शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
2
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
3
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
4
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
5
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
6
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
7
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
8
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
9
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
10
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
11
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
12
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
13
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
14
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
15
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
16
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
17
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
18
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
19
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
20
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!

झरा, पऱ्याच्या पाण्यावर भात लावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:21 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : ऐन भातशेती लावणीचा हंगाम अंतिम टप्प्यात असतानाच पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : ऐन भातशेती लावणीचा हंगाम अंतिम टप्प्यात असतानाच पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. त्यामुळे डोंगरमाथ्यावरून येणारे पाणी, नैसर्गिक झरे, पऱ्याच्या पाण्याचा आधार घेऊन भातलावणी करण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावली आहे. पाणी नसल्याने शेतं कोरडी पडली असून लागवड केलेल्या भातरोपांचेही नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

चिपळूण तालुक्यात यावर्षी मान्सून वेळेत दाखल झाला. सुरूवातीला पावसाने जोर धरल्याने भातपेरणी व फोडणीच्या कामात शेतकरीराजा गुंतला होता. वेळेत पावसाचे आगमन व पेरणी झाल्याने जून महिन्याच्या अखेरीस लागवडीयोग्य रोपे तयार झाली. त्यामुळे सध्या भातलावणीच्या कामानेही वेग घेतला आहे. भातलावणीचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे़. मात्र, गेले काही दिवस पावसाने उघडीप घेतल्याने शेतकऱ्यांसमाेर पेच निर्माण झाला आहे. लावणीसाठी शेतात चिखल करावा लागत असल्याने शेतात मुबलक पाण्याची गरज असते. पाऊसच गायब झाल्याने शेतात पाणी नाही. शेतात फोडणी केलेली जमिनीची माती सुकली आहे. त्यामुळे काही भागांतील भातलावण्या खोळंबल्या आहेत. लागवडी योग्य भातरोपे आजही शेतात उभीच असून शेतकऱ्यांचे लक्ष पावसाकडे लागले आहे. याबरोबरच शेत कोरडी झाल्याने लागवड केलेली भातरोपेही सुकून मरण्याची शक्यता आहे तसे घडल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. असे असतानाच तालुक्यातील काही भागांमधील शेतकऱ्यांनी नदी, ओढे, पऱ्यांसह नैसर्गिक झऱ्याचे पाणी शेताकडे वळविले आहे. त्यासाठी छोटे-छोटे पाट काढले जात आहेत. काही ठिकाणी पंप लावून, पाईपद्वारे, दगड-मातीच्या सहाय्याने पाणी शेतात घेत आहेत. या नैसर्गिक स्रोतांच्या पाण्यावर सध्या भातलावणी केली जात आहे.

-------------------------------

गेले दहा दिवस पाऊस गायब झाल्याने भातलावणीची कामे खोळंबली आहेत. एवढंच नव्हे तर शेतही कोरडी पडत असल्याने लावणीनंतरची भातरोपे जगणार कशी? असा प्रश्न पडला आहे. कोरोना महामारी, वाढती महागाई, इंधन दरवाढीमुळे अगोदरच शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच वेळीच भातलावणीची कामे मार्गी लागली नाही तर शेतकरीवर्ग मोठ्या संकटात सापडणार आहे.

- भूषण कांबळी, शेतकरी, कापसाळ.

------------------------------

भातलावणीसाठी नैसर्गिक झऱ्याचे पाणी शेताकडे वळविण्यात आले आहे.