शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
3
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
4
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
5
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
6
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
7
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
8
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
9
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
10
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
11
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
12
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
13
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
14
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
15
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
16
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
17
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
18
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
19
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
20
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज

अनलाॅकमुळे एसटी पूर्वपदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : शासनाने अनलाॅक जाहीर केले असल्याने तब्बल दोन महिन्यांनंतर सोमवारपासून शहरी, ग्रामीण, लांब पल्ल्याच्या मार्गावरील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : शासनाने अनलाॅक जाहीर केले असल्याने तब्बल दोन महिन्यांनंतर सोमवारपासून शहरी, ग्रामीण, लांब पल्ल्याच्या मार्गावरील एस. टी. सेवा पूर्ववत झाली आहे. दिवसभरात शहरी मार्गावर १२८ फेऱ्या, तर ग्रामीण व लांब पल्ल्याच्या १४०० गाड्या दिवसभरात सोडण्यात आल्या.

कोरोना रुग्णसंख्या वाढीमुळे एप्रिलमध्ये सुरुवातीला वीकेंड लाॅकडाऊन व नंतर कडक संचारबंदी लागू करण्यात आली. अत्यावश्यक सेवेंतर्गत एस.टी. वाहतुकीला परवानगी देण्यात आली. परंतु, दिवसभरात मोजक्याच बसेस सुरू होत्या. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील नऊ आगारांमध्ये ६१० बसेसद्वारे ४२०० फेऱ्या सुरू होत्या. त्याद्वारे दररोज दोन ते सव्वादोन लाख प्रवाशांची वाहतूक करण्यात येत होती. त्यामुळे दिवसाला ४७ ते ४८ लाख रुपयांचे उत्पन्न रत्नागिरी विभागाला प्राप्त होत होते. मात्र, संचारबंदी काळात १०० ते १२५ फेऱ्या सुरू होत्या. जिल्हा प्रशासनाने लाॅकडाऊन जाहीर केल्यानंतर फेऱ्यांच्या संख्येत घट होऊन ५० ते ५५ फेऱ्या सुरू होत्या. शासनाने अनलाॅक जाहीर केल्यानंतर राज्य परिवहन महामंडळाच्या सूचनेनुसार रत्नागिरी विभागातर्फे टप्प्या-टप्प्याने बसेस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून संबंधित मार्गावरील फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत.

विभागातील नऊ आगारांतून फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. ग्रामीण मार्गावरील बसेससह लांब पल्ल्याच्या बोरीवली, सांगली, मुंबई, तुळजापूर, स्वारगेट, लातूर, अर्नाळा, कोल्हापूर, आंबेजोगाई, अक्कलकोट, नृसिंहवाडी, पुणे, कऱ्हाड, भांडुप, मिरज, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, ठाणे, आदी मार्गांवर गाड्यांचे नियोजन करण्यात आले असून, संगणकीय आरक्षणही उपलब्ध करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील नऊ आगारांतून ग्रामीण भागातील एस.टी. सेवा पूर्ववत झाल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून प्रवास करण्यासाठी ‘ई’ पासची आवश्यकता नाही. सर्वच प्रवाशांना मास्क सक्तीचा असून, प्रवासी क्षमतेच्या पन्नास टक्के वाहतूक करण्यात येणार आहे. वैद्यकीय तसेच अन्य विविध कारणास्तव मुंबई, पुणे, कोल्हापूर, मिरज, सांगली मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा प्राप्त झाला आहे.

---------------------------

अनलाॅकमध्ये आंतर जिल्हा वाहतुकीसाठी शासनाने परवानगी दिली असून, नऊ आगारांतून महत्त्वाच्या मार्गावर गाड्यांचे वेळापत्रक निश्चित केले आहे. संगणकीय आरक्षण उपलब्ध करून दिले असून, प्रवाशांच्या प्रतिसादानंतर गाड्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे.

- सुनील भोकरे, विभागनियंत्रक, रत्नागिरी.