शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
2
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
3
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्य अलर्ट; 'कारगिलचा हिरो' पुन्हा सीमेवर सज्ज
5
'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत पाकमधील 'या' ९ ठिकाणी एअर स्ट्राईक; २६/११, पुलवामाशी होता संबंध
6
"पाकपुरस्कृत दहशतवाद संपूर्ण संपेपर्यंत अशाच पद्धतीनं कारवाई होणार, हा संदेश देण्यात आपण यशस्वी"
7
Operation Sindoor: एअर स्ट्राईकनंतर भारताची पहिली प्रतिक्रिया; पाकिस्तानशी लढणे आमचा हेतू नाही, पण...
8
संपादकीय: चोंडीचा ‘राजकीय’ घाट
9
Operation Sindoor: "आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने...", शरद पवारांनी लष्करांचं केलं अभिनंदन
10
“त्यांनी आमचे कुंकू पुसले, मोदींनी ऑपरेशन सिंदूरने उत्तर दिले”; जगदाळे कुटुंबाने मानले आभार
11
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
12
Operation Sindoor: "माझ्या पतीच्या हत्येचा बदला घेतला..," शुभम द्विवेदींच्या पत्नीची 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पहिली प्रतिक्रिया
13
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
14
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
15
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
16
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
17
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
18
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
19
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
20
मॅाक ड्रिल करण्यासाठी राज्य झाले सज्ज, सर्व यंत्रणांना मिळाल्या सतर्कतेच्या सूचना

जिल्हा रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा; कोरोनाबाधित, लसीकरणामुळे दात्यांचे प्रमाण घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:32 IST

रत्नागिरी : येथील जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या रक्तपेढीत सध्या रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे या रक्तपेढीला गरोदर माता, बालके, ...

रत्नागिरी : येथील जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या रक्तपेढीत सध्या रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे या रक्तपेढीला गरोदर माता, बालके, डायलिसीस शस्त्रक्रिया, अपघाती रूग्ण यांना रक्तपुरवठा करण्यास अडचणी येत आहेत. सध्या कोरोनाबाधितांची वाढती संख्या आणि प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढला आहे. त्यामुळे दात्यांची संख्या घटली आहे.

जिल्हा शासकीय रूग्णालयात विविध आजारांचे रूग्ण तसेच वाढत्या अपघातांच्या संख्येमुळे दरदिवशी सरासरी २५ ते ३० रक्तपिशव्यांचा पुरवठा करावा लागतो. महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत शासकीय तसेच खासगी रुग्णालयांत दाखल असणाऱ्या रुग्णांसाठी (विशेषत: हृदयशस्त्रक्रिया, डायलिसीस) नि:शुल्क रक्तपुरवठा करण्यात येतो. त्याचबरोबर जिल्हा रूग्णालयातील शस्त्रक्रिया, प्रसुती, थॅलेसिमिया, हिमोफिलीया रूग्ण, आर्थिक दुर्बल घटक, ज्येष्ठ नागरिक रूग्ण आदींसाठी मोफत रक्तपुरवठा केला जातो.

रक्ताची वाढती गरज लक्षात घेता यासाठी शिबिरांच्या तसेच स्वैच्छिक रक्तदानाच्या माध्यमातून रक्त संकलित करावे लागते. एप्रिल ते जून या कालावधीत सुट्यांचा कालावधी असला तरी याच कालावधीत विविध साथीच्या आजाराच्या रूग्णांबरोबरच अपघातांची संख्या वाढल्याने जिल्हा रूग्णालयाला रक्त कमी पडत असल्याचे चित्र निर्माण होते. मात्र, या रक्तपेढीची टीम आवश्यक असेल तेव्हा शिबिराचे आयोजन करून रक्तदात्यांना आवाहन करते. वार्षिक २००० इतके रक्तसंकलन करणारी जिल्हा रूग्णालयाची रक्तपेढी आता वार्षिक ६००० बॅग्ज इतके रक्तसंकलन व तितकाच रक्तपुरवठा करत आहे.

सध्या या रूग्णालयात विविध साथींच्या आजारांची रूग्णसंख्या वाढू लागली आहे. तसेच प्रसुती, डायलिसीस रूग्ण तसेच सध्या डेंग्यूचे रूग्ण वाढल्याने त्यांनाही प्लेटलेट्सची गरज मोठ्या प्रमाणावर भासत आहे. त्या तुलनेने या रक्तपेढीला अचानक रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने दात्यांची संख्या कमी झाली आहे. सध्या वाढलेल्या लसीकरणाचा परिणामही रक्त संकलनावर होत आहे.

सध्या या रक्तपेढीला दिवसाला अगदी १० पिशव्याही मिळणे अवघड झाले आहे. सर्वच गटांचे रक्त उपलब्धच नसल्याने विविध रूग्णांची गैरसाेय होत आहे. त्यामुळे रक्त संकलनासाठी सध्या रक्तदात्यांच्या सहकार्याची गरज निर्माण झाली आहे. या रक्तपेढीची समस्या जाणून घेऊन दात्यांनी सहकार्याचा हात पुढे करावा व जिल्हा रूग्णालयात सकाळी १० ते सायंकाळी ५ यावेळेत स्वेच्छेने रक्तदान करून रूग्णसेवेला हातभार लावावा, असे आवाहन रक्तपेढीतर्फे करण्यात आले आहे.

कोराेना संसर्गामुळे दाते बाधित...

जिल्ह्यात सध्या कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्याने अनेक दाते संक्रमित झाले आहेत. तसेच कोरोनाबाधित झालेल्यांना तीन महिन्यानंतरच रक्त देता येते. त्यामुळे याचा परिणाम दात्यांचे प्रमाण कमी होण्यावर झाला आहे.

लसीकरणामुळेही दाते घटले...

लस घेतल्यानंतर १४ दिवसांनी रक्तदान करता येते. सध्या लसीकरणाची मोहीम वेगात सुरू आहे. त्यामुळे काहींनी पहिला डोस घेतल्यास १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला नाही तर काहींनी दुसरा डोसही घेऊन १४ दिवस पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळे अनेक दात्यांना इच्छा असूनही रक्त देता येत नाही.

निर्बंध उठल्याचाही परिणाम...

जिल्हा प्रशासनाने निर्बंध उठवले आहेत. त्यामुळे आता सर्व दुकाने, व्यवसाय सुरू झाले आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून सर्वच बंद राहिल्याने व्यवसाय सुरू होताच व्यावसायिक आता पूर्णवेळ व्यग्र राहात आहेत. त्यामुळे रक्तदानासाठी काहीजणांकडून कारणे सांगितली जात आहे.

कोटसाठी

सध्या जिल्हा रूग्णालयात विविध रक्तगटांची तीव्र टंचाई भासत आहे. विविध शस्त्रक्रिया, प्रसुती याबरोबरच डेंग्यूचा वाढता आजार यामुळे रक्ताची मागणी वाढली आहे. मात्र, सध्या जिल्हा रूग्णालयाच्या रक्तपेढीत सर्वच रक्तगटांचा तुटवडा आहे. त्यामुळे दात्यांनी रक्तदानासाठी पुढे यावे.

- योगिता सावंत, जनसंपर्क अधिकारी, जिल्हा शासकीय रूग्णालय रक्तपेढी, रत्नागिरी