शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

कुंभार्ली घाटातील ‘सोनापात्रा’ बनलाय मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:38 IST

चिपळूण : गुहागर-विजापूर मार्गावरील कोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या कुंभार्ली घाटातील सोनापात्रा या ठिकाणी रस्ताच खचल्यामुळे येथे वारंवार अपघात ...

चिपळूण : गुहागर-विजापूर मार्गावरील कोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या कुंभार्ली घाटातील सोनापात्रा या ठिकाणी रस्ताच खचल्यामुळे येथे वारंवार अपघात होऊन वाहतूक ठप्प होत आहे. याबाबत अलोरे शिरगाव पोलीस यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्रव्यवहार केला असला, तरी संबंधित खात्याचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर याविषयी स्थानिक लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प बसले आहेत.

कोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या कुंभार्ली घाट हा नागमोडी वळणाचा आहे. १८ किलोमीटर अंतराच्या घाटातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. सर्वात मोठा खड्डा सोनापात्रा याठिकाणी पडला आहे. पोफळीपासून घाट सुरू होतो आणि सोनापात्रा येथील एका अवघड वळणावर आल्यावर अर्धा घाट पूर्ण होतो. मात्र त्याच ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, रस्ता पूर्णपणे खचला आहे. त्यामुळे बऱ्याचदा ४० ते ५० टनाची अवजड वाहने या ठिकाणी अडकतात. काही वेळा वाहने जागेवर उलटून होऊन अपघात होतो. सततच्या घटनांमुळे अनेकदा या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होऊन घाट बंद होतो.

गणपती सण आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. जिल्ह्यातील आंबा घाट, कशेडी घाटात काही समस्या असेल तर कुंभार्ली घाटमार्गे वाहतूक करण्यात येते. मात्र सद्यस्थितीत कुंभार्ली घाटही बंद पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळीच लक्ष द्यावे, अशी मागणी वाहनचालक करीत आहेत.