी पालवीचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे किरकोळ स्वरूपात का होईना मोहोराला प्रारंभ झाला आहे. यावर्षी पावसाळ्यातही उन्हाळा अनुभवला आहे. अद्याप कडक ऊन कोसळत आहे. त्यामुळे आलेला मोहोर सुरक्षित आहे. कोणत्याही प्रकारच्या कीडसदृश रोगाचा प्रादुर्भाव झालेला नाही. वास्तविक तापमानात बदल होणे अपेक्षित आहे. हवेत गारवा निर्माण होणे आवश्यक आहे. १६ अंश सेल्सियसपर्यंत तापमान खाली आल्यावर मोहोर सुरू होतो. परंतु ठिकठिकाणी पाऊस पडत असल्याने सकाळचे ढगाळ वातावरण आहे. नोव्हेंबरच्या मध्यापासून थंडी सुरू होण्याची आशा आहे. त्यामुळे तद्नंतर मोठ्या प्रमाणावर फुलोऱ्यास प्रारंभ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर्षी मार्चपासूनच आंबा हंगाम सुरू होण्याची शक्यता आहे. गतवर्षी मोहोर चांगला येऊन फळधारणाही बऱ्यापैकी झाली होती. परंतु अवेळी (फेब्रुप्वारी/मार्च) मध्ये पडलेल्या पावसामुळे मोहोर कुजला व फळे गळून पडल्याने शेतकऱ्यांचे ७० टक्क्यांपेक्षा अधिक पीक वाया गेले होते. दरवर्षीपेक्षा यावर्षी पावसाचे सरासरी प्रमाण कमी राहिले आहे. त्यामुळे झाडांना पालवी आली नाही. परिणामी मोहोर प्रक्रिया लवकर सुरू झाली आहे. अवेळचा पाऊस, अवेळची थंडी, उच्चतम तापमान यामुळे होणारी नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी आंबापीक विमा योजना सुरू केली. प्रायोगिकतत्त्वावर तीन वर्षांपूर्वी विमा योजना सुरू केली. परंतु या योजनेतील त्रुटीमुळे शेतकऱ्यांमध्ये विमा योजनेविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. शिवाय यावर्षी अद्याप त्याबाबत काही सूचना करण्यात आलेल्या नाहीत.(प्रतिनिधी)यावर्षी पावसाचे प्रमाण अल्प राहिल्यामुळे मोहोर प्रक्रिया सुरू झाली आहे. पावसाअभावी यावर्षी शेतकऱ्यांनी कल्टारचा वापरही फारसा केलेला नाही. दिवाळीपासून थंडी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोहोर प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर होईल. शेतकऱ्यांकडून मोहोर वाचवण्यासाठी प्रतिबंधात्मक कीटकनाशक फवारणी सुरू करण्यात आली आहे. गतवर्षी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शासनाकडून जाहीर करण्यात आलेली नुकसान भरपाई अद्याप काही शेतकऱ्यांना प्राप्त झालेली नाही. त्यामुळे यावर्षी चांगले उत्पन्न मिळून शेतकऱ्यांचा तोटा भरून निघावा, अशी अपेक्षा आहे.- एम. एम. गुरव, शेतकरी