शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अनलाॅकमुळे एसटी पूर्वपदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : शासनाने अनलाॅक जाहीर केले असल्याने तब्बल दोन महिन्यांनंतर सोमवारपासून शहरी, ग्रामीण, लांब पल्ल्याच्या मार्गावरील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : शासनाने अनलाॅक जाहीर केले असल्याने तब्बल दोन महिन्यांनंतर सोमवारपासून शहरी, ग्रामीण, लांब पल्ल्याच्या मार्गावरील एस. टी. सेवा पूर्ववत झाली आहे. दिवसभरात शहरी मार्गावर १२८ फेऱ्या, तर ग्रामीण व लांब पल्ल्याच्या १४०० गाड्या दिवसभरात सोडण्यात आल्या.

कोरोना रुग्णसंख्या वाढीमुळे एप्रिलमध्ये सुरुवातीला वीकेंड लाॅकडाऊन व नंतर कडक संचारबंदी लागू करण्यात आली. अत्यावश्यक सेवेंतर्गत एस.टी. वाहतुकीला परवानगी देण्यात आली. परंतु, दिवसभरात मोजक्याच बसेस सुरू होत्या. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील नऊ आगारांमध्ये ६१० बसेसद्वारे ४२०० फेऱ्या सुरू होत्या. त्याद्वारे दररोज दोन ते सव्वादोन लाख प्रवाशांची वाहतूक करण्यात येत होती. त्यामुळे दिवसाला ४७ ते ४८ लाख रुपयांचे उत्पन्न रत्नागिरी विभागाला प्राप्त होत होते. मात्र, संचारबंदी काळात १०० ते १२५ फेऱ्या सुरू होत्या. जिल्हा प्रशासनाने लाॅकडाऊन जाहीर केल्यानंतर फेऱ्यांच्या संख्येत घट होऊन ५० ते ५५ फेऱ्या सुरू होत्या. शासनाने अनलाॅक जाहीर केल्यानंतर राज्य परिवहन महामंडळाच्या सूचनेनुसार रत्नागिरी विभागातर्फे टप्प्या-टप्प्याने बसेस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून संबंधित मार्गावरील फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत.

विभागातील नऊ आगारांतून फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. ग्रामीण मार्गावरील बसेससह लांब पल्ल्याच्या बोरीवली, सांगली, मुंबई, तुळजापूर, स्वारगेट, लातूर, अर्नाळा, कोल्हापूर, आंबेजोगाई, अक्कलकोट, नृसिंहवाडी, पुणे, कऱ्हाड, भांडुप, मिरज, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, ठाणे, आदी मार्गांवर गाड्यांचे नियोजन करण्यात आले असून, संगणकीय आरक्षणही उपलब्ध करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील नऊ आगारांतून ग्रामीण भागातील एस.टी. सेवा पूर्ववत झाल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून प्रवास करण्यासाठी ‘ई’ पासची आवश्यकता नाही. सर्वच प्रवाशांना मास्क सक्तीचा असून, प्रवासी क्षमतेच्या पन्नास टक्के वाहतूक करण्यात येणार आहे. वैद्यकीय तसेच अन्य विविध कारणास्तव मुंबई, पुणे, कोल्हापूर, मिरज, सांगली मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा प्राप्त झाला आहे.

---------------------------

अनलाॅकमध्ये आंतर जिल्हा वाहतुकीसाठी शासनाने परवानगी दिली असून, नऊ आगारांतून महत्त्वाच्या मार्गावर गाड्यांचे वेळापत्रक निश्चित केले आहे. संगणकीय आरक्षण उपलब्ध करून दिले असून, प्रवाशांच्या प्रतिसादानंतर गाड्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे.

- सुनील भोकरे, विभागनियंत्रक, रत्नागिरी.