शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

समाजमंदिरे सौर यंत्रणेने उजळणार

By admin | Updated: June 29, 2015 00:28 IST

रत्नागिरी जिल्हा परिषद : २५ लाखांची केली तरतूद

रत्नागिरी : जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये सौरपथदीप आणि समाज मंदिरामध्ये सोलर सिस्टिम बसवण्यासाठी जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडून २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.वाढत्या महागाईसह विजेचे दरही दिवसेंदिवस वाढत चालल्याने ग्रामीण भागातील जनतेलाही मोठ्या प्रमाणात झळ बसत आहे. त्यातच समाजमंदिरांना विजेचा पुरवठा केल्यास त्यासाठी येणारे वीजबिल कोणी भरावे, हाही मोठा प्रश्न उपस्थित करण्यात येतो. विजेच्या बचतीसह महागाईवर मात करण्यासाठी सौरविजेचा वापर करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने समाजकल्याण विभागानेही पावले उचलली आहेत. जिल्ह्यातील ९० समाज मंदिरांमध्ये सौलर सिस्टिम लावण्यात येणार आहे. तसेच ४२४ सौरपथदीप ठिकठिकाणी दलित वस्त्यांमध्ये लावण्यात येणार आहेत.सौर विजेमुळे विजेची मोठ्या प्रमाणात बचत होतेच शिवाय या सौरऊर्जेवरील खर्चही कमी असल्याने हे सौर दिवे समाजमंदिरामध्ये परवडणारे ठरणार आहेत. समाजकल्याण विभागाने घेतलेल्या या निर्णयाचे सर्वस्तरातून स्वागत करण्यात येत आहे. त्यासाठी समाजकल्याण विभागाने २५ लाख रुपयांची तरतूद केली आहे. त्यामध्ये सोलर सिस्टिमसाठी १५ लाख रुपये आणि सौरदिव्यांसाठी १० लाख रुपयांचा समावेश करण्यात आला आहे. हे १०० टक्के अनुदानातून देण्यात येणार आहेत.त्यामुळेसमाजमंदिराला याचा चांगला फायदा होणार आहे. जिल्ह्यात समाजकल्याण विभागातर्फे प्रथमच असा आगळा वेगळाउपक्रम राबवण्यात येत असून या उपक्रमाचे जिल्हाभरातून स्वागत करण्यात येत आहे. (शहर वार्ताहर)