शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

आंब्याच्या मोहोर प्रक्रियेला प्रारंभ

By admin | Updated: November 8, 2015 23:42 IST

अवेळी (फेब्रुप्वारी/मार्च) मध्ये पडलेल्या पावसामुळे मोहोर कुजला व फळे गळून पडल्याने शेतकऱ्यांचे ७० टक्क्यांपेक्षा अधिक पीक वाया गे

रत्नागिरी : दिवाळी आली तरी अद्याप थंडीचा पत्ता नाही. शिवाय गेल्या चार दिवसात पडलेला पाऊस यामुळे वातावरणात बदल झालेला दिसून येत आहे. परंतु आंब्यावरील मोहोर प्रक्रियेस प्रारंभ झाल्यामुळे बागायतदार मात्र सुखावला आहे.आॅक्टोबरच्या अखेरीस थंडीला सुरुवात होते. परंतु नोव्हेंबर सुरू झाला तरी थंडी सुरू झालेली नाही. शिवाय गेल्या आठवड्यात ठिकठिकाणी पाऊस झाला आहे. यावर्षी पाऊस सुरुवातीपासून लांबला. साधारणत: सरासरीपेक्षा निम्माच पाऊस झाला आहे. त्यामुळे यावर्षी पालवीचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे किरकोळ स्वरूपात का होईना मोहोराला प्रारंभ झाला आहे. यावर्षी पावसाळ्यातही उन्हाळा अनुभवला आहे. अद्याप कडक ऊन कोसळत आहे. त्यामुळे आलेला मोहोर सुरक्षित आहे. कोणत्याही प्रकारच्या कीडसदृश रोगाचा प्रादुर्भाव झालेला नाही. वास्तविक तापमानात बदल होणे अपेक्षित आहे. हवेत गारवा निर्माण होणे आवश्यक आहे. १६ अंश सेल्सियसपर्यंत तापमान खाली आल्यावर मोहोर सुरू होतो. परंतु ठिकठिकाणी पाऊस पडत असल्याने सकाळचे ढगाळ वातावरण आहे. नोव्हेंबरच्या मध्यापासून थंडी सुरू होण्याची आशा आहे. त्यामुळे तद्नंतर मोठ्या प्रमाणावर फुलोऱ्यास प्रारंभ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर्षी मार्चपासूनच आंबा हंगाम सुरू होण्याची शक्यता आहे. गतवर्षी मोहोर चांगला येऊन फळधारणाही बऱ्यापैकी झाली होती. परंतु अवेळी (फेब्रुप्वारी/मार्च) मध्ये पडलेल्या पावसामुळे मोहोर कुजला व फळे गळून पडल्याने शेतकऱ्यांचे ७० टक्क्यांपेक्षा अधिक पीक वाया गेले होते. दरवर्षीपेक्षा यावर्षी पावसाचे सरासरी प्रमाण कमी राहिले आहे. त्यामुळे झाडांना पालवी आली नाही. परिणामी मोहोर प्रक्रिया लवकर सुरू झाली आहे. अवेळचा पाऊस, अवेळची थंडी, उच्चतम तापमान यामुळे होणारी नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी आंबापीक विमा योजना सुरू केली. प्रायोगिकतत्त्वावर तीन वर्षांपूर्वी विमा योजना सुरू केली. परंतु या योजनेतील त्रुटीमुळे शेतकऱ्यांमध्ये विमा योजनेविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. शिवाय यावर्षी अद्याप त्याबाबत काही सूचना करण्यात आलेल्या नाहीत.(प्रतिनिधी)यावर्षी पावसाचे प्रमाण अल्प राहिल्यामुळे मोहोर प्रक्रिया सुरू झाली आहे. पावसाअभावी यावर्षी शेतकऱ्यांनी कल्टारचा वापरही फारसा केलेला नाही. दिवाळीपासून थंडी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोहोर प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर होईल. शेतकऱ्यांकडून मोहोर वाचवण्यासाठी प्रतिबंधात्मक कीटकनाशक फवारणी सुरू करण्यात आली आहे. गतवर्षी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शासनाकडून जाहीर करण्यात आलेली नुकसान भरपाई अद्याप काही शेतकऱ्यांना प्राप्त झालेली नाही. त्यामुळे यावर्षी चांगले उत्पन्न मिळून शेतकऱ्यांचा तोटा भरून निघावा, अशी अपेक्षा आहे.- एम. एम. गुरव, शेतकरी