शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

अकरावी प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:37 IST

रत्नागिरी : अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाली असून जिल्ह्यातील १४१ कनिष्ठ महाविद्यालयांतून कला, वाणिज्यसह विज्ञान विषयांसाठी २७ हजार ४२० ...

रत्नागिरी : अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाली असून जिल्ह्यातील १४१ कनिष्ठ महाविद्यालयांतून कला, वाणिज्यसह विज्ञान विषयांसाठी २७ हजार ४२० जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

कोरोनामुळे यावर्षी दहावीच्या परीक्षा न घेता वर्षभरात घेण्यात आलेल्या अभ्यासावर आधारित गुणांकन करून निकाल जाहीर करण्यात आला होता. जिल्ह्यातील २१ हजार ८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, दरवर्षीप्रमाणे पुन्हा विज्ञान, वाणिज्यसह शहरांमधील दर्जेदार महाविद्यालयांकडील कल वाढणार आहे. अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय रद्द झाल्यानंतर आता स्थानिक पातळीवर ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

जिल्ह्यात १४१ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. त्यात अनुदानित ६१, विना अनुदानित ५१, स्वयंअर्थसहाय्यित २९ महाविद्यालयांचा समावेश आहे. उत्तीर्ण झालेल्यांपेक्षा अकरावीच्या विविध शाखांमधील जागा अधिक आहेत. मात्र, अंतर्गत मूल्यमापनामुळे यावर्षी विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांचा टक्का अधिक आहे. त्यामुळे विज्ञान, वाणिज्य या दोन शाखांसाठी प्रवेश मिळविण्यासाठी ओढा वाढणार आहे. गतवर्षी ७५ टक्क्यांवर विज्ञान शाखेची प्रवेश प्रक्रिया बंद झाली होती. मात्र, यावर्षी ती जास्त गुणांवर बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाणिज्य शाखेच्या प्रवेशासाठी गुणांचा आलेख वाढण्याची शक्यता आहे.

ग्रामीण भागात अनेक कनिष्ठ महाविद्यालये असून, भविष्यातील संधीच्या दृष्टीने बहुतांश पालकांचा पाल्याला शहरातील, तालुका किंवा जिल्ह्यातील दर्जेदार महाविद्यालयांत प्रवेश घेण्यावर भर देत असल्याने नावाजलेल्या महाविद्यालयांकडे प्रवेशासाठी ओढा वाढत आहे. परिणामी महाविद्यालयीनस्तरावर प्रवेशासाठी चढाओढ होण्याची शक्यता आहे.