शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

मांडवीतील सौरदीपस्तंभ रखडला...

By admin | Updated: December 4, 2014 23:37 IST

सुरक्षितता लांबणीवर : ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे स्तंभाचे काम अपूर्ण

रत्नागिरी : रत्नागिरी शहराचे वैभव असलेल्या मांडवी बंदर जेटीजवळ समुद्रात मच्छिमार नौकांसाठी रात्रीच्या वेळी मार्गदर्शक ठरेल, असा सोलर दीपस्तंभ उभारला जात आहे. मात्र, सहा महिन्यात जे काम पूर्ण करायचे होते ते वर्षभराचा कालावधी उलटून गेला तरी रखडले आहे. हे सहा महिन्यांचे काम पूर्ण होण्यास सहा वर्षांचा कालावधी लागणार काय, असा संतप्त सवाल आता रत्नागिरीकरांतून केला जात आहे. रत्नागिरी शहरात किल्ला भागात दीपगृह आहे. त्याचा मच्छिमारी नौकांना रात्रीच्या वेळी नौका योग्य मार्गाने आणण्यासाठी उपयोग होतो. मात्र, मांडवी बंदर जेटीजवळील समुद्रात ठिकठिकाणी खडकाळ भाग असून, भरतीच्या वेळी हे खडक मच्छिमारी नौकांना समजत नसल्याने मांडवी जेटी समुद्रात ज्या खोल भागापर्यंत आहे, त्यापुढे डावीकडील भागात सागरी पाण्यातच हा दीपस्तंभाचा कॉँक्रिट खांब उभारला जात आहे. सुमारे २० लाखांपेक्षा अधिक खर्च या खांबाच्या उभारणीसाठी येणार असून, त्यावर नंतर सौरऊर्जेवर चालणारा सुमारे दीड लाख किमतीचा दिवा बसविला जाणार आहे. या दीपस्तंभामुळे मच्छिमारांना पाण्यातील मार्गाबाबत मार्गदर्शन होणार असून, संभाव्य अपघात टळणार आहेत. त्याचप्रमाणे या सागरी दीपस्तंभामुळे मांडवी बंदराच्या सौंदर्यातही भर पडणार आहे. हा दीपस्तंभ सुरू झाल्यानंतर रात्रीच्या वेळी मांडवी जेटीवरील दृश्य हे विलोभनीयच असणार आहे. मात्र, सहा महिन्यांचे हे काम वर्ष झाले तरी अद्याप पूर्ण न झाल्याने त्यावर सौरऊर्जेवर चालणारा दिवा बसविणे दूरच राहिले आहे. याबाबत माहिती घेतली असता संबंधित ठेकेदार हे काम पूर्ण करण्यासाठी वाळू व तत्सम बांधकाम साहित्य मिळत नसल्याचे कारण दाखवित मुदतवाढ घेत असल्याचे पुढे आले आहे. जिल्ह्यात अन्यत्र बांधकामे जोरात सुरू आहेत. त्यासाठी वाळूही उपलब्ध होत असताना याच कामासाठी वाळू उपलब्ध होत नाही, असे कारण ठेकेदार देत असेल, तर जाणूनबुुजून हे काम पुढे ढकलण्याचाच हा प्रकार असल्याचे बोलले जात आहे. हे काम करण्यास ठेकेदार चालढकल करीत असेल तर त्याच्याकडील काम दुसऱ्या ठेकेदाराला द्यावे व लवकर हे काम पूर्ण व्हावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. शहरातील किनाऱ्यालगतचा भाग जसा मच्छिमारीसाठी महत्त्वाचा ठरला आहे, त्याचप्रमाणे या भागात पर्यटनदृष्ट्या अनेक ठिकाणे विकसित केली जाऊ शकतात. मात्र, मांडवी बंदर व जेटीच्या विकासाकडे म्हणावे तसे लक्ष अद्याप दिले जात नसल्याचेच चित्र असून, त्यामुळे पर्यटन विकासात अडथळे येत आहेत. रत्नागिरी हे एक अत्यंत सुंदर व चांगली भौगोलिक रचना असलेले शहर आहे. भगवती किल्ला परिसर, मिरकरवाडा बंदर, पांढरा समुद्र ते राजीवडा व पुढील भागापर्यंत या शहराला चांगला किनारा लाभला आहे. भाट्ये खाडीलगतचा परिसरही विलोभनीय आहे. या किनाऱ्यादरम्यान असलेले व रत्नागिरीचे ‘प्रवेशद्वार’ म्हणून प्रसिध्द असलेले मांडवी बंदर गेल्या काही वर्षांपासून दुर्लक्षित आहे. येथे किरकोळ डागडुजी करण्यापलिकडे जेटी विकासाबाबत काहीही घडलेले नाही. या बंदराच्या परिसरात हॉटेल्स, खाद्यविक्रेत्यांचे जाळे असताना ज्या समुद्राच्या आकर्षणापोटी पर्यटक या ठिकाणी येतात, त्या बंदराच्या विकासाकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार आहे. (प्रतिनिधी)‘कपल्स’ची भाईगिरीसमुद्रात खोल पाण्याच्या बाजूने असलेली जेटी येथील सागराच्या तुफानी लाटांनी अधिकच कमकुवत झाली आहे. हा भाग जेटीच्या प्रवेशद्वारापासून खूपच लांब अंतरावर आहे. या भागाकडे किनाऱ्याकडून लक्ष जात नसल्याने सध्या तेथे प्रेमीयुगुलांचा अड्डा बनला आहे. ओहोटीच्या वेळी तरुण-तरुणींची ‘कपल्स’ तेथे बसलेली दिसतात, तर नको ते प्रकारही तेथे घडत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे हे प्रकार तातडीने थांबवण्यासाठी कारवाईची मागणी होत आहे. बंदर जेटीची दुरुस्ती, सुशोभिकरण आवश्यकरत्नागिरीची बंदर जेटी जीर्ण झाली असून, अनेक ठिकाणी जमिनीकडून या जेटीला भेगा गेल्या आहेत. त्यामुळे या जेटीची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज आहे. जेटीवरील कॉँक्रीट मार्गही जागोजागी फुटला आहे. तसेच जेटीवर असलेल्या पथदिव्यांचे खांब गंजून गेले असून, अनेक खांब मोडलेले आहेत. त्यावरील दिवे तर केव्हाच गायब झाले आहेत. आता यापैकी काही खांबाना ट्युबलाइट्स बांधून ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, भरतीच्या वेळी त्यावर लाटांचे पाणी उडून या ट्यूबलाईट्स जाण्याचीच शक्यता अधिक आहे.