शहरं
Join us  
Trending Stories
1
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
2
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
3
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
4
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
5
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
6
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
7
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
8
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
9
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
10
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
11
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
12
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
13
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
14
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
15
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
16
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
17
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
18
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
20
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?

ग्रामीण भागात पेरण्यांची लगबग सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:23 IST

रत्नागिरी : मान्सूनपूर्व पाऊस सुरू झाल्याने ग्रामीण भागात शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू झाली आहे. ताैक्ते चक्रीवादळानंतर ...

रत्नागिरी : मान्सूनपूर्व पाऊस सुरू झाल्याने ग्रामीण भागात शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू झाली आहे. ताैक्ते चक्रीवादळानंतर जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. मात्र, त्यानंतर पावसाने उसंत घेतली होती. मात्र, अधूनमधून जिल्ह्याच्या विविध भागात पाऊस हजेरी लावत असल्यामुळे भात, नागलीच्या पेरण्या सुरू झाल्या आहेत.

जिल्ह्यात एकूण ७० हजार ३३४ हेक्टर क्षेत्रावर भातलागवड केली जाते. त्यासाठी साडेचार हजार क्विंटल भात बियाण्याची पेरणी करण्यात येते. याकरिता कृषी विभागातर्फे साडेचार हजार क्विंटल भात बियाण्याची मागणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना बियाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागू नये, यासाठी मे महिन्यातच कृषी विभागातर्फे बियाणे उपलब्ध करण्यात आले होते. खरीप हंगामासाठी जिल्ह्याला १३ हजार मेट्रिक टन खत मंजूर झाले असून, टप्प्याटप्प्याने खताची उपलब्धता करून देण्यात येत आहे. आतापर्यंत साडेपाच हजार मेट्रिक टन खताची उपलब्धता झाली आहे.

जिल्ह्यात एकूण ६५,१०९ हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकाची लागवड करण्यात आली असून, ५८ हजार ८३७ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. ९१,५०३ हेक्टर क्षेत्रावर काजूची लागवड करण्यात आली आहे तर ८३,२९२ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. याशिवाय नारळ व अन्य बागायतीसाठीही खते घालण्यात येतात. साधारणत: आंबा काढणीनंतर खते घालण्याची कामे सुरु होतात. भात लागवडीपूर्वी बागायतींना खते घातल्यास पावसाळ्यात ती चांगली लागू पडतात. त्यामुळे शेतकरी खते खरेदी करत असून, खते घालण्याचेही काम सध्या ग्रामीण भागातून सुरू झाले आहे.