शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

दुकान उघडण्याचे आदेश स्टेटसवर, पोलिसांची कारवाई दुकानदारांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : ताउते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या घरांच्या दुरुस्तीसाठी बांधकाम साहित्यांची दुकाने उघडण्याची परवानगी तहसीलदार यांनी व्हॉट्सॲप ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : ताउते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या घरांच्या दुरुस्तीसाठी बांधकाम साहित्यांची दुकाने उघडण्याची परवानगी तहसीलदार यांनी व्हॉट्सॲप स्टेटसवरून दिली. मात्र, मंगळवारी दुकाने उघडताच, पोलिसांनी कारवाईचा तडाखा लावला. व्यापाऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त करताच, मंत्री उदय सामंत रत्नागिरीत दाखल झाले. पुढील आठ दिवस दुकान ९ ते १ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश काढण्याची सूचना त्यांनी केली.

रविवारपासून जिल्ह्याला ताउते चक्रीवादळाने झोडपून काढले. शहरी आणि ग्रामीण भागातही अनेक घरांचे नुकसान झाले. त्यामुळे घर दुरुस्तीसाठी आवश्यक सामान नागरिकांना मिळावे, या हेतूने रत्नागिरीचे तहसीलदार शशिकांत जाधव यांनी फक्त बांधकाम साहित्याची दुकाने उघडण्याची परवानगी दिली. मात्र, वादळ परिस्थितीतील नुकसानीचे पंचनामे इत्यादी कामे सुरू असल्याने, त्यांनी तातडीने जनतेला कळावे, यासाठी त्यांनी आपल्या व्हॉट्सॲप स्टेटस वर तसा मेसेज ठेवला. मात्र, मंगळवारी सकाळी लेखी आदेश नसल्याचे कारण देत, पोलिसांनी ही दुकाने उघडण्यास व्यापाऱ्यांना मज्जाव केला.

ही घटना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कळताच त्यांनी आपला नियोजित दौरा सोडून व्यापाऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी रत्नागिरी बाजारपेठेत धाव घेतली. वादळ परिस्थितीमुळे जनतेला घर दुरुस्तीसाठी व बांधकामासाठी साहित्य मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे बांधकाम साहित्याची दुकाने पुढील आठ दिवस सकाळी ९ ते १ सुरू ठेवण्याबाबत आदेश काढण्याच्या सूचना उदय सामंत यांनी प्रशासनाला दिल्या असून, तसे आदेश काढण्यात येणार आहेत.

मात्र, लेखी आदेश नाही म्हणून कारवाईत तत्परता दाखविणाऱ्या पोलिसांबाबत नाराजीचा सूर उमटत आहेत. तहसीलदार यांनी व्हॉट्सॲप स्टेटसवरून दिलेल्या आदेशामुळे यापूर्वीही वाद झाला होता. हे आदेश पोलीस प्रशासन ग्राह्य धरत नसल्याचे स्पष्ट होत आहे. मंत्री उदय सामंत यांच्या सूचनेनंतर पोलिसांनी कारवाई केलेल्या व्यापाऱ्यांना दंडाची रक्कम परत मिळणार का, ही कारवाई मागे घेणार का, असे प्रश्न विचारण्यात येत आहेत.

--------------------

रत्नागिरी शहरातील व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यास पाेलिसांनी मज्जाव केल्यानंतर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत येऊन व्यापाऱ्यांशी चर्चा केली.