शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा; कोरोनाबाधित, लसीकरणामुळे दात्यांचे प्रमाण घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:32 IST

रत्नागिरी : येथील जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या रक्तपेढीत सध्या रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे या रक्तपेढीला गरोदर माता, बालके, ...

रत्नागिरी : येथील जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या रक्तपेढीत सध्या रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे या रक्तपेढीला गरोदर माता, बालके, डायलिसीस शस्त्रक्रिया, अपघाती रूग्ण यांना रक्तपुरवठा करण्यास अडचणी येत आहेत. सध्या कोरोनाबाधितांची वाढती संख्या आणि प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढला आहे. त्यामुळे दात्यांची संख्या घटली आहे.

जिल्हा शासकीय रूग्णालयात विविध आजारांचे रूग्ण तसेच वाढत्या अपघातांच्या संख्येमुळे दरदिवशी सरासरी २५ ते ३० रक्तपिशव्यांचा पुरवठा करावा लागतो. महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत शासकीय तसेच खासगी रुग्णालयांत दाखल असणाऱ्या रुग्णांसाठी (विशेषत: हृदयशस्त्रक्रिया, डायलिसीस) नि:शुल्क रक्तपुरवठा करण्यात येतो. त्याचबरोबर जिल्हा रूग्णालयातील शस्त्रक्रिया, प्रसुती, थॅलेसिमिया, हिमोफिलीया रूग्ण, आर्थिक दुर्बल घटक, ज्येष्ठ नागरिक रूग्ण आदींसाठी मोफत रक्तपुरवठा केला जातो.

रक्ताची वाढती गरज लक्षात घेता यासाठी शिबिरांच्या तसेच स्वैच्छिक रक्तदानाच्या माध्यमातून रक्त संकलित करावे लागते. एप्रिल ते जून या कालावधीत सुट्यांचा कालावधी असला तरी याच कालावधीत विविध साथीच्या आजाराच्या रूग्णांबरोबरच अपघातांची संख्या वाढल्याने जिल्हा रूग्णालयाला रक्त कमी पडत असल्याचे चित्र निर्माण होते. मात्र, या रक्तपेढीची टीम आवश्यक असेल तेव्हा शिबिराचे आयोजन करून रक्तदात्यांना आवाहन करते. वार्षिक २००० इतके रक्तसंकलन करणारी जिल्हा रूग्णालयाची रक्तपेढी आता वार्षिक ६००० बॅग्ज इतके रक्तसंकलन व तितकाच रक्तपुरवठा करत आहे.

सध्या या रूग्णालयात विविध साथींच्या आजारांची रूग्णसंख्या वाढू लागली आहे. तसेच प्रसुती, डायलिसीस रूग्ण तसेच सध्या डेंग्यूचे रूग्ण वाढल्याने त्यांनाही प्लेटलेट्सची गरज मोठ्या प्रमाणावर भासत आहे. त्या तुलनेने या रक्तपेढीला अचानक रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने दात्यांची संख्या कमी झाली आहे. सध्या वाढलेल्या लसीकरणाचा परिणामही रक्त संकलनावर होत आहे.

सध्या या रक्तपेढीला दिवसाला अगदी १० पिशव्याही मिळणे अवघड झाले आहे. सर्वच गटांचे रक्त उपलब्धच नसल्याने विविध रूग्णांची गैरसाेय होत आहे. त्यामुळे रक्त संकलनासाठी सध्या रक्तदात्यांच्या सहकार्याची गरज निर्माण झाली आहे. या रक्तपेढीची समस्या जाणून घेऊन दात्यांनी सहकार्याचा हात पुढे करावा व जिल्हा रूग्णालयात सकाळी १० ते सायंकाळी ५ यावेळेत स्वेच्छेने रक्तदान करून रूग्णसेवेला हातभार लावावा, असे आवाहन रक्तपेढीतर्फे करण्यात आले आहे.

कोराेना संसर्गामुळे दाते बाधित...

जिल्ह्यात सध्या कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्याने अनेक दाते संक्रमित झाले आहेत. तसेच कोरोनाबाधित झालेल्यांना तीन महिन्यानंतरच रक्त देता येते. त्यामुळे याचा परिणाम दात्यांचे प्रमाण कमी होण्यावर झाला आहे.

लसीकरणामुळेही दाते घटले...

लस घेतल्यानंतर १४ दिवसांनी रक्तदान करता येते. सध्या लसीकरणाची मोहीम वेगात सुरू आहे. त्यामुळे काहींनी पहिला डोस घेतल्यास १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला नाही तर काहींनी दुसरा डोसही घेऊन १४ दिवस पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळे अनेक दात्यांना इच्छा असूनही रक्त देता येत नाही.

निर्बंध उठल्याचाही परिणाम...

जिल्हा प्रशासनाने निर्बंध उठवले आहेत. त्यामुळे आता सर्व दुकाने, व्यवसाय सुरू झाले आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून सर्वच बंद राहिल्याने व्यवसाय सुरू होताच व्यावसायिक आता पूर्णवेळ व्यग्र राहात आहेत. त्यामुळे रक्तदानासाठी काहीजणांकडून कारणे सांगितली जात आहे.

कोटसाठी

सध्या जिल्हा रूग्णालयात विविध रक्तगटांची तीव्र टंचाई भासत आहे. विविध शस्त्रक्रिया, प्रसुती याबरोबरच डेंग्यूचा वाढता आजार यामुळे रक्ताची मागणी वाढली आहे. मात्र, सध्या जिल्हा रूग्णालयाच्या रक्तपेढीत सर्वच रक्तगटांचा तुटवडा आहे. त्यामुळे दात्यांनी रक्तदानासाठी पुढे यावे.

- योगिता सावंत, जनसंपर्क अधिकारी, जिल्हा शासकीय रूग्णालय रक्तपेढी, रत्नागिरी