शहरं
Join us  
Trending Stories
1
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
2
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
3
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
4
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
5
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
6
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
7
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
8
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
9
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
10
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
11
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”
12
"सर्व प्रॉपर्टी देऊन टाका…!" निर्दयी सुनेची वृद्ध सासूला अमानुष मारहाण, केस ओढत केली शिवीगाळ; VIDEO पाहून तुमचाही संताप उडेल
13
Chaitanyananda Saraswati : डर्टी गेम! चैतन्यनंद सरस्वतीच्या मठात सेक्स टॉय, अश्लील CD; दिल्ली ते दुबईपर्यंत नेटवर्क
14
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
15
VIDEO: बापरे... अगदी सहज उंच बिल्डिंगवरून तरूणाने स्विमिंग पूलमध्ये मारली उडी अन् मग...
16
Mohammed Siraj Record : मियाँ मॅजिक! सिराजनं साधला नंबर वन होण्याचा डाव; मिचेल स्टार्कला टाकले मागे
17
‘संघाला १०० वर्ष झाली तरी त्यांची ‘मुंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम, काँग्रेसची टीका    
18
बिल्सेरी, किनले, अक्वाफिनाला आता टक्कर देणार मुकेश अंबानी; ₹३०००० कोटींच्या व्यवसायात एन्ट्रीच्या तयारीत 
19
“भारत खरोखरच स्वतंत्र आहे का?”; गीतांजली वांगचूक यांचा सवाल, केंद्रीय गृहमंत्रालयावर टीका
20
रशियाने मोठा धोका दिला? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानला फायटर जेटचं इंजिन देण्याचा निर्णय घेतला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

दुकान उघडण्याचे आदेश स्टेटसवर, पोलिसांची कारवाई दुकानदारांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : ताउते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या घरांच्या दुरुस्तीसाठी बांधकाम साहित्यांची दुकाने उघडण्याची परवानगी तहसीलदार यांनी व्हॉट्सॲप ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : ताउते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या घरांच्या दुरुस्तीसाठी बांधकाम साहित्यांची दुकाने उघडण्याची परवानगी तहसीलदार यांनी व्हॉट्सॲप स्टेटसवरून दिली. मात्र, मंगळवारी दुकाने उघडताच, पोलिसांनी कारवाईचा तडाखा लावला. व्यापाऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त करताच, मंत्री उदय सामंत रत्नागिरीत दाखल झाले. पुढील आठ दिवस दुकान ९ ते १ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश काढण्याची सूचना त्यांनी केली.

रविवारपासून जिल्ह्याला ताउते चक्रीवादळाने झोडपून काढले. शहरी आणि ग्रामीण भागातही अनेक घरांचे नुकसान झाले. त्यामुळे घर दुरुस्तीसाठी आवश्यक सामान नागरिकांना मिळावे, या हेतूने रत्नागिरीचे तहसीलदार शशिकांत जाधव यांनी फक्त बांधकाम साहित्याची दुकाने उघडण्याची परवानगी दिली. मात्र, वादळ परिस्थितीतील नुकसानीचे पंचनामे इत्यादी कामे सुरू असल्याने, त्यांनी तातडीने जनतेला कळावे, यासाठी त्यांनी आपल्या व्हॉट्सॲप स्टेटस वर तसा मेसेज ठेवला. मात्र, मंगळवारी सकाळी लेखी आदेश नसल्याचे कारण देत, पोलिसांनी ही दुकाने उघडण्यास व्यापाऱ्यांना मज्जाव केला.

ही घटना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कळताच त्यांनी आपला नियोजित दौरा सोडून व्यापाऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी रत्नागिरी बाजारपेठेत धाव घेतली. वादळ परिस्थितीमुळे जनतेला घर दुरुस्तीसाठी व बांधकामासाठी साहित्य मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे बांधकाम साहित्याची दुकाने पुढील आठ दिवस सकाळी ९ ते १ सुरू ठेवण्याबाबत आदेश काढण्याच्या सूचना उदय सामंत यांनी प्रशासनाला दिल्या असून, तसे आदेश काढण्यात येणार आहेत.

मात्र, लेखी आदेश नाही म्हणून कारवाईत तत्परता दाखविणाऱ्या पोलिसांबाबत नाराजीचा सूर उमटत आहेत. तहसीलदार यांनी व्हॉट्सॲप स्टेटसवरून दिलेल्या आदेशामुळे यापूर्वीही वाद झाला होता. हे आदेश पोलीस प्रशासन ग्राह्य धरत नसल्याचे स्पष्ट होत आहे. मंत्री उदय सामंत यांच्या सूचनेनंतर पोलिसांनी कारवाई केलेल्या व्यापाऱ्यांना दंडाची रक्कम परत मिळणार का, ही कारवाई मागे घेणार का, असे प्रश्न विचारण्यात येत आहेत.

--------------------

रत्नागिरी शहरातील व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यास पाेलिसांनी मज्जाव केल्यानंतर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत येऊन व्यापाऱ्यांशी चर्चा केली.