शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

दादर-रत्नागिरीसह दिवा-सावंतवाडी पॅसेंजर सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : मुंबई ते रत्नागिरी आणि मुंबई ते सावंतवाडी दरम्यान पॅसेंजर रेल्वे सेवा सुरू करावी, अशी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : मुंबई ते रत्नागिरी आणि मुंबई ते सावंतवाडी दरम्यान पॅसेंजर रेल्वे सेवा सुरू करावी, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. यावेळी अन्य मागण्यांचे पत्रही त्यांच्याकडे देण्यात आले.

गेल्या वर्षी कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासून काेकण रेल्वे मार्गावरील दादर-रत्नागिरी आणि दिवा-सावंतवाडी या पॅसेंजर गाड्या बंद करण्यात आल्या आहेत. सध्या या मार्गावर अधिक तिकीट असलेल्या विशेष गाड्या चालविल्या जात आहेत. त्यामुळे सामान्य प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. प्रवाशांना साेयीच्या ठरणाऱ्या पॅसेंजर गाड्या पुन्हा सुरू करण्याची मागणी जाेर धरू लागली आहे. त्याच अनुषंगाने शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी रेल्वे प्रवास तिकीट व प्लॅटफॉर्म तिकीट यामध्ये केलेली मोठी वाढ त्वरित मागे घ्यावी, अशीही मागणी करण्यात आली.

रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार, लोकसभा शिवसेना गटनेते विनायक राऊत, माजी केंद्रीय मंत्री व खासदार अरविंद सावंत, खासदार राजन विचारे, खासदार संजय मंडलिक, खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिल्ली येथे भेट घेऊन निवेदन दिले.