शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
Online Shopping Tips : ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
3
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
4
बॅंक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
5
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
6
आर्यन खानने 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' दिग्दर्शित केलीच नाही? या चर्चांवर मुख्य अभिनेत्री म्हणाली...
7
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
8
चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं?
9
संतापजनक अन् ह्रदयद्रावक! आधी दगड कोंबला, फेविक्विकने चिटकवले तोंड; १५ दिवसांचं बाळ फेकले जंगलात
10
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
11
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
12
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
13
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
14
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
15
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
16
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
17
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
18
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
19
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
20
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव

सोशल डिस्टन्सिंग, मास्क घालून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:21 IST

प्रत्येक फेरीनंतर बसचे केले जाते निर्जंतुकीकरण, सॅनिटायझरचाही वापर मेहरून नाकाडे लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : अनलाॅकनंतर राज्य परिवहन महामंडळातर्फे ...

प्रत्येक फेरीनंतर बसचे केले जाते निर्जंतुकीकरण, सॅनिटायझरचाही वापर

मेहरून नाकाडे

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : अनलाॅकनंतर राज्य परिवहन महामंडळातर्फे आंतरजिल्हा वाहतुकीसह ग्रामीण भागातील बससेवा सुरू करण्यात आली आहे. ग्रामीण भागात शेतीची कामे सुरू आहेत, शिवाय कोरोनाच्या भीतीमुळे प्रवाशांची संख्या घटली आहे. दुपारी १२ वाजता रत्नागिरी बसस्थानकातून कसोप-वायंगणी ही बस सुटली. या बसमधून अवघ्या १४ प्रवाशांनी प्रवास केला. प्रवाशांसह, चालक, वाहकांकडून कोरोनामुळे शासकीय नियमावलींचे पालन होत असलेले निदर्शनास आले.

गाडी बसस्थानकात लागण्यापूर्वी बसचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. बसस्थानकात बस लागताच वाहक प्रवाशांना मास्क व्यवस्थित लावूनच गाडीत प्रवेश करण्याबाबत सूचना करीत होत्या. त्यानुसार प्रवाशीही मास्क व्यवस्थित लावल्याची खात्री करीत होते. वाहक हाताला सॅनिटायझर वेळोवेळी लावत असल्याचे निदर्शनास आले. थांब्यावर बस थांबली असता प्रवाशांची चढ-उतार सुरू होती. मात्र, एका सीटवर एकच प्रवासी प्रवास करीत होता. प्रवाशांकडूनही नियमांचे पालन केले जात होते.

एक तासाच्या प्रवासात किती वेळ तोंडावर मास्क

चालक

एक तासाच्या संपूर्ण प्रवासात मास्क तोंडावरचा काढला नव्हता. बसफेरी संपल्यानंतरच मास्क काढला.

वाहक

घाम येत असल्याने प्रत्येक फेरीनंतर मास्क बदलून फेरी संपल्यानंतर हात साबणाने धूत असल्याचे सांगितले.

प्रवासी

बसमध्ये चढल्यापासून उतरेपर्यंत संपूर्ण प्रवासात प्रवाशांनी मास्क एकदाही काढला नव्हता.

भाट्ये गाव

बसस्थानकातून बस गीताभवन थांब्यावर येताच दोन प्रवासी चढले. भाट्ये गाव थांब्यावर एक प्रवासी बसमधून उतरला. प्रवासात प्रवाशांनी मास्क काढला नव्हता. एका सीटवर एकच प्रवासी बसला होता.

कसोप फाटा

भाट्येनंतर कोहिनूर हाॅटल, कुर्ली थांब्यानंतर थेट कसोप फाटा येथे बस थांबली. तेव्हा एक प्रवासी बसमधून उतरला. विशेषत: गाडीत महिला प्रवाशांची संख्या अधिक होती. सॅनिटायझरचा वापर प्रवासी करीत होते.

कसोप गाव

भाजी विक्रेत्या महिलांसह, औषधे व अन्य कामानिमित्त शहरात गेलेले चार प्रवासी कसोप गावात उतरले. सकाळी भाजी विक्रीसाठी गेलेल्या महिला भाजी विकून परतल्या होत्या.

वायंगणी गाव

वायंगणी गाव हा शेवटचा थांबा आहे. या थांब्यावर एकूण आठ प्रवासी उतरले. विविध कामांसाठी गेलो असल्याचे प्रवाशांनी सांगितले. येता-जाता प्रवासात मास्क न काढल्याचेही सांगितले.