शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

झरा, पऱ्याच्या पाण्यावर भात लावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:21 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : ऐन भातशेती लावणीचा हंगाम अंतिम टप्प्यात असतानाच पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : ऐन भातशेती लावणीचा हंगाम अंतिम टप्प्यात असतानाच पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. त्यामुळे डोंगरमाथ्यावरून येणारे पाणी, नैसर्गिक झरे, पऱ्याच्या पाण्याचा आधार घेऊन भातलावणी करण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावली आहे. पाणी नसल्याने शेतं कोरडी पडली असून लागवड केलेल्या भातरोपांचेही नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

चिपळूण तालुक्यात यावर्षी मान्सून वेळेत दाखल झाला. सुरूवातीला पावसाने जोर धरल्याने भातपेरणी व फोडणीच्या कामात शेतकरीराजा गुंतला होता. वेळेत पावसाचे आगमन व पेरणी झाल्याने जून महिन्याच्या अखेरीस लागवडीयोग्य रोपे तयार झाली. त्यामुळे सध्या भातलावणीच्या कामानेही वेग घेतला आहे. भातलावणीचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे़. मात्र, गेले काही दिवस पावसाने उघडीप घेतल्याने शेतकऱ्यांसमाेर पेच निर्माण झाला आहे. लावणीसाठी शेतात चिखल करावा लागत असल्याने शेतात मुबलक पाण्याची गरज असते. पाऊसच गायब झाल्याने शेतात पाणी नाही. शेतात फोडणी केलेली जमिनीची माती सुकली आहे. त्यामुळे काही भागांतील भातलावण्या खोळंबल्या आहेत. लागवडी योग्य भातरोपे आजही शेतात उभीच असून शेतकऱ्यांचे लक्ष पावसाकडे लागले आहे. याबरोबरच शेत कोरडी झाल्याने लागवड केलेली भातरोपेही सुकून मरण्याची शक्यता आहे तसे घडल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. असे असतानाच तालुक्यातील काही भागांमधील शेतकऱ्यांनी नदी, ओढे, पऱ्यांसह नैसर्गिक झऱ्याचे पाणी शेताकडे वळविले आहे. त्यासाठी छोटे-छोटे पाट काढले जात आहेत. काही ठिकाणी पंप लावून, पाईपद्वारे, दगड-मातीच्या सहाय्याने पाणी शेतात घेत आहेत. या नैसर्गिक स्रोतांच्या पाण्यावर सध्या भातलावणी केली जात आहे.

-------------------------------

गेले दहा दिवस पाऊस गायब झाल्याने भातलावणीची कामे खोळंबली आहेत. एवढंच नव्हे तर शेतही कोरडी पडत असल्याने लावणीनंतरची भातरोपे जगणार कशी? असा प्रश्न पडला आहे. कोरोना महामारी, वाढती महागाई, इंधन दरवाढीमुळे अगोदरच शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच वेळीच भातलावणीची कामे मार्गी लागली नाही तर शेतकरीवर्ग मोठ्या संकटात सापडणार आहे.

- भूषण कांबळी, शेतकरी, कापसाळ.

------------------------------

भातलावणीसाठी नैसर्गिक झऱ्याचे पाणी शेताकडे वळविण्यात आले आहे.