शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! उद्धव आणि राज सभास्थळी दाखल
2
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
3
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
4
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
5
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
6
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
7
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
8
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
9
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
10
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
11
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
12
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
13
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
14
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
15
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
16
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
17
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
18
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
19
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
20
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?

निधीच्या घोडदौडीला कासवाची गती

By admin | Updated: January 2, 2015 00:10 IST

मनरेगा योजना : निधी ३५४ कोटी, खर्च मात्र ३ कोटी ८६ लाख

रहिम दलाल- रत्नागिरी -महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या चालू आर्थिक वर्षाचा आराखडा ३५४ कोटी रुपयांचा आहे़ मात्र, या योजनेचे काम सध्या कासव गतीने सुरु असून, गेल्या नऊ महिन्यात केवळ ३ कोटी ८६ लाख रुपये इतका अत्यल्प खर्च झाला आहे़ या योजनेच्या कामासाठी मजूर पुढे येत नाहीत, अशी ओरड अधिकारी करीत असतानाच अधिकारी व कर्मचारी लोकांपर्यंत पोहोचत नसल्याचा आरोप लोकप्रतिनिधींकडून करण्यात येत आहे़ मग्रारोहयोमुळे ग्रामीण भागात रोजगार मिळत आहे़ त्यासाठी अंगमेहनतीची कामे करणे आवश्यक आहे़ या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला वर्षातून १०० दिवस काम मिळणार असल्याने हजारो कुटुंबांना त्याचा लाभ होणार आहे़जिल्ह्यात मग्रारोहयोच्या १,१३,८८४ मजुरांना जॉबकार्ड वाटप करण्यात आली आहेत़ त्यापैकी ५७,२९३ मजुरांची खाती पोस्टामध्ये आणि १४,४९८ मजुरांची खाती बँकांमध्ये उघडलेली आहेत़ मग्रारोहयोचे काम करणाऱ्या मजुरांच्या खात्यामध्ये मजुरीची रक्कम जमा करण्यात येते़ मग्रारोहयोच्या कामांसाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडून ५३०१ प्रस्ताव रत्नागिरी जिल्हा परिषदेला प्राप्त झाले होते. त्यापैकी ४३२६ प्रस्तावांना जिल्हा प्रशासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. मंजुरी देण्यात आलेल्या कामांपैकी ११६६ कामे जिल्ह्यात सुरु आहे. सुरु असलेल्या कामांमध्ये शौचालये- ९१८, गोठा - कुक्कुटपालन शेड - २६, शोषखड्डा - ८०, विहिरी - २०, रस्ते - ६, नेफेड खत - गांडूळ खत - ५६, फळबागा - ४१, खड्डे व वृक्ष लागवड- १, वृक्ष संगोपन - ११, गाळ काढणे - २, संरक्षक भिंत - ५ या कामांचा त्यामध्ये समावेश आहे़ जिल्ह्यात आतापर्यंत ८०३ कामे पूर्ण झाली आहेत़ जिल्ह्याचा आराखडा ३५४ कोटी रुपयांचा असून, त्यामध्ये सुरु असलेल्या कामांवर आणि पूर्ण झालेल्या कामांवर आतापर्यंत ३ कोटी ८६ लाख रुपये खर्च झाला आहे़ मात्र, हा खर्च आराखड्याच्या विचार करता तो अत्यल्प आहे़ मग्रारोहयोच्या आज जिल्ह्यात सुरु असलेल्या कामांबाबत लोकप्रतिनिधींकडून वेळोवेळी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. मग्रारोहयो योजना अधिकारी, कर्मचारीवर्ग ही योजना ग्रामस्तरापर्यंत नेण्यात कमी पडत असल्याचे लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे. ठेकेदार संस्कृती असल्याने ही योजना घेऊन आतापर्यंत किती लोकप्रतिनिधी लोकापर्यंत पोहोचले आहेत, हाही संशोधनाचा विषय आहे़मजुरांची समस्या...कोकणात मजुरांची समस्या भेडसावत आहे. त्याचा परिणाम या योजनेच्या निधी खर्चावर होत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. शासनाच्या या योजनेमुळे ग्रामीण भागातील अनेक विकासात्मक कामे होऊ शकतात. मात्र, त्याला स्थानिकांच्या श्रमाची जोड मिळत नसल्याने या योजनेचे काम संथगतीने सुरू आहे.