शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

दुकान उघडण्याचे आदेश स्टेटसवर, पोलिसांची कारवाई दुकानदारांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : ताउते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या घरांच्या दुरुस्तीसाठी बांधकाम साहित्यांची दुकाने उघडण्याची परवानगी तहसीलदार यांनी व्हॉट्सॲप ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : ताउते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या घरांच्या दुरुस्तीसाठी बांधकाम साहित्यांची दुकाने उघडण्याची परवानगी तहसीलदार यांनी व्हॉट्सॲप स्टेटसवरून दिली. मात्र, मंगळवारी दुकाने उघडताच, पोलिसांनी कारवाईचा तडाखा लावला. व्यापाऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त करताच, मंत्री उदय सामंत रत्नागिरीत दाखल झाले. पुढील आठ दिवस दुकान ९ ते १ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश काढण्याची सूचना त्यांनी केली.

रविवारपासून जिल्ह्याला ताउते चक्रीवादळाने झोडपून काढले. शहरी आणि ग्रामीण भागातही अनेक घरांचे नुकसान झाले. त्यामुळे घर दुरुस्तीसाठी आवश्यक सामान नागरिकांना मिळावे, या हेतूने रत्नागिरीचे तहसीलदार शशिकांत जाधव यांनी फक्त बांधकाम साहित्याची दुकाने उघडण्याची परवानगी दिली. मात्र, वादळ परिस्थितीतील नुकसानीचे पंचनामे इत्यादी कामे सुरू असल्याने, त्यांनी तातडीने जनतेला कळावे, यासाठी त्यांनी आपल्या व्हॉट्सॲप स्टेटस वर तसा मेसेज ठेवला. मात्र, मंगळवारी सकाळी लेखी आदेश नसल्याचे कारण देत, पोलिसांनी ही दुकाने उघडण्यास व्यापाऱ्यांना मज्जाव केला.

ही घटना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कळताच त्यांनी आपला नियोजित दौरा सोडून व्यापाऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी रत्नागिरी बाजारपेठेत धाव घेतली. वादळ परिस्थितीमुळे जनतेला घर दुरुस्तीसाठी व बांधकामासाठी साहित्य मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे बांधकाम साहित्याची दुकाने पुढील आठ दिवस सकाळी ९ ते १ सुरू ठेवण्याबाबत आदेश काढण्याच्या सूचना उदय सामंत यांनी प्रशासनाला दिल्या असून, तसे आदेश काढण्यात येणार आहेत.

मात्र, लेखी आदेश नाही म्हणून कारवाईत तत्परता दाखविणाऱ्या पोलिसांबाबत नाराजीचा सूर उमटत आहेत. तहसीलदार यांनी व्हॉट्सॲप स्टेटसवरून दिलेल्या आदेशामुळे यापूर्वीही वाद झाला होता. हे आदेश पोलीस प्रशासन ग्राह्य धरत नसल्याचे स्पष्ट होत आहे. मंत्री उदय सामंत यांच्या सूचनेनंतर पोलिसांनी कारवाई केलेल्या व्यापाऱ्यांना दंडाची रक्कम परत मिळणार का, ही कारवाई मागे घेणार का, असे प्रश्न विचारण्यात येत आहेत.

--------------------

रत्नागिरी शहरातील व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यास पाेलिसांनी मज्जाव केल्यानंतर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत येऊन व्यापाऱ्यांशी चर्चा केली.