शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

श्रीराम दुर्गे यांचे साहित्य मानवी मूल्यावर आधारित : नागनाथ कोत्तापल्ले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:23 IST

चिपळूण : संविधानिक मूल्यांवर आधारित व्यवस्था परिवर्तन हे श्रीराम दुर्गे यांच्या साहित्याचे वेगळेपण होते. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्ये ...

चिपळूण : संविधानिक मूल्यांवर आधारित व्यवस्था परिवर्तन हे श्रीराम दुर्गे यांच्या साहित्याचे वेगळेपण होते. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्ये खऱ्या अर्थाने त्यांच्या सर्व साहित्यामध्ये उमटलेली दिसतात. मानवी जीवन हे मूल्याधारित असावे, अशी धारणा घेऊन श्रीराम दुर्गे सातत्याने साहित्य क्षेत्रात कार्यरत होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि त्यांचे साहित्य अत्यंत महत्त्वाचे ठरते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केले.

येथील साहित्यिक श्रीराम दुर्गे यांचे आकस्मिक निधन झाले. येथील मित्र परिवारातर्फे त्यांना आदरांजली वाहण्यासाठी ऑनलाइन शोकसभा आयोजित करण्यात आली होती. या शोकसभेच्या अध्यक्षस्थानी डॉ. नागनाथ कोत्तापल्ले उपस्थित होते. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले पुढे म्हणाले की, श्रीराम दुर्गे यांनी कथा, कविता, कादंबरी या विविध माध्यमांतून सामान्य माणसाला नायकत्व प्रदान केले. त्यांच्या जगण्याचे प्रश्न समाजासमोर मांडले. सामाजिक बांधिलकी आणि चिंतनशील स्वभाव या माध्यमातून एक आदर्श शिक्षक ते संवेदनशील साहित्यिक असा त्यांचा प्रवास झालेला होता. समाजातील सामाजिक विषमतेबरोबरच आर्थिक विषमता, सांस्कृतिक विषमताही दूर झाली पाहिजे, अशा प्रकारची धारणा श्रीराम दुर्गे यांनी अखेरपर्यंत जपली.

सभेत कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या संदेशाचे वाचन करण्यात आले. डॉ. बाळासाहेब लबडे, डॉ. संजय पाटोळे, प्रा. युवराज धसवाडीकर, शिवा कांबळे, डॉ. भगवान वाघमारे, नरसिंग घोडके, भीमराव रायभोळे, सुरेश पाटोळे, डॉ. सोमनाथ कदम, चंद्रकांत राठोड या विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी श्रीराम दुर्गे यांच्या साहित्य व व्यक्तिमत्त्वाविषयीच्या भावना व्यक्त केल्या. शोकसभेचे आयोजन आणि सूत्रसंचालन इंडियन स्टुडंट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. ज्ञानोबा कदम यांनी केले. बुक्टूचे अध्यक्ष प्रा. डॉ. गुलाब राजे यांनी प्रास्ताविक केले़ आभार प्रदीप दुर्गे यांनी मानले़