शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
5
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
6
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
7
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
8
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
9
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
10
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
11
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
12
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
13
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
14
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
15
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
16
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
17
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
18
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
19
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
20
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!

शिवसेनेचे वर्चस्व; राष्ट्रवादीने गुहागर राखले

By admin | Updated: April 25, 2015 01:09 IST

रत्नागिरी जिल्हा : ग्रामपंचायत निवडणुकीत धनुष्याच्या करिष्मा

रत्नागिरी : जिल्ह्यात झालेल्या ४६१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत तीनशेपेक्षा अधिक ग्रामपंचायतींवर भगवा फडकवून शिवसेनेने आपले राजकीय वर्चस्व कायम राखले आहे. रत्नागिरी, राजापूर, लांजा, संगमेश्वर, खेड, दापोली या सहा तालुक्यात सेनेचे वर्चस्व सिध्द झाले आहे. गुहागर विधानसभा मतदारसंघात मात्र माजी मंत्री भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादीची जादू कायम ठेवली आहे. राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम यांना त्यांच्या खेड-दापोली मतदारसंघाचा गड मात्र पुरेशा ताकदीने राखता आला नाही. गेल्या दोन महिन्यांच्या काळात रत्नागिरी जिल्ह्यातील ४६१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची धूम होती. त्यातील ३३१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. उर्वरित ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. प्रत्यक्षात निवडणूक झालेल्या काही ग्रामपंचायतींमध्येही काही जागा बिनविरोध झाल्या होत्या. ३३१ ग्रामपंचायतींच्या या निवडणुकींमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले होते. प्रथमच या ग्रामपंचायत निवडणूका सेना व भाजपातर्फे स्वतंत्रपणे लढविण्यात आल्या. त्यात शिवसेनेने जिल्ह्यात आपले वर्चस्व कायम असल्याचे दाखवून दिले आहे. रत्नागिरी तालुक्यात तालुकाप्रमुख बंड्या तथा प्रदीप साळवी यांनी शिवसेनेचे जाळे चांगले बांधले आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून येथे शिवसेनेची ताकद मोठी आहे. तालुक्यातील निवडणूक प्रक्रियेत असलेल्या ५१पैकी ४१ ग्रामपंचायतींवर शिवसेनेने वर्चस्व राखले. लांजा, राजापूर हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. राजापूर तालुक्यातील जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करणाऱ्या स्थानिकांच्या पाठीशी शिवसेनेचे आमदार राजन साळवी उभे ठाकले आहेत. त्यांना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा पूर्ण पाठिंबा आहे. या प्रकल्पाविरोधात शिवसेनेच्या भूमिकेमुळे लांजा -राजापूरमध्ये शिवसेनेच्या बाजूने वातावरण होते. त्याचा प्रत्यय ग्रामपंचायत निवडणुकीत दिसून आला. लांजातील २१ पैकी १६ ग्रामपंचायती सेनेने राखल्या. राजापूरमध्येही ५१पैकी ३८ ग्रामपंचायतींवर सेनेचा भगवा फडकला आहे. संगमेश्वरमध्ये ७४पैकी ५७, खेडमध्ये ८६पैकी ५९, दापोलीत ५० पैकी ४३, तर मंडणगडमध्ये सेना व राष्टवादीची ताकद समान पातळीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. खरेतर खेड व दापोली या विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम हे प्रतिनिधीत्व करीत आहेत. सेनेकडे असलेला हा मतदारसंघ सूर्यकांत दळवी यांचा पराभव करून संजय कदम यांनी राष्ट्रवादीकडे खेचून आणला. मात्र, ती ताकद ग्रामपंचायत निवडणुकीत दिसली नाही. खेडमध्ये सेना-मनसे पॅटर्नचा बोलबाला होता. चिपळूणातही सदानंद चव्हाण हे सेनेचे आमदार आहेत. परंतु भास्कर जाधव यांनी येथेही सेनेला निर्भेळ यश मिळू दिले नाही. गावविकास पॅनेल्स याठिकाणी मोठ्या संख्येने विजयी झाली आहेत. तसेच राष्ट्रवादीने १३ ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळविले आहे. या लढाईत सेनेने आज तरी आघाडी घेतली आहे मात्र भाजपचाही प्रवेश महत्वाचा आहे. (प्रतिनिधी)