शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:37 IST

रत्नागिरी : अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाली असून जिल्ह्यातील १४१ कनिष्ठ महाविद्यालयांतून कला, वाणिज्यसह विज्ञान विषयांसाठी २७ हजार ४२० ...

रत्नागिरी : अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाली असून जिल्ह्यातील १४१ कनिष्ठ महाविद्यालयांतून कला, वाणिज्यसह विज्ञान विषयांसाठी २७ हजार ४२० जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

कोरोनामुळे यावर्षी दहावीच्या परीक्षा न घेता वर्षभरात घेण्यात आलेल्या अभ्यासावर आधारित गुणांकन करून निकाल जाहीर करण्यात आला होता. जिल्ह्यातील २१ हजार ८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, दरवर्षीप्रमाणे पुन्हा विज्ञान, वाणिज्यसह शहरांमधील दर्जेदार महाविद्यालयांकडील कल वाढणार आहे. अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय रद्द झाल्यानंतर आता स्थानिक पातळीवर ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

जिल्ह्यात १४१ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. त्यात अनुदानित ६१, विना अनुदानित ५१, स्वयंअर्थसहाय्यित २९ महाविद्यालयांचा समावेश आहे. उत्तीर्ण झालेल्यांपेक्षा अकरावीच्या विविध शाखांमधील जागा अधिक आहेत. मात्र, अंतर्गत मूल्यमापनामुळे यावर्षी विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांचा टक्का अधिक आहे. त्यामुळे विज्ञान, वाणिज्य या दोन शाखांसाठी प्रवेश मिळविण्यासाठी ओढा वाढणार आहे. गतवर्षी ७५ टक्क्यांवर विज्ञान शाखेची प्रवेश प्रक्रिया बंद झाली होती. मात्र, यावर्षी ती जास्त गुणांवर बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाणिज्य शाखेच्या प्रवेशासाठी गुणांचा आलेख वाढण्याची शक्यता आहे.

ग्रामीण भागात अनेक कनिष्ठ महाविद्यालये असून, भविष्यातील संधीच्या दृष्टीने बहुतांश पालकांचा पाल्याला शहरातील, तालुका किंवा जिल्ह्यातील दर्जेदार महाविद्यालयांत प्रवेश घेण्यावर भर देत असल्याने नावाजलेल्या महाविद्यालयांकडे प्रवेशासाठी ओढा वाढत आहे. परिणामी महाविद्यालयीनस्तरावर प्रवेशासाठी चढाओढ होण्याची शक्यता आहे.