शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
2
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
3
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
4
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
5
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
6
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
7
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
8
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
9
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
10
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
11
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
12
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
13
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
14
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
15
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
16
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार
17
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
18
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
19
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
20
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर

समाजमंदिरे सौर यंत्रणेने उजळणार

By admin | Updated: June 29, 2015 00:28 IST

रत्नागिरी जिल्हा परिषद : २५ लाखांची केली तरतूद

रत्नागिरी : जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये सौरपथदीप आणि समाज मंदिरामध्ये सोलर सिस्टिम बसवण्यासाठी जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडून २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.वाढत्या महागाईसह विजेचे दरही दिवसेंदिवस वाढत चालल्याने ग्रामीण भागातील जनतेलाही मोठ्या प्रमाणात झळ बसत आहे. त्यातच समाजमंदिरांना विजेचा पुरवठा केल्यास त्यासाठी येणारे वीजबिल कोणी भरावे, हाही मोठा प्रश्न उपस्थित करण्यात येतो. विजेच्या बचतीसह महागाईवर मात करण्यासाठी सौरविजेचा वापर करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने समाजकल्याण विभागानेही पावले उचलली आहेत. जिल्ह्यातील ९० समाज मंदिरांमध्ये सौलर सिस्टिम लावण्यात येणार आहे. तसेच ४२४ सौरपथदीप ठिकठिकाणी दलित वस्त्यांमध्ये लावण्यात येणार आहेत.सौर विजेमुळे विजेची मोठ्या प्रमाणात बचत होतेच शिवाय या सौरऊर्जेवरील खर्चही कमी असल्याने हे सौर दिवे समाजमंदिरामध्ये परवडणारे ठरणार आहेत. समाजकल्याण विभागाने घेतलेल्या या निर्णयाचे सर्वस्तरातून स्वागत करण्यात येत आहे. त्यासाठी समाजकल्याण विभागाने २५ लाख रुपयांची तरतूद केली आहे. त्यामध्ये सोलर सिस्टिमसाठी १५ लाख रुपये आणि सौरदिव्यांसाठी १० लाख रुपयांचा समावेश करण्यात आला आहे. हे १०० टक्के अनुदानातून देण्यात येणार आहेत.त्यामुळेसमाजमंदिराला याचा चांगला फायदा होणार आहे. जिल्ह्यात समाजकल्याण विभागातर्फे प्रथमच असा आगळा वेगळाउपक्रम राबवण्यात येत असून या उपक्रमाचे जिल्हाभरातून स्वागत करण्यात येत आहे. (शहर वार्ताहर)