शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
2
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
3
Shivalik Sharma: मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला अटक, लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
4
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
5
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
6
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
7
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
8
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
9
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
10
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
11
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
12
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
13
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
14
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
15
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
16
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
17
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
18
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
19
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
20
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल

मांडवीतील सौरदीपस्तंभ रखडला...

By admin | Updated: December 4, 2014 23:37 IST

सुरक्षितता लांबणीवर : ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे स्तंभाचे काम अपूर्ण

रत्नागिरी : रत्नागिरी शहराचे वैभव असलेल्या मांडवी बंदर जेटीजवळ समुद्रात मच्छिमार नौकांसाठी रात्रीच्या वेळी मार्गदर्शक ठरेल, असा सोलर दीपस्तंभ उभारला जात आहे. मात्र, सहा महिन्यात जे काम पूर्ण करायचे होते ते वर्षभराचा कालावधी उलटून गेला तरी रखडले आहे. हे सहा महिन्यांचे काम पूर्ण होण्यास सहा वर्षांचा कालावधी लागणार काय, असा संतप्त सवाल आता रत्नागिरीकरांतून केला जात आहे. रत्नागिरी शहरात किल्ला भागात दीपगृह आहे. त्याचा मच्छिमारी नौकांना रात्रीच्या वेळी नौका योग्य मार्गाने आणण्यासाठी उपयोग होतो. मात्र, मांडवी बंदर जेटीजवळील समुद्रात ठिकठिकाणी खडकाळ भाग असून, भरतीच्या वेळी हे खडक मच्छिमारी नौकांना समजत नसल्याने मांडवी जेटी समुद्रात ज्या खोल भागापर्यंत आहे, त्यापुढे डावीकडील भागात सागरी पाण्यातच हा दीपस्तंभाचा कॉँक्रिट खांब उभारला जात आहे. सुमारे २० लाखांपेक्षा अधिक खर्च या खांबाच्या उभारणीसाठी येणार असून, त्यावर नंतर सौरऊर्जेवर चालणारा सुमारे दीड लाख किमतीचा दिवा बसविला जाणार आहे. या दीपस्तंभामुळे मच्छिमारांना पाण्यातील मार्गाबाबत मार्गदर्शन होणार असून, संभाव्य अपघात टळणार आहेत. त्याचप्रमाणे या सागरी दीपस्तंभामुळे मांडवी बंदराच्या सौंदर्यातही भर पडणार आहे. हा दीपस्तंभ सुरू झाल्यानंतर रात्रीच्या वेळी मांडवी जेटीवरील दृश्य हे विलोभनीयच असणार आहे. मात्र, सहा महिन्यांचे हे काम वर्ष झाले तरी अद्याप पूर्ण न झाल्याने त्यावर सौरऊर्जेवर चालणारा दिवा बसविणे दूरच राहिले आहे. याबाबत माहिती घेतली असता संबंधित ठेकेदार हे काम पूर्ण करण्यासाठी वाळू व तत्सम बांधकाम साहित्य मिळत नसल्याचे कारण दाखवित मुदतवाढ घेत असल्याचे पुढे आले आहे. जिल्ह्यात अन्यत्र बांधकामे जोरात सुरू आहेत. त्यासाठी वाळूही उपलब्ध होत असताना याच कामासाठी वाळू उपलब्ध होत नाही, असे कारण ठेकेदार देत असेल, तर जाणूनबुुजून हे काम पुढे ढकलण्याचाच हा प्रकार असल्याचे बोलले जात आहे. हे काम करण्यास ठेकेदार चालढकल करीत असेल तर त्याच्याकडील काम दुसऱ्या ठेकेदाराला द्यावे व लवकर हे काम पूर्ण व्हावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. शहरातील किनाऱ्यालगतचा भाग जसा मच्छिमारीसाठी महत्त्वाचा ठरला आहे, त्याचप्रमाणे या भागात पर्यटनदृष्ट्या अनेक ठिकाणे विकसित केली जाऊ शकतात. मात्र, मांडवी बंदर व जेटीच्या विकासाकडे म्हणावे तसे लक्ष अद्याप दिले जात नसल्याचेच चित्र असून, त्यामुळे पर्यटन विकासात अडथळे येत आहेत. रत्नागिरी हे एक अत्यंत सुंदर व चांगली भौगोलिक रचना असलेले शहर आहे. भगवती किल्ला परिसर, मिरकरवाडा बंदर, पांढरा समुद्र ते राजीवडा व पुढील भागापर्यंत या शहराला चांगला किनारा लाभला आहे. भाट्ये खाडीलगतचा परिसरही विलोभनीय आहे. या किनाऱ्यादरम्यान असलेले व रत्नागिरीचे ‘प्रवेशद्वार’ म्हणून प्रसिध्द असलेले मांडवी बंदर गेल्या काही वर्षांपासून दुर्लक्षित आहे. येथे किरकोळ डागडुजी करण्यापलिकडे जेटी विकासाबाबत काहीही घडलेले नाही. या बंदराच्या परिसरात हॉटेल्स, खाद्यविक्रेत्यांचे जाळे असताना ज्या समुद्राच्या आकर्षणापोटी पर्यटक या ठिकाणी येतात, त्या बंदराच्या विकासाकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार आहे. (प्रतिनिधी)‘कपल्स’ची भाईगिरीसमुद्रात खोल पाण्याच्या बाजूने असलेली जेटी येथील सागराच्या तुफानी लाटांनी अधिकच कमकुवत झाली आहे. हा भाग जेटीच्या प्रवेशद्वारापासून खूपच लांब अंतरावर आहे. या भागाकडे किनाऱ्याकडून लक्ष जात नसल्याने सध्या तेथे प्रेमीयुगुलांचा अड्डा बनला आहे. ओहोटीच्या वेळी तरुण-तरुणींची ‘कपल्स’ तेथे बसलेली दिसतात, तर नको ते प्रकारही तेथे घडत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे हे प्रकार तातडीने थांबवण्यासाठी कारवाईची मागणी होत आहे. बंदर जेटीची दुरुस्ती, सुशोभिकरण आवश्यकरत्नागिरीची बंदर जेटी जीर्ण झाली असून, अनेक ठिकाणी जमिनीकडून या जेटीला भेगा गेल्या आहेत. त्यामुळे या जेटीची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज आहे. जेटीवरील कॉँक्रीट मार्गही जागोजागी फुटला आहे. तसेच जेटीवर असलेल्या पथदिव्यांचे खांब गंजून गेले असून, अनेक खांब मोडलेले आहेत. त्यावरील दिवे तर केव्हाच गायब झाले आहेत. आता यापैकी काही खांबाना ट्युबलाइट्स बांधून ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, भरतीच्या वेळी त्यावर लाटांचे पाणी उडून या ट्यूबलाईट्स जाण्याचीच शक्यता अधिक आहे.