शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
3
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
4
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
5
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
6
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
7
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
8
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
9
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
10
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
11
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
12
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
13
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
14
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
15
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
16
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
17
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
18
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
19
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
20
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात

आठ पिढ्यांचे सोळकोबा आणि बाळकोबा

By admin | Updated: August 28, 2014 22:20 IST

रत्नागिरीचे महाराजे : मांडवीचे नव्हे; अख्ख्या जिल्ह्यातील गणेशभक्तांसाठी आकर्षण

उमेश पाटणकर -रत्नागिरी -एक दोन नव्हे; तब्बल अडीचशे घराण्यांचे आणि त्यांच्या आठव्या पिढीचे आराध्य दैवत ‘सोळकोबा-बाळकोबा’ गणेश चतुर्थीच्या दिवशी उद्या (शुक्रवार) सकाळी मांडवी येथे विराजमान होत आहेत. शिवलकर बंधूंचा हा खासगी उत्सव असला तरी स्थापनेपासून विसर्जनापर्यंत संपूर्ण मांडवी गाव त्यांच्या उत्सवात सहभागी होत असल्याने त्यांच्यासाठी हा उत्सव सार्वजनिकच झाला आहे.रत्नागिरी शहराचे अखेरचे टोक म्हणजे मांडवी. स्वतंत्र महसूली गाव म्हणून नोंद असलेल्या या गावात गणेशोत्सवात केवळ चौपाटी आहे म्हणून फिरायला जाणारे लोक ‘सोळकोबा-बाळकोबा’ ही नावे ऐकून या गणेशाच्या दर्शनाला जातात. वरचीवाडी, पिंपळवाडी, भैरववाडी, मायनाकवाडी आणि सदानंदवाडी अशा पाच वाड्यांच्या या गावात प्रतीश शिवलकर यांच्या निवासस्थानी ‘सोळकोबा’, तर राजेश शिवलकर यांच्याकडे ‘बाळकोबा’ विराजमान होतात. पूर्णत: हाती केलेले काम आणि १०० टक्के शाडू यांच्या वापरातून या दोन्ही मृर्ती घडवल्या जातात. शाडूच्या आधाराला काथ्याचा वापर केला जातो. शिवलकर घरण्याचे आठवे वारसदार असलेले प्रतीश यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, सोळा पोती शाडू वापरून घडणारी ही मूर्ती म्हणजेच ‘सोळकोबा’ तब्बल एक टनापेक्षा जास्त वजनाचा असायचा. यावर्षी वजन कमी करण्याच्या दृष्टीने १४ पोती शाडू वापरली असली तरी मूर्तीची उंची एकही इंच कमी झालेली नाही. वजन कमी करण्याच्या दृष्टीने आम्ही केलेला हा प्रयत्न आम्हाला किती लाभदायक ठरतो, हे पाहावे लागेल. आषाढी एकादशीपासून विधिवत मातीपूजन, चौरंग पूजन करून कामाला सुरुवात करतो, असे ‘बाळकोबा’चे मूर्तिकार राजेश शिवलकर यांनी सांगितले. बारा पोत्यांचा ‘बाळकोबा’ यावर्षी दहा पोती शाडू वापरून बनवल्याचे सांगितले. राम आळीतील कै. बाबूराव पाटणकर यांच्यासह त्यांच्या तीन पिढ्या या मूर्ती करत असत. त्यानंतर पुंडलिक मोतीराम शिवलकर यांनी ३० वर्षे, अनिष दिवाकर शिवलकर यांनी आठ वर्षे, तर स्वत: राजेश गेली २८ वर्षे ही मूर्ती बनवित आहेत. प्रसिध्द मूर्तिकार घन:श्याम भाटकर यांनीही सोळकोबा-बाळकोबाच्या मूर्ती घडवल्या आहेत. सोळकोबाची मूर्ती गेली दहा वर्षे अमित शिवलकर घडवित आहेत. राजेश शिवलकर यांनी दोन्ही मूर्तींचे वैशिष्ट्य म्हणून शासकीय परिभाषेतील ‘इको फ्रेंडली’ गणेशमूर्ती असा उल्लेख केला. कारण शाडूप्रमाणेच रंगकामासाठी ही केवळ जलरंगच वापरले जातात, असे सांगितले. मांडवी गावात गणेशोत्सवाची सुरुवात बाळकोबा- सोळकोबा यांच्या प्रतिष्ठापनेपासून होते. शहरातील अनेकजण बाळकोबा विराजमान झाल्याशिवाय आपला गणपती प्रतिष्ठापित करीत नाहीत. बाळकोबाच्या प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी वेदमूर्ती चिंतुकाका जोशी आवर्जून उपस्थित असतात. त्यांची ही सातवी पिढी आजही श्रींच्या सेवेत आहे. सोळकोबा - बाळकोबाचे विसर्जन गौरी विसर्जनाच्या दिवशीच केले जाते. खांद्यावरून विसर्जनासाठी मांडवीचे नव्हे रत्नागिरीचे महाराजे निघाल्याची वर्दी पोलिसांना मिळताच मांडवी नाक्यापासून जेटीपर्यंतचा रस्ता जास्तीत जास्त मोकळा राहील, याची काळजी पोलीस घेत असतात.