शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
3
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
4
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
7
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
8
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
9
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
10
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
11
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
12
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
13
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
14
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
15
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
16
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
17
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
18
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
19
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
20
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश

शिवसेनेचे वर्चस्व; राष्ट्रवादीने गुहागर राखले

By admin | Updated: April 25, 2015 01:09 IST

रत्नागिरी जिल्हा : ग्रामपंचायत निवडणुकीत धनुष्याच्या करिष्मा

रत्नागिरी : जिल्ह्यात झालेल्या ४६१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत तीनशेपेक्षा अधिक ग्रामपंचायतींवर भगवा फडकवून शिवसेनेने आपले राजकीय वर्चस्व कायम राखले आहे. रत्नागिरी, राजापूर, लांजा, संगमेश्वर, खेड, दापोली या सहा तालुक्यात सेनेचे वर्चस्व सिध्द झाले आहे. गुहागर विधानसभा मतदारसंघात मात्र माजी मंत्री भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादीची जादू कायम ठेवली आहे. राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम यांना त्यांच्या खेड-दापोली मतदारसंघाचा गड मात्र पुरेशा ताकदीने राखता आला नाही. गेल्या दोन महिन्यांच्या काळात रत्नागिरी जिल्ह्यातील ४६१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची धूम होती. त्यातील ३३१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. उर्वरित ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. प्रत्यक्षात निवडणूक झालेल्या काही ग्रामपंचायतींमध्येही काही जागा बिनविरोध झाल्या होत्या. ३३१ ग्रामपंचायतींच्या या निवडणुकींमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले होते. प्रथमच या ग्रामपंचायत निवडणूका सेना व भाजपातर्फे स्वतंत्रपणे लढविण्यात आल्या. त्यात शिवसेनेने जिल्ह्यात आपले वर्चस्व कायम असल्याचे दाखवून दिले आहे. रत्नागिरी तालुक्यात तालुकाप्रमुख बंड्या तथा प्रदीप साळवी यांनी शिवसेनेचे जाळे चांगले बांधले आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून येथे शिवसेनेची ताकद मोठी आहे. तालुक्यातील निवडणूक प्रक्रियेत असलेल्या ५१पैकी ४१ ग्रामपंचायतींवर शिवसेनेने वर्चस्व राखले. लांजा, राजापूर हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. राजापूर तालुक्यातील जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करणाऱ्या स्थानिकांच्या पाठीशी शिवसेनेचे आमदार राजन साळवी उभे ठाकले आहेत. त्यांना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा पूर्ण पाठिंबा आहे. या प्रकल्पाविरोधात शिवसेनेच्या भूमिकेमुळे लांजा -राजापूरमध्ये शिवसेनेच्या बाजूने वातावरण होते. त्याचा प्रत्यय ग्रामपंचायत निवडणुकीत दिसून आला. लांजातील २१ पैकी १६ ग्रामपंचायती सेनेने राखल्या. राजापूरमध्येही ५१पैकी ३८ ग्रामपंचायतींवर सेनेचा भगवा फडकला आहे. संगमेश्वरमध्ये ७४पैकी ५७, खेडमध्ये ८६पैकी ५९, दापोलीत ५० पैकी ४३, तर मंडणगडमध्ये सेना व राष्टवादीची ताकद समान पातळीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. खरेतर खेड व दापोली या विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम हे प्रतिनिधीत्व करीत आहेत. सेनेकडे असलेला हा मतदारसंघ सूर्यकांत दळवी यांचा पराभव करून संजय कदम यांनी राष्ट्रवादीकडे खेचून आणला. मात्र, ती ताकद ग्रामपंचायत निवडणुकीत दिसली नाही. खेडमध्ये सेना-मनसे पॅटर्नचा बोलबाला होता. चिपळूणातही सदानंद चव्हाण हे सेनेचे आमदार आहेत. परंतु भास्कर जाधव यांनी येथेही सेनेला निर्भेळ यश मिळू दिले नाही. गावविकास पॅनेल्स याठिकाणी मोठ्या संख्येने विजयी झाली आहेत. तसेच राष्ट्रवादीने १३ ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळविले आहे. या लढाईत सेनेने आज तरी आघाडी घेतली आहे मात्र भाजपचाही प्रवेश महत्वाचा आहे. (प्रतिनिधी)