शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

अनलाॅकमुळे एसटी पूर्वपदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : शासनाने अनलाॅक जाहीर केले असल्याने तब्बल दोन महिन्यांनंतर सोमवारपासून शहरी, ग्रामीण, लांब पल्ल्याच्या मार्गावरील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : शासनाने अनलाॅक जाहीर केले असल्याने तब्बल दोन महिन्यांनंतर सोमवारपासून शहरी, ग्रामीण, लांब पल्ल्याच्या मार्गावरील एस. टी. सेवा पूर्ववत झाली आहे. दिवसभरात शहरी मार्गावर १२८ फेऱ्या, तर ग्रामीण व लांब पल्ल्याच्या १४०० गाड्या दिवसभरात सोडण्यात आल्या.

कोरोना रुग्णसंख्या वाढीमुळे एप्रिलमध्ये सुरुवातीला वीकेंड लाॅकडाऊन व नंतर कडक संचारबंदी लागू करण्यात आली. अत्यावश्यक सेवेंतर्गत एस.टी. वाहतुकीला परवानगी देण्यात आली. परंतु, दिवसभरात मोजक्याच बसेस सुरू होत्या. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील नऊ आगारांमध्ये ६१० बसेसद्वारे ४२०० फेऱ्या सुरू होत्या. त्याद्वारे दररोज दोन ते सव्वादोन लाख प्रवाशांची वाहतूक करण्यात येत होती. त्यामुळे दिवसाला ४७ ते ४८ लाख रुपयांचे उत्पन्न रत्नागिरी विभागाला प्राप्त होत होते. मात्र, संचारबंदी काळात १०० ते १२५ फेऱ्या सुरू होत्या. जिल्हा प्रशासनाने लाॅकडाऊन जाहीर केल्यानंतर फेऱ्यांच्या संख्येत घट होऊन ५० ते ५५ फेऱ्या सुरू होत्या. शासनाने अनलाॅक जाहीर केल्यानंतर राज्य परिवहन महामंडळाच्या सूचनेनुसार रत्नागिरी विभागातर्फे टप्प्या-टप्प्याने बसेस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून संबंधित मार्गावरील फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत.

विभागातील नऊ आगारांतून फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. ग्रामीण मार्गावरील बसेससह लांब पल्ल्याच्या बोरीवली, सांगली, मुंबई, तुळजापूर, स्वारगेट, लातूर, अर्नाळा, कोल्हापूर, आंबेजोगाई, अक्कलकोट, नृसिंहवाडी, पुणे, कऱ्हाड, भांडुप, मिरज, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, ठाणे, आदी मार्गांवर गाड्यांचे नियोजन करण्यात आले असून, संगणकीय आरक्षणही उपलब्ध करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील नऊ आगारांतून ग्रामीण भागातील एस.टी. सेवा पूर्ववत झाल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून प्रवास करण्यासाठी ‘ई’ पासची आवश्यकता नाही. सर्वच प्रवाशांना मास्क सक्तीचा असून, प्रवासी क्षमतेच्या पन्नास टक्के वाहतूक करण्यात येणार आहे. वैद्यकीय तसेच अन्य विविध कारणास्तव मुंबई, पुणे, कोल्हापूर, मिरज, सांगली मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा प्राप्त झाला आहे.

---------------------------

अनलाॅकमध्ये आंतर जिल्हा वाहतुकीसाठी शासनाने परवानगी दिली असून, नऊ आगारांतून महत्त्वाच्या मार्गावर गाड्यांचे वेळापत्रक निश्चित केले आहे. संगणकीय आरक्षण उपलब्ध करून दिले असून, प्रवाशांच्या प्रतिसादानंतर गाड्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे.

- सुनील भोकरे, विभागनियंत्रक, रत्नागिरी.