शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

मसालेदार पदार्थांमुळे होतो अल्सर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : तिखट, मसालेदार, चमचमीत पदार्थ आहारात मोठ्या प्रमाणावर आल्यास पोटाच्या अल्सरचा त्रास होऊ शकतो. पचनमार्गाच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : तिखट, मसालेदार, चमचमीत पदार्थ आहारात मोठ्या प्रमाणावर आल्यास पोटाच्या अल्सरचा त्रास होऊ शकतो. पचनमार्गाच्या आवरणावर जखमा झाल्याने अल्सर आजार होतो. अल्सर आतड्याच्या पहिल्या भागात किंवा पोटात होतो. हेलिकोबॅक्क्टर पायरोली नावाच्या जिवाणूमुळे बरेचसे अल्सर होतात.

काहीजणांना अतितिखट, मसालेदार पदार्थ खाण्याची सवय असते. अशा तिखट, चमचमीत पदार्थांमुळे पचनमार्गाच्या आवरणावर जखमा होतात. आम्ल व इतर पाचक द्रव्ये पचनमार्गावर जळजळ करून अल्सर होण्यासाठी अनुकूल ठरतात. शारीरिक आणि मानसिक त्रासामुळेही अल्सरचे प्रमाण वाढते. त्यामुळे तीव्र पोटदुखी, पोट जड वाटणे, आंबट ढेकर येणे, जळजळ, पोट बिघडणे, उलटी, मळमळ जाणवणे, उलटीवाटे रक्त जाणे, छातीत जळजळणे आदी लक्षणे दिसू लागतात.

अल्सर धोकादायक असेल तर काही लक्षणे अधिक तीव्र होतात. त्यामुळे उलटीवाटे, शाैचावाटे रक्त जाणे, सतत उलट्या होणे, अशक्तपणा, वजनात घट, पोटात अचानक जोरात दुखणे, औषध घेऊनही पोटदुखी न थांबणे आदी लक्षणे सुरू होतात.

काहीवेळा अशुद्ध पाण्यातून जिवाणूंचा संसर्ग होतो. त्यामुळेही पोटाचा अल्सर होण्याचा धोका संभवतो, तसेच अवेळी आहार, बराच काळ पोट रिकामे रहाणे यामुळेही अल्सरचा त्रास होऊ शकतो. त्यासाठी जेवणाची वेळ नियमित असावी. आहारात जास्त तिखट, मसालेदार, तेलकट, जळजळ करणारे पदार्थांचा वापर करू नये, जागरण करू नये, भरपूर पाणी, तेही शुद्ध स्वरूपातीलच प्यावे, असा सल्ला आरोग्य तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे.

........................

काय आहेत लक्षणे?

- पोट दुखणे

- उलट्या होणे

- भूक मंदावणे

- वजनात अचानक घट होणे

.......................................

काय काळजी घेणार?

धूम्रपान टाळणे, डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे, कॅफेनचे सेवन करणे टाळावे.

दारूचे अतिसेवन टाळावे. दारूतील असलेल्या अल्हाेकोलमुळेही अल्सरचा त्रास अधिक वाढतो.

पिण्याचे पाणी अशुद्ध असेल तर त्यातील जिवाणूंमुळेही आतड्याला किंवा जठराला किंवा आतड्याच्या पहिला भागाला जखमा होतात. त्यामुळे भरपूर आणि शुद्ध पाणी प्यावे.

वेळी, अवेळी खाणे टाळावे, वेळेत जेवण घ्यावे. बराच काळ पोट रिकामे ठेवू नये.

मनावर असलेला अतिरिक्त ताणही अल्सरला आमंत्रण देतो. रात्री उशिरापर्यंत जागरण टाळावी.

..........................

पाैष्टिक आहार हाच महत्त्वाचा

अल्सरची अनेक कारणे आहेत, त्यातील अतितिखट, मसालेदार पदार्थ खाणे, अवेळी जेवणे आदी महत्त्वाची कारणे आहे. त्याचबरोबर दूषित पाणी हेही महत्वाचे कारण आहे. त्यामुळे अल्सरला दूर ठेवायचे असेल तर त्यासाठी शरीरात आम्ल वाढविणारे पदार्थ न खाता त्रासदायक नसलेले पण पाैष्टिक पदार्थ यांचा समावेश आहारात असणे गरजेचे आहे. तसेच जागरण, मनावरील ताण टाळते, हेही गरजेचे आहे.

- डाॅ. रवींद्र गोंधळेकर, पोट विकारतज्ज्ञ, रत्नागिरी.

...................................

गॅस्ट्रीक अल्सर म्हणजे पोटाचा अल्सर होणे. यात मोठ्या प्रमाणावर होणारी ॲसिडीटी, पित्ताचा त्रास, चहाचे, मद्याचे अतिप्रमाण, जागरण ही अनेक कारणे आहेत. त्यामुळे अल्सरला दूर ठेवण्यासाठी तणाव दूर ठेवणे, जागरण टाळणे, जेवणातील अनियमितता याबरोबरच हलका पाैष्टिक आहार घेणे, गरजेचे आहे.

- डाॅ. सुजित जाधव, जनरल फिज़िशियन रत्नागिरे.