शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
3
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
4
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
5
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
6
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
7
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
8
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
9
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
10
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
11
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
12
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
13
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
14
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
16
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
17
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
18
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
19
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
20
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार

अनलाॅकमुळे एसटी पूर्वपदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : शासनाने अनलाॅक जाहीर केले असल्याने तब्बल दोन महिन्यांनंतर सोमवारपासून शहरी, ग्रामीण, लांब पल्ल्याच्या मार्गावरील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : शासनाने अनलाॅक जाहीर केले असल्याने तब्बल दोन महिन्यांनंतर सोमवारपासून शहरी, ग्रामीण, लांब पल्ल्याच्या मार्गावरील एस. टी. सेवा पूर्ववत झाली आहे. दिवसभरात शहरी मार्गावर १२८ फेऱ्या, तर ग्रामीण व लांब पल्ल्याच्या १४०० गाड्या दिवसभरात सोडण्यात आल्या.

कोरोना रुग्णसंख्या वाढीमुळे एप्रिलमध्ये सुरुवातीला वीकेंड लाॅकडाऊन व नंतर कडक संचारबंदी लागू करण्यात आली. अत्यावश्यक सेवेंतर्गत एस.टी. वाहतुकीला परवानगी देण्यात आली. परंतु, दिवसभरात मोजक्याच बसेस सुरू होत्या. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील नऊ आगारांमध्ये ६१० बसेसद्वारे ४२०० फेऱ्या सुरू होत्या. त्याद्वारे दररोज दोन ते सव्वादोन लाख प्रवाशांची वाहतूक करण्यात येत होती. त्यामुळे दिवसाला ४७ ते ४८ लाख रुपयांचे उत्पन्न रत्नागिरी विभागाला प्राप्त होत होते. मात्र, संचारबंदी काळात १०० ते १२५ फेऱ्या सुरू होत्या. जिल्हा प्रशासनाने लाॅकडाऊन जाहीर केल्यानंतर फेऱ्यांच्या संख्येत घट होऊन ५० ते ५५ फेऱ्या सुरू होत्या. शासनाने अनलाॅक जाहीर केल्यानंतर राज्य परिवहन महामंडळाच्या सूचनेनुसार रत्नागिरी विभागातर्फे टप्प्या-टप्प्याने बसेस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून संबंधित मार्गावरील फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत.

विभागातील नऊ आगारांतून फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. ग्रामीण मार्गावरील बसेससह लांब पल्ल्याच्या बोरीवली, सांगली, मुंबई, तुळजापूर, स्वारगेट, लातूर, अर्नाळा, कोल्हापूर, आंबेजोगाई, अक्कलकोट, नृसिंहवाडी, पुणे, कऱ्हाड, भांडुप, मिरज, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, ठाणे, आदी मार्गांवर गाड्यांचे नियोजन करण्यात आले असून, संगणकीय आरक्षणही उपलब्ध करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील नऊ आगारांतून ग्रामीण भागातील एस.टी. सेवा पूर्ववत झाल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून प्रवास करण्यासाठी ‘ई’ पासची आवश्यकता नाही. सर्वच प्रवाशांना मास्क सक्तीचा असून, प्रवासी क्षमतेच्या पन्नास टक्के वाहतूक करण्यात येणार आहे. वैद्यकीय तसेच अन्य विविध कारणास्तव मुंबई, पुणे, कोल्हापूर, मिरज, सांगली मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा प्राप्त झाला आहे.

---------------------------

अनलाॅकमध्ये आंतर जिल्हा वाहतुकीसाठी शासनाने परवानगी दिली असून, नऊ आगारांतून महत्त्वाच्या मार्गावर गाड्यांचे वेळापत्रक निश्चित केले आहे. संगणकीय आरक्षण उपलब्ध करून दिले असून, प्रवाशांच्या प्रतिसादानंतर गाड्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे.

- सुनील भोकरे, विभागनियंत्रक, रत्नागिरी.