शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

राजापुरात अतिवृष्टीमध्ये आतापर्यंत सुमारे ४२ लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:37 IST

राजापूर : तालुक्यात यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमध्ये आतापर्यंत ४१लाख ८५ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान दि. २१ ...

राजापूर : तालुक्यात यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमध्ये आतापर्यंत ४१लाख ८५ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान दि. २१ व २३ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीत झाले आहे. या तीन दिवसांमध्ये तब्बल १० लाख ७१ हजार ४०० रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद महसूल प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

पावसाच्या पहिल्या दोन महिन्यांतच तालुक्याला तब्बल पाचवेळा पूरस्थितीचा सामना करावा लागला होता. त्यातच पावसाळ्यापूर्वी चक्रीवादळाचा आणि त्यानंतर दि. २१ ते २३ जुलै दरम्यान अतिवृष्टीचा मोठा फटका तालुक्याला बसला आहे. अतिवृष्टीमुळे पुरामध्ये बुडून दोघांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत तालुक्यात ४१ लाख ८५ हजार रूपयांचे नुकसान झाल्याची नोंद महसूल दफ्तरी करण्यात आली आहे. यामध्ये २ घरांची पूर्णत पडझड होऊन २ लाख ३ हजार ८०० रूपये, १३३ घरांची अंशत: पडझड होऊन २३ लाख ३१ हजार ४०० रूपये, १० कच्चा घरांची अंशत: पडझड होऊन ६० हजार रूपये तर ६ गोठ्यांची पडझड होऊन ६३,१०० रूपयांचे नुकसान झाले आहे.

या नैसर्गिक आपत्तीत एक म्हैस, ४ बकऱ्या, २ बैल, एक पाडा अशी सात जनावरे मृत्यूमुखी पडल्याने शेतकऱ्यांचे ९३ हजारांचे नुकसान झाले आहे. तर ४३९ शेतकऱ्यांचे कुक्कुटपालनातील पक्षी मृत झाल्याने १ लाख १८ हजार ७०० रूपयांचे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे तालुक्यातील सुमारे १०३ कुटुंबांची घरे दोन दिवसांपेक्षा जास्त कालावधीत पुराच्या पाण्याखाली राहिल्याने त्यांचे ५ लाख १५ हजारांचे नुकसान झाले आहे. यावर्षी सर्वाधिक नुकसान हे २१ ते २३ जुलै या तीन दिवसात झालेल्या अतिवृष्टीत झाले आहे. या तीन दिवसात तब्बल १० लाख ७१ हजार ४०० रूपयांचे नुकसान झाले आहे.

दरम्यान, पुरामध्ये बुडून मृत्यू झालेल्या दोघांच्या वारसांना शासनाकडून प्रत्येकी ४ लाख याप्रमाणे एकूण ८ लाख रूपयांची मदत करण्यात आली आहे. तर ज्या कुटुंबाची घरे दोन दिवसांपेक्षा जास्त काळ पुराच्या पाण्यामध्ये होती, अशा कुटुंबांसाठी मदत म्हणून शासनाकडून ३ लाख ८५ हजार रूपये प्राप्त झाले आहेत. अशी १०३ कुटुंबे बाधित असून, त्यापैकी ७७ लाभार्थ्यांना अनुदान वितरीत करण्यात आले आहे. उर्वरित २६ लाभार्थ्यांनाही अनुदान मंजूर असून, धनादेश अदा करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती महसूल विभागाकडून देण्यात आली.