शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

झरा, पऱ्याच्या पाण्यावर भात लावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:21 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : ऐन भातशेती लावणीचा हंगाम अंतिम टप्प्यात असतानाच पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : ऐन भातशेती लावणीचा हंगाम अंतिम टप्प्यात असतानाच पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. त्यामुळे डोंगरमाथ्यावरून येणारे पाणी, नैसर्गिक झरे, पऱ्याच्या पाण्याचा आधार घेऊन भातलावणी करण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावली आहे. पाणी नसल्याने शेतं कोरडी पडली असून लागवड केलेल्या भातरोपांचेही नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

चिपळूण तालुक्यात यावर्षी मान्सून वेळेत दाखल झाला. सुरूवातीला पावसाने जोर धरल्याने भातपेरणी व फोडणीच्या कामात शेतकरीराजा गुंतला होता. वेळेत पावसाचे आगमन व पेरणी झाल्याने जून महिन्याच्या अखेरीस लागवडीयोग्य रोपे तयार झाली. त्यामुळे सध्या भातलावणीच्या कामानेही वेग घेतला आहे. भातलावणीचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे़. मात्र, गेले काही दिवस पावसाने उघडीप घेतल्याने शेतकऱ्यांसमाेर पेच निर्माण झाला आहे. लावणीसाठी शेतात चिखल करावा लागत असल्याने शेतात मुबलक पाण्याची गरज असते. पाऊसच गायब झाल्याने शेतात पाणी नाही. शेतात फोडणी केलेली जमिनीची माती सुकली आहे. त्यामुळे काही भागांतील भातलावण्या खोळंबल्या आहेत. लागवडी योग्य भातरोपे आजही शेतात उभीच असून शेतकऱ्यांचे लक्ष पावसाकडे लागले आहे. याबरोबरच शेत कोरडी झाल्याने लागवड केलेली भातरोपेही सुकून मरण्याची शक्यता आहे तसे घडल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. असे असतानाच तालुक्यातील काही भागांमधील शेतकऱ्यांनी नदी, ओढे, पऱ्यांसह नैसर्गिक झऱ्याचे पाणी शेताकडे वळविले आहे. त्यासाठी छोटे-छोटे पाट काढले जात आहेत. काही ठिकाणी पंप लावून, पाईपद्वारे, दगड-मातीच्या सहाय्याने पाणी शेतात घेत आहेत. या नैसर्गिक स्रोतांच्या पाण्यावर सध्या भातलावणी केली जात आहे.

-------------------------------

गेले दहा दिवस पाऊस गायब झाल्याने भातलावणीची कामे खोळंबली आहेत. एवढंच नव्हे तर शेतही कोरडी पडत असल्याने लावणीनंतरची भातरोपे जगणार कशी? असा प्रश्न पडला आहे. कोरोना महामारी, वाढती महागाई, इंधन दरवाढीमुळे अगोदरच शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच वेळीच भातलावणीची कामे मार्गी लागली नाही तर शेतकरीवर्ग मोठ्या संकटात सापडणार आहे.

- भूषण कांबळी, शेतकरी, कापसाळ.

------------------------------

भातलावणीसाठी नैसर्गिक झऱ्याचे पाणी शेताकडे वळविण्यात आले आहे.